खा.डॉ. विकास महात्मे यांच्या प्रयत्नांना यश: पीपीई किट्‌स होतील आता स्टरलाईज! संशोधनानंतर हिरवा कंदिल

नागपूर:- डॉ. महात्मे यांनी पुढाकार घेऊन जोधपूर येथील एम्समधील डीन यांच्याशी संपर्क साधून या टेक्नॉलॉजीवर रिसर्च करण्यासाठी विनंती केली. जोधपूर एम्सकडून या टेक्नॉलॉजीवर रिसर्च करण्यात आली त्यानंतर टेस्टिंग देखील करण्यात आली आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि जोधपूरच्या एम्सने या सर्व चाचण्या केल्यानंतर या टेक्नॉलॉजीला हिरवा कंदील दिला. म्हणजेच आता या किटला आपण स्टारलाईज करून पुन्हा वापरू शकतो. लवकरच या टेक्नॉलॉजीची ज्याकाही कायदेशीर परवानगी सरकारकडून घ्यायची असेल त्या डॉ. विकास महात्मे यांच्या मार्गदर्शनात मोनिश भंडारी पूर्ण करतील.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या उपचारादरम्यान येणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे पीपीई किट्‌सची आहे. रुग्णावर उपचार करताना डॉक्टर्स आणि परिचारिकांना ह्या किटचा वापरा करावा लागतो.१० ते १२ तास वापरल्यानंतर ती सरळ कचरापेटीमध्ये टाकावी लागते. एका किटकरिता १२०० ते १५०० रुपये मोजावे लागतात. या समस्येवर खासदार डॉ. विकास महात्मे यांनी उपाय शोधून काढला असून स्टरलाईज होणाऱ्या पीपीई किट्‌स आता उपलब्ध होऊ शकतील. त्याच्या संशोधनाला हिरवा कंदील मिळाला असून कायदेशीर पूर्ततेनंतर या किट्‌स वापरता येतील.

यामुळे प्रती मशीन २ लाख ४० हजार बचत होणार असून सध्या देशामध्ये ६० च्या वर मशीन्स कार्यरत आहेत. संपूर्ण देशामध्ये जो  पीपीई किट्सचा तुटवडा निर्माण झालेला आहे तो ह्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने पूर्ण होऊ शकेल. हे देशासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या संकटसमयी डॉ. विकास महात्मे यांनी घेतलेला पुढाकार आणि मोनीश भंडारी यांचे प्रयत्न हे आपल्या सर्वांसाठी व देशासाठी फायद्याचे ठरतील, अशी अपेक्षा व्यक्ती केली आहे.

मोनीश भंडारी हे सन २०१३ पासून ही कंपनी चालवत आहेत. त्यांनी मिनिस्टरी ऑफ इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून एक टेक्नॉलॉजी ट्रान्सफर घेतली होती, जी म्हणजे ‘मायक्रोवेव डीसिन्फेक्टांट सिस्टिम’. ज्यामुळे साधारणतः हॉस्पिटल मध्ये लागणारे लिनन किंवा तत्सम मटेरियल हे स्टेबलाइज होतात. सध्याचे युनीट हे बहुतांश एम्स आणि मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये लागलेले आहेत. त्यामध्ये फक्त काही सायकल्स  बदलवून पीपीई (PPE) किट्सपण स्टरलाईज होऊ शकतात.

पीपीई किट्‌स उपलब्धतेच्या समस्येचे निराकरण करण्या साठी डॉ. खा. विकास महात्मे यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांनी एक चांगलं व वेगळ्या प्रकारचे निदान दिले आहे. ‘मास्टर टेक्नॉलॉजी’ या कंपनीचे मोनीश भंडारी यांच्यासोबत डॉ. विकास महात्मे यांचा संपर्क झाला तेव्हा डॉ. महात्मे यांना मनीष भंडारी यांनी टेक्नॉलॉजीबाबत माहिती दिली.

