पॉजिटिव संख्या कमी होत आहे, रिकवरीचा दर वेगाने वाढला

नागपूर: डॉक्टरांनी 15 ऑक्टोबरपर्यंत हळूहळू कोरोनाचे कहर कमी करण्याची अपेक्षा केली होती. ती योग्य ठरत आहे. डॉक्टरांचे मत एकदम बरोबर ठरत आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वेगाने कमी होत असून मृतांचा आकडादेखील नियंत्रित होत आहे.

जिल्ह्यात रविवार रोजी एकुण 482 तर ग्रामीण भागातील 337, शहर भागातील 139 आणि जिल्ह्यातील बाहेरील 6 नवीन रुग्ण आढळले. त्याच वेळी, शहरातील 10, ग्रामीण भागातील 7 आणि जिल्ह्याच्या बाहेरील 6 लोकांसह 23 जणांचा मृत्यू झाला.

आता जिल्ह्यात एकूण पॉजिटिव्ह संख्या, 86,572 पर्यंत पोहोचलीय, तर मृतांचा आकडा 2790 वर पोहोचला आहे. पॉजिटिव रूग्णांची आणि मृत्यूची संख्या कमी झाल्याने प्रशासनासही दिलासा वाटू लागला आहे. परंतु डॉक्टर म्हणतात की कोरोना चेन तुटलेली नाही. जरी ती कमकुवत झाली, तरीही कोविड 19 टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे फार महत्वाचे आहे.

सक्रीय केसेसही कमी: जिल्ह्यात सक्रिय केसेसही कमी झाल्या आहेत. रविवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आता 8138 सक्रिय केस असून त्यापैकी 5354 शहरातील आणि 2784 जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहेत. विविध पॅथॉलॉजी लॅबमध्ये रविवारच्या 5959 नमुन्यांमध्ये चाचणी घेण्यात आली, त्यापैकी फक्त 482 पॉजिटिव्ह आढळले. कोरोनाची तीव्रता कमी झाल्यामुळे शहरातील लोकांचा नित्यक्रमही सामान्य झाला आहे. आतापर्यंत संक्रमित 86572 पैकी एकूण 75644 रुग्ण निरोगी झाले आहेत. रविवारीसुद्धा, 927 रुग्ण निरोगी होऊन परतले. आता रिकवरी दरही वाढला आहे. एकेकाळी निरोगी लोकांची टक्केवारी खाली 60~65 टक्क्यांवर आली होती पण आता ती 87.37 टक्के झाली आहे. यामुळे डॉक्टरांमध्येही उत्साह आहे.

एकूण संक्रमित 86,572.
आतापर्यंत 75,644 निरोगी
आतापर्यंत 2790 मृत्यू
रविवारी 482 पॉझिटिव्ह

धोका अद्याप टळला नाही, कोरोना साखळी कमजोर होते आहे मात्र तुटलेली नाही आहे

नागपूर: कोरोनाचा कहर आता जरा कमी होताना दिसत आहे. शनिवारी बाधित रूग्णांची संख्या 627 होती. तसेच मरण पावणारेही फक्त 9 होते. तर जिल्ह्याबाहेरील 8 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यात आतापर्यंत संक्रमित रूग्णांची संख्या 86090 वर पोहोचली आहे. तर एकूण मृत्यू 2767 झाले आहेत. डॉक्टरांच्या अंदाजानुसार रुग्णांची संख्या कमी होत आहे. पण धोका टळलेला अजिबात नाही. पुढील महिन्यापासून थंडी वाढू लागल्यावर कोरोना रूग्णांची संख्या वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे.

शनिवारी 832 रुग्णांना बरे झाल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. यासह, आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 74717 पर्यंत पोहोचली आहे. 24 तासात जिल्ह्यात 6462 लोकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 2895 अँटीजेन चाचणींचा सर्वाधिक समावेश होता.

आता जिल्ह्यातील रिकवरी प्रमाण वाढून 86.77 टक्के झाले आहे. जो आतापर्यंतचा सर्वोच्च आहे. एकूण 8606 सक्रिय प्रकरणे आहेत. ज्यामध्ये अर्ध्याहून अधिक लोक घरातच विलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत. जरी संक्रमित रूग्ण कमी होत आहेत, परंतु डॉक्टरांचा अंदाज आहे, धोका पूर्णपणे टळलेला नाही. पुढील महिना अधिक थंडीचा येईल. या स्थितीत, सर्दी, पडसे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे कोरोना रूग्णांची संख्याही पुन्हा एकदा वाढू शकते. म्हणूनच डॉक्टरांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

86090 एकूण संक्रमित.
2767 चा मृत्यू
74717 बरे होऊन घरी
शनिवारी 627 सकारात्मक

आमदार निवास कोविड केंद्र हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रिकामे

नागपूर: हिवाळी अधिवेशनाचे सत्र पाहता आमदार निवास इमारत क्र. २०१ मध्ये निर्मिलेले कोविड केअर सेंटर रिकामे केले गेले आहे. या इमारतीचे सॅनिटाईजेशन करण्यात आले आणि आता इमारत आठवडाभर बंद राहील.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून आमदार निवास इमारत क्र.२ व ३ चे कोविड केअर सेंटर बनवले गेले. येथे कोविड रूग्णांसाठी २२० खोल्या आरक्षित होत्या. ७ डिसेंबरपासून असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा प्रशासनाला एक महिन्यापूर्वी एक पत्र देऊन कोविड केअर सेंटर रिकामे करण्याची विनंती केली होती. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे वर्क फ्रॉम होम स्थितीत असल्यामुळे या पत्रावर तातडीने प्रक्रिया होऊ शकली नाही. जिल्हा प्रशासनाने बुधवारी आमदार निवासस्थानाची इमारत क्र. 3 मधील केंद्र रिकामे करण्यास परवानगी दिली. 

