विद्यार्थ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणार विद्यार्थी संघटना

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर चे कुलगुरू मा. सुभाष चौधरी यांना PG पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांमध्ये २० टक्के प्रवेश कोटा वाढविण्याबाबत निवेदन देण्यात आले.

२०२० या संपूर्ण कालावधीत कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने विद्यार्थांच्या हितासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्वच विध्यापीठांनी इंटर्नल मार्क्स व ऑनलाइन परीक्षा नुसार विद्यार्थ्यांना गुण दिले त्यामुळे ९५ ते १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले परंतु पुढील शिक्षणाकरिता अर्ज केला असता त्यापैकी २५ टक्के विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश मिळू शकला नाही.

विद्यार्थी रोज संपूर्ण जिल्ह्यातील महाविद्यालय फिरतात परंतु सर्वच महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत असून पुढील आयुष्याची चिंता पडली आहे.

तरी आज कुलगुरू सरांन सोबत युवासेना, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांचा पदाधीकारांनी या विषयावर चर्चा केली व २० टक्के जागा लवकरात लवकर वाढविण्यात यावे अशी मागणी केली जर मागणी पूर्ण झाली नाही तर विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.

महिलांचे सौर पॅनेल व्यवसायामध्ये पाऊल; 26 रोजी पालकमंत्री करणार उद्घाटन

देशातील बड्या कंपन्या सहसा सौर पॅनेल तयार करतात. जिल्ह्यातील बचत गटांच्या अशिक्षित महिलांनी सौर पॅनेल निर्मितीसारख्या तांत्रिक कामात सौर पॅनेल उद्योगात झेप घेतली आहे. महाराष्ट्राच्या अभिमानास्पद हा पहिला उपक्रम आहे. महिला बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात सौर पॅनेल उत्पादन उद्योग उभारणे ही देशातील दुसरी घटना आहे.

26 जानेवारी रोजी महिला संचालित सौर कंपनीचे उद्घाटन कवठा झोपडीत पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवा कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार रामदास तडस, जिप अध्यक्ष सरिता गखरे, आमदार रणजित कांबळे, आमदार पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, जिल्हा दंडाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, संचालक सत्यजित बढे, आयआयटी मुंबईचे प्रकल्प व्यवस्थापक अमित देशमुख, जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे उपस्थित असतील.

उद्योग संकल्पनेने झाले ऐक्य: उमेद मोहिमेअंतर्गत कवठा झोपडी गावात बचत गट आणि ग्रामसभा स्थापन करण्यात आल्या. महिलांच्या एकीकरणातून उद्योगाची संकल्पना आली. खेड्यातील उज्ज्वल सौर ऊर्जा मागासवर्गीय संस्था संघटना ही महिला औद्योगिक सहकारी संस्था असून महिला सशक्तीकरणासाठी महिलांनी ही स्थापना केली आहे. ब्राइट सौर एनर्जी मार्च 2018 मध्ये लाँच केली गेली. तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांच्या प्रयत्नातून समाज कल्याण विभागाने ग्राम संघटनेसाठी 2 कोटी 62 लाख रुपयांच्या भागभांडवलास मान्यता दिली आहे. त्यापैकी १ कोटी 83 लाख रुपये देण्यात आले आहेत.

सहकारी सोसायटी अंतर्गत २१४ महिला भागधारकांसह सौर उर्जा मागासवर्गीय महिला औद्योगिक प्रकल्पात नोंदणीकृत केले गेले आहे. त्यापैकी २०० मागासवर्गीय महिला आहेत. वर्धा उमेद अभियानाच्या माध्यमातून या प्रकल्पाचा अहवाल तयार करणे व जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. फॅक्टरी शेडचे बांधकाम, शेड बांधणीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविणे, मशीन खरेदी, बांधकाम, सहकारी संस्था म्हणून नोंदणी आणि वस्तूंची नोंदणी व सेवा कर इत्यादींस सहयोग केला गेले.