भुकेल्यांना अन्न, हीच खरी ईश्वरसेवा

लॉकडाउनमध्ये शहरात अनेक नागरिक, विद्यार्थी अडकलेले आहेत. तर रस्त्यावर राहून जीवन व्यतित करणारे किंवा रोजगारासाठी शहरात धाव घेणा-यांचीही वाताहत होत आहे. यासर्वांच्या सुविधेसाठी मनपाच्या सेवा कार्याला अनेक संस्थांनी साथ देउन मनपाचे हात बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात कुणीही उपाशी राहू नये यासाठी सर्वच अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे भुकेल्यांना अन्न, हीच ईश्वरसेवा आहे, अशी भावना महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या नागरिकांना दोन वेळचे जेवण पोहोचविण्यासाठी शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था मनपाला सहकार्य करीत आहेत. आतापर्यंत ४४ स्वयंसेवी संस्थांनी या सेवा कार्याला मनपाला साथ दिली आहे. या संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याला प्रोत्साहित करण्यासाठी मंगळवारी (ता.२८) महापौर संदीप जोशी यांनी पूर्व नागपुरातील स्वयंसेवी संस्थांच्या ‘कम्यूनिटी किचन’ला भेट दिली.
पूर्व नागपुरातील पूर्वा ऑटोमोबाईल मित्र परिवार, इस्कॉनचे अन्नमित्र फाउंडेशन आणि शगुन महिला मंडळ या तीन संस्थांमार्फत दररोज १५ हजार ‘फूड पॅकेट्स’चे वितरण करण्यात येत आहे. या तिन्ही संस्थांच्या ‘कम्यूनिटी किचन’ला भेट देउन महापौर संदीप जोशी यांनी सेवा कार्यासाठी अहोरात्र झटणा-या प्रत्येकाचे अभिनंदन केले. यावेळी मनपाचे प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम उपस्थित होते.
कोरोनाला मात देण्यासाठी आज प्रत्येकच जण घरात राहून प्रशासनाला सहकार्य करीत आहे. मात्र ज्यांना घरच नाही किंवा घर आहे पण आसराच नाही अशांची होणारी वाताहत लक्षात घेता मनपाने घेतलेला पुढाकार हा स्तूत्य आहे. मात्र मनपाच्या या कार्याला शहरातील स्वयंसेवी संस्थांकडून मिळणारा प्रतिसाद हा कौतुकास पात्र आहे. आपल्या शहरातील कोणतिही व्यक्ती अन्नाविना राहू नये याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. ज्यांना अन्नाची गरज आहे त्या प्रत्येकाने मनपाच्या नियंत्रण कक्षात संपर्क साधावा. नागरिकांच्या सोयीसाठी मनपाने हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांनी ०७१२-२५३९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२, ९८२३३३०९३४ तर दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांनी ०७१२-२५६७०१९ या क्रमांकावर मनपाशी संपर्क साधून आवश्यक मदत मिळवून घ्यावी. शहरातील हे सेवा कार्य पुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी फक्त घराबाहेर निघू नये, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

 

