Modi drops hints about potential coronavirus lockout extension

Will the Modi Gouvernement extend the current coronavirus lockdown past April 14, or will it stick to the original end date?

The Prime Minister held a high-level video meeting with political leaders today on this subject. At the conference, he said that most of the recommendations he has made so far are for the continuation of the complete lockdown, or for the lockdown not to be lifted in one go, in order to tackle the spread of infection more effectively.

The PM held this meeting via videoconferencing with party leaders whose combined presence in Lok Sabha and Rajya Sabha adds up to five members of Parliament.

According to highly-positioned sources, the government is still mulling through all possible options. The next meeting with Chief Ministers on the matter is scheduled for Saturday (April 11). This comes in the midst of raging rumours that the two-week extension (until the end of April) of the lockout is likely to be on the cards.

The government has also looked at the possibility of expanding the lockdown after a number of state governments and health experts have suggested such a course of action.

“A number of state governments, as well as experts, are asking the Center to prolong the lockout. The central government is moving in this direction, “said the top government sources yesterday.

Progress comes days after Modi urged states to find ways to “stagger” the exit.

The central government initially decided to shift towards a staggered (district-wise) lifting of the lockdown. However, some major states thought that such a strategy would be too difficult because the epidemic is hardly easing.

Maharajbagh, Gorewada, take steps in the defense of animals

NAGPUR: The Maharashtra Zoo Authority (MZA) has advised all 13 zoos and animal shelters in the state to take top priority safety screening of the maintainers and the handlers of animal animals after a four-year-old tigress has been confirmed positive in the US in Bronx Zoo.
MZA worked to ensure that these zoos were operated by the Central Zoo Authority in compliance with all guidelines. On Tuesday Maharajbagh Zoo was inspected by Ravikiran Govekar, MZA member secretary. In the reserve of Maharashtra, there are 36 tigers, five lions, and 88 leopards.
Although the condition at state zoos is better despite the CZA Directives, we demanded that they all be sanitized and decontaminated and see animal husbandry tests for COVID-19.In Bronx zoo coronavirus transmitted by humans to the tiger

MECL Provided Ambulance To District Health Officers Nagpur

Nagpur: During a very critical time when a pandemic-COVID-19 has hit the entire nation MECL treated a district ambulance to the Ranchi district collectorate in order to augment its existing health care facilities and help the vulnerable.

In addition, during a important COVID-19 outbreak, an Ambulance has been sent to the Nagpur District Health Officer for use at the CSR Operation of MECL, the Public Health Center, Dhanla, Taluk-Mauda District, MECL.

Nagpur University Offers Isolation Centre for Covid -19 patients

Nagpur University was asked to give its university admin building for patients with a novel coronavirus pandemic when the isolation or quarantine centers in the city became required. In response to this, however, Nagpur has provided a hostel to the university rather than an administrative building, which is better suited for a stay that is required for the patients when testing for viruses.

Nagpur, including the NMC, is a local authority that is planning to combat the deadly virus without leaving a stone unturned .. And so they need the core of quarantine. The government depended on the Nagpur University administrative building. Since the admin house, however, had no facilities and a lot of other arrangements were required, the authority, therefore, thought a second time. The University Hostel was provided to that by the NU authorities.
Since hostels have the right toilets and other similar spaces which can be very useful for patients who are admitted to the virus. According to records, about 1190 students reside at the Nagpur University hostel. Since the hostels are actually empty, they can also be used for the isolation center. Such rooms are furnished with 500 beds and toilets. The VC has also suggested the same. Yet the city council also needs to agree to use it for a quarantine center. We also look at MLA or Aamdar Nivas and other buildings in Nagpur

सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसरातील सीमा सिल

नागपूर शहरातील सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसरातील रहिवासी नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासंबंधी खबरदारी म्हणून सतरंजीपूरा भागाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपा आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण भाग सिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी (ता.६) सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसरातील एका ६८ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्याने खळबळ माजली. यासंबंधी खबरदारी म्हणून मनपा आयुक्तांनी तात्काळ सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसरातील सर्व सीमा बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बडी मस्जीद, सतरंजीपूरा प्रभाग २१ या भागातील निश्चित केलेल्या कंटेनमेंट एरीया उत्तर-पूर्वेस शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, दक्षिण-पूर्वेस रचना कॉम्प्लेक्स, दक्षिण-पश्चिमेस जुना मोटार स्टँड चौक, उत्तर-पश्चिमेस मारवाडी चौक टी-पॉईंट हा सर्व भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.