प्रकल्प व्यवस्थापक देशमुख यांच्या परिश्रमांचे फळ: या प्रकल्पाचे तांत्रिक मार्गदर्शन आयआयटी मुंबईचे प्रकल्प व्यवस्थापक अमित देशमुख यांनी केले. या प्रकल्पात दुर्गा सौर ऊर्जा (डूंगरपूर, राजस्थान) येथे १२ महिलांना सौर पॅनेल निर्मितीचे प्रशिक्षण दिले गेले. वर्षभर देशमुख यांनी गावात राहून महिलांना विविध प्रशिक्षण दिले. यामध्ये आयआयटी मुंबईतर्फे कंपनी चालवण्याचे आवश्यक प्रशिक्षण, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक व्यवस्थापन, लेखा, टॅली, कच्चा माल ऑनलाईन, विपणन इ. प्रशिक्षण झाले

सुरुवातीला, प्रशिक्षण घेतल्यानंतर 12 महिलांनी सौर दिवे बनविण्यास सुरुवात केली आणि एक हजार दिवे तयार केले आणि त्यांना 2 लाख रुपयांना विकले. आता कवठा (झोपडी) गावात कंपनी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पॅनेल तयार करण्याचे काम सुरू आहे. सौर पॅनेल, सोलर स्ट्रीट लाइट्स आणि सोलर होम लाईट्स इ. बनवण्याचे काम महिला करत आहेत. महिला-संचालित कंपनीला ग्रामीण परिसरामध्ये 40 लाख रुपये चे स्ट्रीट लाइट बसविण्याचे काम मिळाले आहे. या प्रकल्पातून महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होणार आहे.

अंततः मुंढे नए स्थान पर नियुक्त

मेयर संदीप जोशी और अन्य भाजपा नगरसेवकों के विरोध के कारण नागपुर नगर निगम से स्थानांतरित किए गए मुंढे को आखिरकार किसी एक जगह नियुक्त किया गया है। मुंढे को राज्य मानवाधिकार आयोग के सचिव के रूप में नियुक्त किया गया है। सरकार ने बुधवार को राज्य में कुछ आईएएस अधिकारियों के स्थानांतरण के निर्णय की घोषणा की। इसमें, उदय जाधव को बाल अधिकार के लिए राज्य आयोग के सचिव के रूप में स्थानांतरित किया गया है, जो वर्तमान में राष्ट्रीय ग्रामीण जीवन मिशन के सीईओ के रूप में कार्य कर रहे है। इस बीच, एमपीसीएल के एमडी अरविंद कुमार को विपणन और कपड़ा विभाग में स्थानांतरित कर दिया गया है। जबकि डी बी गावडे को सार्वजनिक स्वास्थ्य विभाग के संयुक्त सचिव के रूप में नियुक्त किया गया है।

तुकाराम मुंढे, जो एक कर्तव्यनिष्ठ और अनुशासित अधिकारी के रूप में जाने जाते हैं, ने नागपुर नगर आयुक्त का पदभार संभालने के बाद अपना काम शुरू कर दिया था। इस दरमियान उनका महापौर और अन्य भाजपा नगरसेवकों के साथ संघर्ष हुआ।

उसके बाद, तुकाराम मुंडे को महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सचिव के रूप में नियुक्त किया गया। लेकिन कुछ ही दिनों के भीतर, सरकार ने उनके स्थानांतरण आदेश को रद्द कर दिया। तब से, तुकाराम मुंढे नियुक्ति के इंतजार में थे ।‌‌

बर्ड फ्लू इफेक्ट: नॉन व्हेजर्सची चिकनला नापसंती

नागपूर:- राज्यात बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याचे वृत्त आल्या ने खवय्यांनी चिकन व अंड्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे

याचाच परिणाम नागपुर मधील सावजी भोजनालयांवरही झालेल्या दिसून येतोय, चिकन अंडी विक्रीत कमालीची घट झाली आहे, विशेष म्हणजे चिकन अंडी खाणाऱ्यांची संख्याही कमालीची घटली आहे, याऐवजी मटन व शाकाहारास सर्वत्र प्राधान्य दिले जात आहे.

देशभरात अनेक ठिकाणी कावळे, कोंबड्या व अनेक पक्षी मरून पडल्याच्या बातम्या समोर येत आहे त्यामुळे नागरिकांनी तसे खाद्य दूर ठेवल्याचे चित्र समोर येत आहे, चिकन खाणा-यांची संख्या 60 ते 70 टक्क्यांनी कमी झाली आहे. बर्ड च्या भिती पोटी ग्राहक दिवसेंदिवस चिकन पासून लांब राहण्याचा प्रयत्न करताहेत असे चित्र आहे याबाबत विवीध माध्यमांवर जागरूकता करण्यात येत आहे, विशिष्ट तापमानापर्यंत शिजवलेले मांस हानिकारक ठरत नाही, केवळ कच्चे मांस खरेदि विक्री वेळी दक्षता बाळगावी असे सांगीतले जाते आहे मात्र लोक याबाबत सावध पवित्रा बाळगून आहेत

मकरसंक्रांति पतंगोत्सव खरेदीही करा ऑनलाइन

नागपुर:- प्रथमच I.T SECTOR मधील काही युवकांनी सद्यस्थितीत फैललेल्या COVID च्या संसर्गापासून बचावासाठी एक नवीन project सुरू केला आहे, याद्वारे संक्रांति सणाचा आपला आनंद कायम राखता येईल शिवाय कोरोना संक्रमणाची भितीही असणार नाही.