मनपातर्फे आतापर्यंत साडे नऊ लाखांवर ‘फूड पॅकेट्स’ वितरीत

लॉकडाउनमध्ये शहरातील बेघर, निराधार, विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात शहरात २७ ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्यात आले आहेत. तर जवळपास ४४ स्वयंसेवी संस्था या कार्यासाठी पुढे आल्या आहेत. या सेवाकार्यात योगदान देण्यासाठी शहरातील सेवाभावी नागरिकही सढळ हाताने मदत करीत आहेत. त्यातूनच दररोज ४५ हजारांच्या वर जेवणाचे डबे पुरविले जात आहेत. मागणीनुसार या संख्येत दररोज वाढ होते आहे. २७ एप्रिल रोजी ४५८८८ तर २८ एप्रिल रोजी ४८०५६ फूड पॅकेटस्‌ वितरीत करण्यात आले. यामध्ये २८८५ बेघर किंवा निराधार, ३०७२ विद्यार्थी किंवा वसतीगृहात राहणारे, ४० ज्येष्ठ नागरिक, ३७५६ नागपूर मेट्रोचे कामगार आणि ३८३०३ रेशन कार्ड नसलेले असे एकूण ४८०५६ जेवणाचे डबे दररोज मनपातर्फे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरीत करण्यात येत आहेत. असे एकूण आतापर्यंत नऊ लाख ८९ हजार १०४ ‘फूड पॅकेट्स’ वितरीत करण्यात आले आहेत. तर दिव्यांगांसाठी अन्नधान्यासह जीवनावश्यक साहित्याच्या किट रोज देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त राशन कार्ड नसलेले आणि धान्य खरेदीची क्षमता नसलेले परंतु धान्य दिल्यास अन्न शिजविण्याची व्यवस्था असलेल्या नागरिकांनाही रेशन किट मनपातर्फे पुरविण्यात येत आहे. आतापर्यंत असे लोकं आणि दिव्यांगांना मिळून ६४५७ रेशन किटचे सुद्धा वितरण मनपातर्फे करण्यात आले आहेत. याशिवाय लहान बाळांना सकस आहार मिळावा यासाठी मनपातर्फे आतापर्यंत ४३ ‘बेबी फूड’चेही वितरण करण्यात आले आहे.
लॉकडाउनमध्ये शहरात अडकलेल्या कोणत्याही व्यक्तीची अडचण होऊ नये यासाठी मनपा कार्यरत आहे. शहरात अडकलेल्या व दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था नसलेल्या व्यक्तींपर्यंत वेळेत जेवण पोहोचविता यावे यासाठी मनपातर्फे हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. आवश्यक मदतीसाठी मनपाला सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत ०७१२-२५३९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांनी ०७१२-२५६७०१९ या क्रमांकावर माहिती देउन आवश्यक मदत प्राप्त करून घ्यावी. शहरात कुणीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी मनपा कटिबद्ध आहे. आवश्यक मदतीसाठी मनपाशी संपर्क साधा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाउन आहे. नागपूर शहरात लॉकडाउनमुळे अनेक विद्यार्थी, कामगार अडकले आहेत. तर ज्येष्ठ नागरिक, रस्त्यावर भिक्षामागून पोट भरणारे आणि मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणा-यांची वाताहत होत आहे. लॉकडाउनमध्ये या सर्वांच्या दोन वेळच्या जेवणाची जबाबदारी मनपाने घेतली त्यांची विविध मार्गाने मदत केली जात आहे. रेशन कार्ड नसणा-यांना रेशनची किट, लहान मुलांसाठी ‘बेबी फूड’ आणि ज्यांच्याकडे जेवण तयार करण्याची व्यवस्था नाही अशांना दोन वेळचे तयार जेवण पुरवून मनपा दायित्व निभावत आहे. या सर्व माध्यमातून आतापर्यंत नागपूर महानगरपालिकेतर्फे तब्बल साडे नऊ लाखांपेक्षा अधिक ‘फूड पॅकेट्स’ वितरीत करण्यात आले आहेत.

मनपाच्या बेघर निवाऱ्यात लाभार्थ्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी

राज्यातील विविध महानगरपालिकांच्या अख्यत्यारीत असलेल्या अशा बेघर निवाऱ्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील लोकांसोबत स्थलांतरित मजुरांना नेऊन या सर्व लाभार्थ्यांची विशेष काळजी घेणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यात पहिली ठरली आहे. कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी निवाऱ्यातील प्रत्येक लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
नागपूर शहरात सीताबर्डी येथील पंडित रवीशंकर शुक्ला मनपा शाळा व बुटी कन्या शाळा, टिमकी भानखेडा येथील हंसापुरी प्राथमिक शाळा, डिप्टी सिग्नल येथील गुरु घासीदास समाज भवन, नारा रोड येथील मनपा ग्रंथालय आणि समाजभवन, टेकडी गणेश मंदिराजवळील रेल्वे स्थानक पुलाच्या खाली, सदरमध्ये आरपीजी मनपा शाळा व आयटीआय शासकीय वसतिगृह, तुली हॉस्टेल कोराडी रोड, अग्रेसन भवन रवी नगर, लोहाना महाजनवाडी सीए रोड, एलकेम हिंगणा रोड, पटेल समाजभवन बेसा,परमात्मा भवन बागडगंज, पी डब्ल्यू एस कॉलेज कामठी रोड, जैन कलार सभागृह रेशीमबाग, दुर्गा माता मंदिर छावणी, जत्तेवार सभागृह नंदनवन, सिद्धेश्वर सभागृह मानेवाडा असे एकूण २१ शहरी बेघर निवारा आहेत. ‘लॉकडाऊन’ची घोषणा होताच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात रस्त्यांवरील बेघरांना तसेच स्थलांतरीत मजुरांना तातडीने बेघर निवाऱ्यात नेण्यात आले. ज्या बेघरांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल अशांची मनपाच्या वैद्यकीय चमूद्वारे विशेष काळजी घेऊन त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे व आवश्यक तो औषधोपचार करण्यात येत आहे.