अत्यावश्यक सेवा देणारे जसे, शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचारी, आवश्यक तातडीची सेवा करणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोअर्स् दुकानदार, पॅथॉलॉजीस्ट, रुग्णवाहिका इत्यादी तसेच पोलिस विभागातर्फे पास धारक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या व्यक्ती आदी सर्व वगळता इतर नागरिकांना बाहेर येण्या-जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःसह कुटुंबीयांची काळजी घ्यावी. कुणीही अनुज्ञेय कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. नियमीत स्वच्छता राखावी. आवश्यक मदतीसाठी मनपाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

 BACK TO HOME PAGE

मनपाच्या चमू अविरत करीत आहे गरजूंना अन्नदानाचे कार्य

दिव्यांग नागरिकांना रेशनचा पुरवठा : सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान गरजू व्यक्तींना दोनवेळच्या भोजनाचा पुरवठा तसेच दिव्यांग नागरिकांना रेशनचा पुरवठा व निराधार ज्येष्ठ नागरिकांना भोजन देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिका सेवाभावी संस्था आणि सामाजिका कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अविरत करीत आहेत.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात शहरातील प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत ही सेवा पोहचत आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापित, कामगार, परराज्यातील अडकेलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्न, पाणी, वैद्यकीय देखभाल आणि त्यांना इतर सुविधा देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने नागपूर शहरात असे १७२ निवारागृह उभारण्यात आले आहेत. त्याची क्षमता ६८०६ इतकी आहे. आजघडीला या निवारागृहात ५५९५ नागरिक वास्तव्यास असून दररोज ही संख्या वाढत आहे. ह्या संपूर्ण नागरिकांना दोन वेळचे भोजन पुरविण्यासाठी मनपाने २६केंद्रीय स्वयंपाकघराची व्यवस्था केली आहे. निवारागृहात असलेल्या आणि झोपडपट्यामधील गरजू व्यक्तींनाही या स्वयंपाकघराच्या माध्यमातून अन्न पुरविण्याचे कार्य मनपाच्या चमू दिवसरात्र करीत आहे. ४ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५५६, झोपडपट्ट्यातील ९९०५ असे एकूण १५४६१ नागरिकांना अन्न पुरवठा करण्यात आला. ५ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५७८ आणि झोपडपट्टीतील ११४३६ अशा एकूण १७०१४ नागरिकांना आणि ६ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५९५ आणि झोपडपट्टीतील १५९४७ अशा एकूण २१५४२ नागरिकांना दोन वेळचे भोजन पुरविण्यात आले.

दिव्यांगांना रेशन तर निराधार ज्येष्ठांना भोजन व्यवस्था
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून चार दिवसांपूर्वी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही मदतीसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली. यामाध्यमातून आतापर्यंत ४० दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्तींनी मदत मागितली असून मनपाच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांपर्यंत रेशन कीट पोहचविण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य २२०० कुटुंबांनाही रेशन किट पुरविण्यात आली आहे. रेशन किट मध्ये गव्हाचे पीठ (५ कि.ग्रॅ.), तांदूळ (२.५ कि.ग्रॅ.), डाळ (१.२५ कि.ग्रॅ.), मिरची पावडर (२५० ग्रॅम), हळद पावडर (१२५ ग्रॅम), मसाला (२५० ग्रॅम), मीठ (२५० ग्रॅम), खाद्य तेल (१ कि.ग्रॅ.), कांदे (२ कि.ग्रॅ.), आलू (२ कि.ग्रॅ.) या वस्तूंचा समावेश असून प्रत्येक कुटुंबाला सात दिवस पुरेल इतकी ही व्यवस्था आहे. तसेच निराधार ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन दोन वेळचे स्वादिष्ट भोजन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