हे भारतातील पहिलेच असे E-COMMERCE स्टोर आहे.ज्यावर पतंग विक्री आहे, या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येकजण कोविडशिवाय सहजपणे संक्रांती सण साजरा करू शकेल. नागपुरात ई-कॉमर्स पतंग, इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्या घरी पोचती करण्याचे काम सुरू झाले आहे.
सीबीएटी ही नागपूरची एक सॉफ्टवेअर कंपनी आहे ज्यांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. आपल्या कडील सर्व मुलांना याचा फायदा झाला पाहिजे, यामध्ये कोविड संबधीच्या जागृतीविषयक घोषणाही दिल्या जातील.
या पुढाकाराने, आपणास गर्दिपासून वाचविण्यात येईल आणि उत्तरायण / मकरसंक्रांती सणाच्या संपूर्ण कोविड फ्री असा आनंद घेता येईल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करा.
http://Www.patang.cbat.in

लस आधी आरोग्य कर्मचा-यांना: जिल्ह्यात संपूर्ण झाली तयारी

नागपूर:- कोरोनाच्या भयावह वातावरणात आता जरा दिलासा मिळेल. 16 जानेवारीपासून जिल्ह्यातही कोरोनाची लस टोचणी सुरू केली जाईल. या संदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि जि.प. सीईओ यांनी अधिका-यांची भेट घेतल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तयारीचा आढावा घेतला आणि योग्य मार्गदर्शक सूचनाही दिल्या.

जिल्हाधिकारी म्हणाले की कोरोना प्रतिबंधक लस 15 ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली असून सर्वप्रथम ती खासगी व शासकीय आरोग्य क्षेत्रात काम करणा-या कर्मचा-यांना दिली जाईल. त्यासाठी कोविड पोर्टलमध्ये आतापर्यंत 11,645 आरोग्य कर्मचारी नोंदणीकृत केले गेले आहेत. या बैठकीस आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक थेटे व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, आरोग्य कर्मचा-यांनंतर नागरिकांना लसी देण्याच्या संदर्भात चर्चा झाली.

एका सत्रात 100 लसी: जिल्हाधिका-यांनी माहिती दिली की जिल्ह्यातील 10 ग्रामीण रुग्णालये, 2 उपजिल्हा रुग्णालय, 2 पीएचसी बोरखेडी, गोंडखेरी व सावनेर येथे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात अशा 15 ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण यंत्रनेस काळजीपूर्वक तसेच तयार रहाण्यास सांगण्यात आले आहे. कर्मचार्‍यांना लसीकरणासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

एका सत्रात 100 कर्मचार्‍यांना लसी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना अर्धा तास एका खोलीत बसवले जाईल. कोणत्याही प्रकारची रिएक्शन असल्यास त्वरित उपचार करण्यात येतील. येणा-या कोणत्याही कर्मचार्‍यास कोरोनाची चिन्हे दिसत असल्यास, स्वॅब तपासण्याची गरज संबंधीत निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेचे नियंत्रण अधिकारी स्वतः जिल्हाधिकारी आहेत.

नागपुर में बर्ड फ्लू? जिले में 500 से अधिक पक्षी मरे

नागपुर (कोंढाली):- बर्ड फ्लू देश के पांच राज्यों जैसे राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश और केरल में व्याप्त हो गया है। लेकिन राज्क्ष के पशुपालन विभाग के यह कहने के बावजूद कि महाराष्ट्र में अभी भी बर्ड फ्लू का कोई खतरा नहीं है, नागपुर जिले में 500 से अधिक पक्षियों की मौत हो गई है। जिला पशुपालन विभाग ने अभी तक पक्षियों की मौत का कारण स्पष्ट नहीं किया है।

हालांकि, क्षेत्र में इस तरह के जोखिम ने स्थानीय देहाती लोगों में भय का माहौल पैदा कर दिया है। नागपुर जिले के कोंढाली क्षेत्र के रिंगानाबोड़ी, मानिकवाड़ा, मसाला, शिवा, आकेवाड़ा क्षेत्रों में 500 से अधिक चिडीया, तोते और कौवे की मौत हो गई है। इस संबंध में, रिंगनबोडी के पुलिस पाटिल संजय नागपुरे ने कोंढाली के थानेदार विश्वास फुल्लरवार को सूचित किया।