‘लॉकडाऊन’दरम्यान रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना तसेच स्थलांतरित मजुरांना नागपूर शहरात मनपाच्या बेघर निवाऱ्यांमध्ये आश्रय देण्यात आला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आश्रयित संपूर्ण बेघरांची या निवाऱ्यामध्ये मनपाच्या आरोग्य तपासणी चमू द्वारे नियमित संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून विशेष काळजी घेतली जात आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने निवाऱ्यांमधील स्वच्छता आणि आश्रयितांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

यासाठी मनपाचे डॉ. निलजा पापलकर, डॉ. वैशाली सोनटक्के, डॉ. अश्विनी काळे, डॉ. मनोज मेश्राम, डॉ. गिरीधर धापोडकर यांचेसह फार्मासिस्ट प्रविणा पांडे, मयूर मेश्राम यांचेसह परिचारिका सरिता डांगळे, मंगला ठाकरे, अनिता ठाकरे अविरत सेवा देत आहे. नियमित आरोग्य तपासणी शिबिरासाठी दीनदयाल अंत्योदय योजनेचे कार्यक्रम समन्वयक प्रमोद खोब्रागडे, विनय त्रिकोलवार, नूतन मोरे यांचेसह समाज कल्याण विभागाचे कर्मचारी व निवारा कर्मचारी परिश्रम घेत आहे.

नागपूरचे छोटे योद्धा, घरुनच देताहेत पेंटींगच्या माध्यमातुन कोरोनाशी लढण्याची ताकत.

Nagpur:- Lock down च्या परिस्थितीत देखील आपण आपल्या विचारांची देवाणघेवाण आवश्यक विषयांवर करीत रहावे या उद्देश्याने ……..भारतीय शिक्षण मंडळ संचालित ,  सरस्वती शिशु मंदिर, नवयुग प्राथमिक शाळा यांच्या सहकाऱ्याने ,  नवयुग विद्यालय, महाल शाळेच्या मा.मुख्याध्यापिका डॉ.सौ.माया गायकवाड यांनी पालकांना आवाहन केले, घरी राहून मुलांनी  covid -19 ..stay inside,. stay  safe …. या विषयावर चित्र पाठवण्याकरिता,  या करिता शाळेतील शिक्षिका सौ.वर्षा भुजाडे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सर्व सूचनेच पालन करून घरूनच नवयुग शाळा परिवारातर्फे समाजाला चित्रातून संदेश दिला. भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा संजय शिरपूरकर , कार्यवाह ऍड उपेंद्र जोशी, सहसचिव सौ.हळदे , ऍड उमेश अंधारे ,सहसचिव  डॉ. भालचंद्र हरदास , मुख्याध्यापिका डॉ. माया गायकवाड  यांनी मुलांचे विशेष कौतुक केले, तर मार्गदर्शन चित्रकला शिक्षिका सौ.भुजाडे यांनी केले,  तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.

नागपुरात मध्य भारतातील पहिले कोविड हॉस्पिटल रुग्णांसाठी सज्ज

नागपुर:- या रुग्णालयात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रुग्णांवरील उपचाराला ३ भागात विभागण्यात आले असून यात कोरोना लक्षणे नसलेल्यांसाठी कोविड केअर सेंटर, सामान्य लक्षणे असलेल्यांसाठी कोविड हेल्थ सेंटर तर गंभीर रुग्णांसाठी विशेष केअर सेंटर उभारण्यात आले आहे. कोविड हॉस्पिटलमधून कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून रुग्णांसाठी आणि डॉक्टरांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवण्यात आला आहे.