सामाजिक संस्थांनी दिले दान
लॉकडाऊनदरम्यान गरजूंना मदत व्हावी यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढे येऊन दान दिले आहे. आतापर्यंत रोटरी क्लब, पॉवर ऑफ वन वेलफेअर फाऊंडेशन, मे. एस. एस. कुळकर्णी ॲण्ड असोशिएटस्‌, मे. कृष्णा ट्रेडिंग कंपनी, लॉयन्स क्लब यांच्या माध्यमातून ११४०० कि.ग्रॅ. गव्हाचे पीठ, ११२०० कि.ग्रॅ. तांदूळ, ५६०० कि.ग्रॅ. डाळ, ३३३० कि.ग्रॅ. तेल, ५५२० कि.ग्रॅ. मीठ, ९००० नग साबण, १०८.३ कि.ग्रॅ. हळद, ११८.३ कि.ग्रॅ. मिरची पावडर, २० कि.ग्रॅ. मसाला, १११०० कि.ग्रॅ. कांदे आणि १११०० कि.ग्रॅ. आलू नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. मॉईलने १० लाख रुपये दिले असून १५०० अन्न पॅकेट दररोज वितरीत करीत आहेत. विजय ढवंगळे आणि अजय ढवंगळे यांनी १० लाख रुपये आणि श्री रमण यांनी १२५०० रुपये दान दिले आहेत. मे. इस्कॉन, अन्न अमृत फाऊंडेशन, प्रियदर्शिनी बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, संस्कार बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, शगून महात्मा औद्योगिक सहकारी संस्था, नागपूर महिला सहकारी सनसञथा, मैत्री परिवार आदींच्या माध्यमातून अन्न तयार केले जात आहे.

मुलाच्या मदतीसाठी परदेशातील महिलेचा ई-मेल
लॉकडाऊनमध्ये नागपुरात अडकलेल्या एका परदेशातील विद्यार्थ्याच्या आईचा ई-मेल नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाला. त्या मेलमध्ये मोबाईल क्र. किंवा सविस्तर पत्ता नव्हता. केवळ संबंधित विद्यार्थी हजारी पहाड परिसरात राहतो, असा उल्लेख होता. केवळ या माहितीच्या आधारे मनपाच्या चमूने ग्रो व्हिल फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा पत्ता शोधून काढला आणि त्याला आवश्यक ते सामान पोहचविले. असेच एक उदाहरण वृद्ध महिला व तिच्या नातवांचे आहे. नातवांसोबत राहणाऱ्या या वृद्ध महिलेच्या नातवांनीही मदतीसाठी आर्जव केली. त्यांनाही दिवसरात्र भोजन पुरविण्याचे कार्य मैत्री परिवार संस्थेच्या माध्यमातून मनपा करीत आहे.

गुगल शीटच्या माध्यमातून संनियंत्रण
नागपूर शहरातील एक नागरिक शोबीत चांडक यांनी नागपूर महानगरपालिकेच्या या सेवाभावी कार्यात स्वत:चेही योगदान दिले आहे. मनपाची मदत योग्य ठिकाणी पोहचते की नाही याचे मॉनिटरींग करण्यासाठी त्यांनी एक गुगल शीट मनपा अधिकाऱ्यांना तयार करून दिली. कलर कोडच्या माध्यमातून झोननिहाय त्यात माहिती अपडेट केली जाते. दररोज येणारी मागणी आणि होणारा पुरवठा याबाबत यात अपडेट होत असून जर गरजूला मदत मिळाली नाही तर लगेच ते नोडल अधिकारी तथा उपायुक्त मिलिंद मेश्राम यांना माहिती होते. मग तातडीने संपर्क करुन त्यांना मदत पोहचविली जाते.

दान आणि मदतीसाठी करावा संपर्क
नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येणारे सेवाकार्य समाजसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून सुरू आहे. ज्यांना या सेवाकार्यात दान द्यायचे आहे अथवा ज्या गरजूंना मदत हवी आहे त्यांनी ०७१२-२५३९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२, ९८२३३३०९३४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