काटोल तालुका पशुधन अधिकारी और कोंढाली पशुधन विकास अधिकारी प्रभारी डॉ तुषार पुंड और सुधीर कापसीकर इस तरह की जानकारी प्राप्त करने के लिए विभिन्न गांवों का दौरा कर रहे हैं। पशुपालन विभाग के स्थानीय अधिकारियों ने कहा कि मेडिकल रिपोर्ट के बाद ही पक्षियों की मौत का कारण स्पष्ट किया जाएगा।‌‌

विजेचे बिल माफ करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी चा हल्लाबोल मोर्चा

लाॅकडाऊन काळातील गरिब जनतेचे विजेचे बिल माफ करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे शहरअध्यक्ष रवीभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात आज ०९ जानेवारी २०२१ रोजी इंदोरा मैदान ते नागपुर जिल्हा चे पालकमंत्री तथा राज्याचे उर्जामंत्री नितिन राऊत यांचे घरापर्यंत हल्लाबोल मोर्चा आयोजित करण्यात आला. इंदोरा मैदान येथून मोर्चा ला शुरूवात होऊन नितिन राऊत यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा जात असतांना इंदोरा चौक येथे पोलिसांनी बॅरिकेट्स लाऊन मोर्चा अडवला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा बंदोबस्त साठी लावण्यात आला होता.

पोलिसांनी समोर जाण्यास मज्जाव करत जवळपास १०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व पोलिस बस मधे बसवून पोलिस मुख्यालय कडे रवाना केले. ३ ते ४ तास नंतर सर्व आंदोलकांना सोडन्यात आले. दरम्यान वंचित बहुजन आघाडी चे प्रतिनिधिंडल इंजि. राहुल वानखेडे, नागेश बुरबुरे, इंजि. राहूल दहिकर, प्रा. अजयकुमार बोरकर व मंगलमुर्ती सोनकुसरे यांनी मागण्यांचे निवेदन उर्जामंत्री नितिन राऊत यांच्या प्रतिनिधिंकडे सादर केले.

कोरोना च्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊन करण्याचा व जनतेला कामधंदा करन्यापासून अलिप्त ठेवण्याचा निर्णय हा शासनाचा होता. तेव्हा लाॅकडाऊन काळात लोकांना सर्वच आवश्यक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची जिम्मेदारी सुध्दा शासनाचीच होती. विज ही दैनंदिन जिवनातली अत्यावश्यक वस्तू आहे. त्यामुळे मोफत विज पुरवठा हि शासनाची जबाबदारी आहे तसेच जनतेचा हक्क पण आहे.

तेव्हा राज्यातील सर्वच गरीब, देहाडी मजदूर, बिपीएल, एपीएल व राशनकार्ड धारक, तसेच रिक्षाचालक, आॅटोचालक, हमाल, इं हातावर पोट असलेल्या जनतेचे विजेचे माफ करावे. हि मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे मांडण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यात तिव्र आंदोलन करन्यात येईल असा इशारा पक्षातर्फे देन्यात आला.

प्रसंगी राजू लोखंडे, विलास वाटकर, प्रफुल माणके, विवेक हाडके, सुनिल इंगळे, आनंद चौरे, मुरलीधर मेश्राम गुरुजी, डाॅ. धर्मेंद्र मंडलिक, नालंदा गणविर, माया शेंडे, सुजाता सुरडकर, कांचन देवगळे, निलिमा डंभारे, वर्षा धरगावे, समिता नंदेश्वर, संजय सूर्यवंशी, प्रविन पाटील, निर्भय बागडे, सोनु चहांदे, बालु हरकंडे, अमरदिप तिरपुडे, सुमधू गेडाम, अंकुश मोहिले, सिध्दांत पाटील, प्रशांत नारनवरे, दिनकर वाठोरे, विशाल वानखेडे, कमलेश शंभरकर, मिलन सहारे वानखेडे, रमेश कांबळे, शिशुपाल देशभ्रतार, धम्मदिप लोखंडे, अतुल गजभिये, अविराज थुल, अनिल धराडे, संजय वानखेडे, मनोज वाहाणे, राजेश पाटील, निशांत पाटील, अर्जुन हलमारे, संघपाल गाडेकर, भरत लांडगे, गोवर्धन भेले, पक्षाचे इतर पदाधिकारी, महिला आघाडी व युवा आघाडीचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