ट्रॉमा केअर सेंटरला कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यासाठी मेडिकल चे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, ट्रॉमा केअर सेंटरचे इन्चार्ज प्रवीण पटनाईक, नोडल अधिकारी मोहम्मद फैजल ,बधीरीकरण विभागाचे प्रमुख नरेश तिरपुडे,औषधी वैद्यकशास्त्र प्रमुख राजेश गोसावी यांनी अहोरात्र परिश्रम घेत केवळ १० दिवसात केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडत हे कोविड रुग्णालय रुग्णांच्या सेवेत रुजू करण्यात आले.

विशेष म्हणजे या कोविड रुग्णालयात ६० खाटांच्या आयसीयू सोबत स्वतंत्र क्ष-किरण विभाग ,स्वतंत्र शस्त्रक्रिया गृह, स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र रक्तसाठा केंद्र असणार आहे. मध्य भारतातील सर्व सोयींनी युक्त असे हे अत्याधुनिक पहिले कोविड रुग्णालय ठरले आहे.

दिवॉर्डात रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी काचेचा विशेष कक्ष तयार करण्यात आल्याचे मेडिकल चे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा यांनी सांगितले आहे. डायलिसिस वर असलेल्या रुग्णामध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्याच्या सोयीसाठी ३ डायलिसीस यंत्र उपलब्ध करून देण्यात आल्याचेही डॉ.सजल मित्रा यांनी सांगितले आहे.

कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी स्थानिक स्तरावर पालकमंत्री नितीन राऊत, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे मेडिकल चे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले आहे.

वसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून कोरेना संसर्गाला समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. याच प्रयत्नांतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘मेडिकल’ ने पुढाकार घेतला असून तिथे असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला २२० खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. रविवार २६ एप्रिल पासून हे कोविड रुग्णालय रुग्णांच्या सेवेत सुरू झाले आहे.

आणखी तिघांनी दिली कोविडला मात

नागपुर:- मुळचे जबलपुरचे असलेले व सद्या नागपुरातील मोमीनपुरा परिसरात राहणारे तिघे मंगळवारी (ता.२८) कोविड-१९ला हरवून पूर्णपणे बरे झाले आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) कोरोना कक्षातून तिघांनाही ‘डिस्चार्ज’ मिळाल्यानंतर सर्व डॉक्टर, नर्स, परिचारीकांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.

दिल्लीवरून परतलेल्या नागरिकांचा शोध घेउन मनपातर्फे त्यांना ‘कॉरंटाईन’ करण्यात आले. यामध्येच ३४ वर्षीय व्यक्ती] २४ वर्षीय आणि १७ वर्षीय तरुणांचा समावेश होता. या तिघांनाही आमदार निवास येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. १३ एप्रिलला या तिघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले.

१४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. २६ व २७ एप्रिलला तिघांचेही ‘स्वॅब’ निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना मंगळवारी (ता.२८) घरी पाठविण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.सागर पांडे यांच्यासह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

रुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना १४ दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ राहणे बंधनकारक आहे. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडून वेळावेळी आवश्यक उपचार करण्यात आले. प्रशासनातर्फे वेळेवर उपचार मिळाल्याने आज आम्ही पूर्णपणे बरे झाले आहोत.

कोरोनाला प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडून दिल्या जाणा-या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. कोणतेही लक्षण आढळल्यास माहिती न लपवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन या तिन्ही रुग्णांमार्फत करण्यात आले आहे.

News Credit To:- NMC

मॉनसून में भारत पर फिर हमला कर सकता है कोरोना:-एक्सपर्ट की चेतावनी

भारत सरकार ने 25 मार्च को 21 दिन के लिए राष्ट्रव्यापी लॉकडाउन की घोषणा की थी. इसके बाद इस बीमारी से सख्ती से निपटने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लॉकडाउन 3 मई तक बढ़ा दिया.सरकार के कड़े फैसलों के कारण ही आज भारत में कोरोना संक्रमितों की संख्या दुनियाभर के देशों की तुलना में काफी कम है. भारत में अभी तक 27,000 से ज्यादा लोग कोविड-19 पॉजिटिव पाए गए हैं, जिनमें से साढ़े 800 से ज्यादा लोगों की मौत हुई है.