जीवनावश्यक वस्तुंचा नागरिकांना सुरळीत पुरवठा व्हावा

‘कोराना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान नागरिकांची फरफट होता कामा नये. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी व्यापारी संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा. काळाबाजार होता कामा नये. तसे लक्षात आल्यास व्यापारी संघटनांनीच अशा व्यापाऱ्यांवर स्वत:हून कारवाई करावी, असे आवाहन करीत प्रशासनातर्फेही अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, त्यात कुठलाही खंड पडू नये, घरपोच सेवेला प्राधान्य मिळावे, यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विविध व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, कोरोनाचे संकट देशावर आले आहे. नागपुरातही त्याची व्याप्ती आहे. त्यामुळे पुढील कालावधी विचारात घेऊन नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांवर आहे. या काळात नागरिकांची पिळवणूक होता कामा नये. यावर आता व्यापाऱ्यांनीच अंकुश आणायला हवा व सामाजिक बांधिलकी जपावी.
व्यापाऱ्यांना जर वितरण , उत्पादन आणि वाहतूकसंदर्भात काही अडचणी असेल तर त्या प्रशासनाला नक्की सांगाव्या. ऑनलाईन लिंक देऊन घरपोच सेवा देता येईल का, याचा व्यापाऱ्यांनी अवश्य विचार करावा. नागरिकांना भाजीबाजारात जायची गरज पडू नये, अशी व्यवस्था मनपाने केली. घरपोच किंवा घरासमोर भाजीपाला नागरिकांना मिळतो आहे, त्यादृष्टीने अन्य व्यापाऱ्यांनीही विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
व्यापारी प्रतिनिधींनीही आपली भूमिका यावेळी मांडली. सध्या मागणी कमी आहे. परंतु पुढील काही महिने पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. फक्त सध्या बाजारात कमी प्रतीचा गहू उपलब्ध आहे. चांगल्या प्रतीचा गहू मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये आहे. वाहतूक नियमित झाल्यास तेथून तो गहू उपलब्ध होऊ शकेल. व्यापारी त्यांच्या सेवा देत आहेत. माल आला तरी ते उतरविण्यासाठी मजूर मिळत नाही, अशा अडचणी त्यांनी मांडल्या.
यावर बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला प्रतिबंध नाही. चांगला गहू जेथून मागवायचा आहे तेथून मागवा. काही अडचण आली तर तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यावर मार्ग काढण्यात येईल. व्यापाऱ्यांनी व्यापार करताना स्वत:चेही आरोग्य जपावे व इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी वाहतूक परवानगीसंदर्भात माहिती दिली. प्रादेशिक परिवहन कायारलयात २४ बाय ७ नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. ०७१२-२५६१६९८ असा तेथील क्रमांक आहे. यासोबतच ८१०८६८३९१९ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. वाहनाची पास ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करता येईल. त्यासाठी mh31@mahatranscom.in यावर अथवा https://transport.maharashtra.gov.in या वेबलिंकवर जाऊन अर्ज करता येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी दिली.
बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चं.भा. पवार, प्रभारी सह आयुक्त (औषधे) प्र. ना. शेंडे, प्रभारी सहायक आयुक्त अभय देशपांडे, सहायक कामगार आयुक्त एन.पी. मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव प्रशांत नेरकर, होलसेल ग्रेन ॲण्ड सीडस्‌ मर्चंट असोशिएशनचे अध्यक्ष संतोषकुमार अग्रवाल, सचिव प्रताप मोटवानी, नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे राजेंद्र कावडकर,वीरभान केवलरामानी, महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे श्रीकांत दुबे, नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे ज्ञानेश्वर रक्षक, नागपूर कन्फेक्शनरी बेकरी व नमकीन असोशिएनशचे प्रदीप धमकानी, बेकरी असोशिएशनचे विजय ग्वालानी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेकिंग:-हिंगणा एमआयडीसी परिसरात प्रिंटिंग इंक बनविणाऱ्या व्यंकटेश उद्योग कारखान्याला रात्री दोन वाजता लागली आग

ब्रेकिंग:-हिंगणा एमआयडीसी परिसरात प्रिंटिंग इंक बनविणाऱ्या व्यंकटेश उद्योग कारखान्याला रात्री दोन वाजता लागली आग बचाव कार्य अजूनही सुरु

व्यंकटेश उद्योग या कारखान्याला लागून असलेल्या साईनाथ पॅकेजिंग या खर्डा  तयार करण्याच्या कंपनीला सुद्धा आगीने वेढले   रात्री 2 वाजतापासून एमआयडीसी अग्निशमन दलाचे ३ ,वाडी अग्निशमन१ व नागपूर महानगरपालिका च्या ४ गाड्या अशा एकूण आठ गाड्या आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आतापर्यंत साईनाथ कंपनी तील आग आटोक्यात आली परंतु या करखाण्याचे प्रोडक्शन युनिट पूर्ण जळून खाक झाले सोबतच तयार माल जळाला तर व्यंकटेश कारखान्यात आग विझविण्याचे काम सुरू आहेत अग्निशमन दलाचे जवळपास पन्नास कर्मचारी अधिकारी घटनास्थळी आहेत.