परदेशातून परतलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा: कोरोनाच्या नवीन दहशतीने प्रशासनाचा इशारा

नागपूर:- युरोपियन देशांतील ‘कोरोनाच्या नवीन प्राणघातक स्टेनची माहिती उघडकीस आल्यानंतर राज्यात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असताना शहरातील कोरोनाशी संबंधित प्रत्येक विषयासाठी जबाबदार असलेल्या मनपा प्रशासनानेही खबरदारी घ्यायला सुरुवात केली. बुधवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचेकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे की गेल्या 15 दिवसांत, जे लोक थेट युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्य-पूर्व देशांतून पोहोचले आहेत त्यांनी ताबड़तोब मनपाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

आता थेट पाठविले जाईल कोविड केअर सेंटरला: कोरोनाच्या नवीन आवृत्तीस सामना करण्याच्या उद्देशाने शहरातील हॉटेलांना मनपाद्वारे परदेशातून येणा-या प्रवाश्यांसाठी संस्थात्मक विलगीकरण केंद्र म्हणून स्थापित केले गेले आहे. मनपा आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार वरील देशांकडून येणा-या प्रवाशांना विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी होणार नाही, त्याऐवजी त्यांना थेट विमानतळावरून कोविड केअर सेंटर (विलगीकरण केंद्र) येथे पाठवले जाईल. आरटी-पीसीआर चाचणी त्या केंद्रावर पाठविल्यानंतर 5 ते 7 दिवसांत घेण्यात येईल, तोवर प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. जर चाचणी नकारात्मक आढळल्यास, 7 दिवस पूर्ण झाल्यास, प्रवाश्याला संस्थात्मक विलगीकरणातून सोडण्यात येईल, परंतु 7 दिवस त्याला घरातही अलग रहावे लागेल. जर चाचणी पॉजिटिव आली आणि प्रवाशाला कोणतीही लक्षणे नसतील तर त्याला त्याच हॉटेलमध्ये किंवा काेविड हॉस्पिटलमध्ये 14 दिवस रहावे लागेल.

विमानतळावर 5 पॉझिटिव्ह आढळलेः कोरोनाच्या नवीन आवृत्तीची भीती दिवसेंदिवस पसरत असली तरी, हवाई प्रवाशांवर त्याचा काही परिणाम दिसून येत नाही. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या वतीने गोवा, अहमदाबाद, दिल्ली आणि राजस्थानहून महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात जाणा-या विमान प्रवाशांना कोरोना चाचणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले होते. तथापि, कोरोनाच्या दुस-या टप्प्यात थंडीच्या संभाव्यतेमुळे या सूचना देण्यात आल्या आहेत.

आता कोरोनाच्या नवीन आवृत्तीचा टप्पा पाहायला मिळत आहे. परंतु विमानतळ प्राधिकरणाकडून कोणतीही काटेकोर कारवाई केली जात नसल्याने बघायला मिळते, प्रवाशांकडूनही नियमांचे पालन केले जात नाही. नागपूर विमानतळावर आलेल्या 738 प्रवाश्यांपैकी 73 प्रवाशांकडे कोरोना चाचणी प्रमाणपत्र नव्हते, याचाच अर्थ नागपूर विमानतळावर तपासणी झाल्यानंतर त्यापैकी 5 जण पॉजिटिव आढळले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने ३ वर्षाची वितरण त्वरित करा. दलितमित्र संघाची मागणी

महाराष्ट्र शासनाने सन 1971 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दलित मित्र पुरस्कार सुरू केला. या पुरस्कारांच्या नावांमध्ये सन 2012 पासून बदल करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असे नाव ठेवण्यात आले. हा पुरस्कार समाजामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या ५० सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्येक वर्षी 14 एप्रिल ला, देण्यात येतो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार दिला गेला नाही.

तसेच मागील दोन वर्षापासून या पुरस्काराचे वितरण करण्यात आले नाही. प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात राज्यातून याकरिता कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव मागीतला जातो. व 50 पुरस्कर्त्यांची निवड करण्यात येते. अशा प्रकारे कार्यकर्त्यांना समाजभूषण पुरस्काराने दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी सन्मानित करणे म्हणजे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाने राज्याची धुरा सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त नागपूर डॉ. संजीव कुमार यांना निवेदन देण्यात आले. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित | मित्र संघाचे राज्य सरचिटणीस योगेश वागदे वकोषाध्यक्ष भूषण दडवे आणि शहराध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version