चीन ने महामारी को नियंत्रित करने के बाद यात्रा से जुड़े मामलों में थोड़ी ढिलाई बरती थी, जिसके बाद वहां फिर से कोरोना संक्रमितों के मामले बढ़ने लगे. राजेश आईआईएससी और टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआईएफआर) के अध्ययनकर्ताओं द्वारा कोरोना पर रिसर्च पेपर्स के सहयोगी लेखक भी हैं.

समित भट्टाचार्य ने आगे कहा कि आने वाले समय शायद कोरोना वायरस के कुछ नए मामलों में उछाल देखने को मिले और यही इस महामारी की दूसरी लहर होगी. उन्होंने संभावना जताई कि भारत में कोरोना वायरस की दूसरी लहर जुलाई के अंत या अगस्त में वापस लौट सकती है. भारत में जुलाई-अगस्त मॉनसून के महीने होते हैं. इस दौरान भारत में कोरोना संक्रमितों की संख्या इस पर निर्भर होगी कि हमने इसे नियंत्रित करने के लिए सोशल डिस्टेंसिंग का कितना ख्याल रखा है.

कोरोना वायरस के खतरे को कम करने के लिए दुनियाभर के देश लॉकडाउन का सख्ती से पालन कर रहे हैं. भारत में भी लॉकडाउन के बाद कोरोना की रफ्तार काफी धीमी हुई है. हालांकि लॉकडाउन और सोशल डिस्टेंसिंग से भारत के लिए अभी भी खतरा कम नहीं हुआ है. वैज्ञानिकों का दावा है कि कोरोना वायरस आने वाले समय में भारत को एक झटका और दे सकता है.

शिव नादर यूनिवर्सिटी में मैथेमैटिक्स डिपार्टमेंट के एसोसिएट प्रोफेसर समित भट्टाचार्य ने पीटीआई के हवाले से कहा, ‘इसमें को दोराय नहीं कि कोरोना संक्रमितों के मामले तेजी से ऊपर गए हैं और लॉकडाउन में कुछ हफ्तों के बाद इनका ग्राफ भी तेजी से नीचे गिरेगा.’

बेंगलुरु के इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस (आईआईएससी) के प्रोफेसर राजेश सुंदरसन भी समित भट्टाचार्य की इस बात से इत्तेफाक रखते हैं. राजेश कहना है कि सामान्य गतिविधियों के शुरू होते ही इंफेक्शन फैलने का खतरा तेजी से बढ़ सकता है.


Satranjipura has 80+ve and 503 cases quarantined

Nagpur:- Three more people from the town including one-and-a-half-year-old boy, who is now becoming the youngest patient in the district to date, tested positive for Covid-19 on Sunday bringing the total to 127.

Two of the three are linked to the Satranjipura chain, and from this, the number of positive cases increased to 80. On Sunday, it quarantined 123 more people from Satranjipura, bringing the number to 503. In connection with the Satranjipura case, 13 people have also been arrested raising the total number of people facing action to 15.

A 37-year-old woman from Mominpura is remaining a positive person. Officials from Nagpur Municipal Corporation (NMC) told, “The one-and-a-half-year-old boy who tested positively on Sunday was already at GMCH. On Saturday his parents tested positive. The pair had kept their child with them, “they said.

Another optimistic Satranjipura individual is a 55-year-old woman who has been quarantined at MLA Hostel. She was transferred to IGGMCH. The couple and the 55-year-old woman are Satranjipura neighbors to the 68-year-old deceased. They’d been quarantined on Thursday among 150 men.

Mominpura’s 37-year-old woman was already at GMCH, too. On April 24 her five-year-old son tested positive. The woman was admitted with the boy into GMCH’s Covid-19 Isolation Ward. Her husband tested positive too.