नागपुर :20 वर्षीय गर्भवती कोरोना संदिग्ध की मौत । मेडिकल के वार्ड नंबर 25 में भर्ती थी । 

नागपुर :20 वर्षीय गर्भवती कोरोना संदिग्ध की मौत । मेडिकल के वार्ड नंबर 25 में भर्ती थी । चंद्रपुर जिले के सिंदेवाही की रहने वाली थी । कोरोना रिपोर्ट का इंतजार है ।

 

महा मेट्रोच्या कामगाराकरिता आयसोलेशन चेंबरची निर्मिती,कामगारांची नियमित आरोग्य तपासणी,काउंसेलिंग सेशन सुरु

नागपूर : कोरोना वायरसचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्याकरिता महा मेट्रोद्वारे सुरुवातीपासूनच खबरदारी घेतल्या जात आहे. यांच अनुषंगाने महा मेट्रोद्वारे कामगार कॉलनी मध्ये औषध फवारणी तसेच कामगारांची नियमितपने आरोग्य तपासणी केल्या जात आहे. वायरस प्रादुर्भाव रोखण्याकरिता आवश्यक सर्व खबरदारी महा मेट्रोद्वारे घेण्यात येत आहे.
महा मेट्रो द्वारे शहरातील विविध भागामधील ४० कामगार कॉलोनी मध्ये ३००० कामगारांकरिता या प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. औषध फवारणी आणि नियमित आरोग्य तपासणी व्यतिरिक्त कोविड-१९ व कुठल्याही आजाराची खबरदारी म्हणून तपासणी केल्या जात आहे. मेट्रो निर्माण कार्यात कार्यरत झारखंड राज्यातील कामगार श्री. कुलदीप सिंह ने कामगार कॉलोनी मध्ये उपलब्ध असलेल्या सोई सुविधा पासून प्रसन्नता व्यक्त केली.
८ डॉक्टर आणि ११ नर्स विविध कामगार कॉलोनीमधील कामगाराची काळजी घेत असून कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीकरिता रुग्णवाहिका याठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. २० सुरक्षा रक्षाकाची चमू आपत्कालीन परिस्थिती करिता सदैव कार्यरत आहे.
मुख्य म्हणजे या सर्व कामगार कॉलोनीमध्ये आयसोलेशन चेंबरची निर्मित करण्यात आली आहे. या ठिकाणी कार्यरत श्री. मोहम्मद सबीर या कामगारने सांगितले कि, कॉलोनी मध्ये नियमितपणे साफसफाई करण्यात येते असून कामगांराचे थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केल्या जाते.
उत्तर प्रदेश राज्यातील श्री. समशेर सिंह या कामगाराने सांगितले कि, कोविड-१९ मुळे उदभवलेल्या समस्येमुळे सोशल डीस्टसिंग पाळत असल्याचे सांगितले. कामगारांनमध्ये जागरुकता आणन्याकरिता प्रशिक्षण सत्र आणि पोस्टरच्या माध्यमाने जागरुकता अभियान राबविल्या जात आहे. आतापर्यत सुमारे १३० जागरूकता अभियान राबविले असल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व कामगारांना सुरक्षा उपकरण ज्यामध्ये मास्क, हातमोजे इत्यादीचे वाटप करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त १२ थर्मल स्कॅनर (इंफ्रारेड थर्मामीटर) शरीराचे तापमान मोजण्याकरिता उपलब्ध आहे.वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी नियमितपणे या कॉलोनीची पाहणी करून आवश्यक काळजी घेत आहे. महा मेट्रोद्वारे कोविड-१९ च्या बचावापासून कामागांराकरिता आवश्यक सर्व उपाय योजना करण्यात येत असून कामगार कॉलोनीची आवश्यक काळजी घेण्यात येत आहे.
Exit mobile version