The husband is the brother of Choodi Gully, Mominpura, a 42-year-old resident who tested positive on April 18. Twelve of the same family members had tested positive earlier. The total number of cases from this family has risen to 13 with the latest girl.

The 42-year-old was looking after seven Tablighi Jamaatis based in Jabalpur who was camping at Darul Falah, Takia Deewanshah, Mominpura. On April 12 and 13, they had tested positive, after which the individual and his family were quarantined and examined.

The total number of Mominpura cases now stands at 25.

With some of 150 residents of Satranjipura quarantined on Thursday testing positive, municipal commissioner Tukaram Mundhe directed the officials to track and quarantine more neighbours. The team led by Assistant Commissioner Vijay Humne and Zonal Medical Officer Dr.Minakshi Mane on Sunday took in 123 people from 21 families including 93 adults and 30 children from 5 pm to 11 pm. Samples will be taken of all individuals on Monday.

Kalamna police have reported an offense in connection with Satranjipura against 13 people. Announced on sunday that Mundhe had ordered police action against ten people who were hiding in a godown at Vijay Nagar, Kalamna.

An offense pursuant to Section 188 (disobedience to public servant), Sections 269, 270 (negligent and malignant act likely to spread life-threatening disease infection) of IPC and Section 3 of the Epidemic Diseases Act-1897 was reported against the hiding 13 including 10, two nearby residents who were assisted in hiding and godown owner.

The 13 have women and children in it. They hid to avoid quarantine. People from Vijay Nagar spotted them and in the wee hours of Saturday told NMC and Kalamna police who were quarantining them at MLA Hostel. At Wathoda one of the family members was already in quarantine.

This is second such action linked to the case of Satranjipura with earlier booked a couple (Covid-19 positive) from Shanti Nagar and relatives of the deceased for hiding their children at Bhaldarpura. One of two children had tested positive later on as well.

कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यास मनपा तयार : महापौर संदीप जोशी

नागपूर:- कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी नागपूर महानगरपालिकेने कंबर कसली असून कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यास तत्पर आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असून मनपाच्या पाच रुग्णालयांचा कायापालट करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील १० दिवसात सुमारे ३०० ते ४०० खाटांची ऑक्सीजनसह व्यवस्था उभी करण्यात येईल, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

नागपूर शहरातील मनपाद्वारे संचालित पाच रुग्णालयांचा कायपालट करण्याचे कार्य सुरू झाले आहे. यामध्ये पाचपावली सुतिकागृह, पाचपावली हॉस्पिटल, सदर हॉस्पिटल, के. टी. नगर येथील एस.आर.ए. इमारत आणि आयसोलेशन हॉस्पिटलचा समावेश आहे. महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी (ता. २७) आयसोलेशन हॉस्पिटलला भेट देऊन सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. अत्याधुनिक सोयींनी युक्त आणि सुसज्ज हॉस्पिटल पुढील काही दिवसात तयार होणार आहे.

कोरोना विषाणू प्रसारासंदर्भातील नागपूरची स्थिती बघता भविष्यात येणाऱ्या संकटाचा विचार करून ह्या सोयी करणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच नागपूर महानगरपालिकेने हे पाऊल उचलले असून कोव्हिड -१९ च्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सोयी येथे करण्यात येत आहे. महापौर या नात्याने आपण या सर्व व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवून आहोत.

नागपूरकरांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सोयीसंदर्भात मनपा दक्ष असून नागपूरकरांना संपूर्ण उपचार येथेच उपलब्ध होईल, अशी व्यवस्था आम्ही करीत आहोत. यापेक्षा अजून काय चांगले करता येईल, यावरही आम्ही विचार करीत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाची साखळी इथेच तुटावी, असे तुम्हा-आम्हा सर्वांना वाटते. त्यासाठी नागपूरकरांचे संपूर्ण सहकार्य लॉकडाऊनदरम्यान अपेक्षित आणि आवश्यक आहे. बुहान ते सतरंजीपुरा हे अंतर साडेसहा हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. मात्र, सतरंजीपुरा आपल्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांनी आता निर्णय घ्यायला हवा. घरात राहून कोरोनाची साखळी तोडा, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी केले.

News credit To NMC

Exit mobile version