यानंतर इमारत क्र. ३ कोविड केअर सेंटर रिकामे केले गेले. येथे 70 बेड आरक्षित होते. इमारत क्र. 2 ऑक्टोबर 15 पर्यंत रिक्त करण्यास सांगितले गेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) इमारत क्र. २ येथे सॅनिटायझेशन करून कोणाच्याही प्रवेशावर बंदी घातली आहे. एका आठवड्यानंतर ही इमारत आतून रंगविली जाईल. देखभाल व दुरुस्तीची कामेही सुरू केली जातील.

बिनामास्क भटक्यांची संख्या वाढतीच: 237 च्या विरोधात पथकाची कारवाई

नागपूर.: कोरोनाशी सामना करण्यासाठी लागू मनपाच्या सर्व उपाययोजना सक्ती असूनही, काही लोकांचे त्यांत समर्थन मिळत नाही. त्याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे बाहेर पडताना मास्क लागणे आवश्यक असूनही बरेच लोक मास्क न घेता बाहेर पडत आहेत. वेळ तर अशी आली आहे की या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

गुरुवारी मनपाच्या उपद्रव संशोधन पथकाच्या वतीने स्वतंत्र भागात वेगवेगळ्या कारवाई करून एकूण 237 लोकांना दंड ठोठावण्यात आला. 500 रु प्रति व्यक्ती एकूण ₹1.18 लाख दंड वसूली केला गेलेला आहे, आतापर्यंत एकूण 10784 लोकांवर उपद्रव संशोधन पथकाने कारवाई केली आहे. ज्यामध्ये ₹37,51,000 दंड वसूली केला गेलेला आहे

मनपा मुख्यालयातही कारवाई: उल्लेखनीय आहे की काही काळापूर्वीपर्यंत मास्क न घालण्यासाठी ₹200 दंड वाढवून तो ₹500 पर्यंत वाढविण्यात आला. असे असूनही नियम तोडणा-यांची संख्या कमी करता आलेली नाही. गुरुवारी केलेल्या कारवाईत लक्ष्मीनगर झोनमध्ये 42, धरमपेठ झोनमध्ये 45, हनुमाननगर झोनमध्ये 29, धंतोली झोनमध्ये 14, नेहरू नगर झोनमध्ये १२, गांधीबाग झोनमध्ये १६, सतरंजीपुरा झोनमध्ये १८, लकडगंज झोनमध्ये १२, आसिनगर झोनमध्ये 23, मंगळवारी झोनमध्ये 20 जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. मनपा मुख्यालयात मास्क न घेता फिरणार्‍या ब-याच जणांवरही कारवाई करण्यात आली.

९३ वर्षाचे वृध्दाने केली कोरोनावर मात

नागपूर, ता. ९ : महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर मधून शुक्रवारी ९३ वर्षाचे पदमाकर चवडे कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले. मागील काही दिवसापासून ते इंदिरा गांधी रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव नागपूरात नियंत्रणात येत आहे तसेच मृत्यू संख्यासुध्दा कमी झाली आहे. कोरोनावर सकारात्मक दृष्टीकोण ठेवून सहज मात करता येते असे पदमाकर चवडे यांनी दाखवून दिले आहे. पदमाकर चवडे यांना कोव्हीड – १९ चे लक्षणे दिसल्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मेयो रुग्णालयमध्ये ७ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर येथे भरती करण्यात आले. आई.जी.आर मध्ये त्यांना डॉ. अजय हरदास यांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. डॉ. हरदास यांनी सांगितले की, त्यांना ऑक्सीजन सपोर्ट देण्यात आला होता. नंतर त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत झाली आणि त्यांना शुक्रवारी सुटटी देण्यात आली. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी १०० हून अधिक बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना भरती केला जात आहे. सध्या ४१ रुग्णांना उपचार घेत आहे. अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी आई.जी.आर चे डॉक्टर व स्टाफचे अभिनंदन केले आहे.

सक्रिय प्रकरणं होताहेत कमी, परंतु खबरदारी घेणे फार महत्वाचे

नागपूर: आता याघडीला कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. एकीकडे मृत्यूसंख्या कमी झालेली आहे, तर दुसरीकडे पॉजिटिव्ह रुग्णही कमी झाले आढळत आहेत. परंतु असे असूनही प्रशासनाने मात्र कोरोना रोखथामासाठी खबरदारी घेण्याचे व लक्षणे आढळल्यास त्वरित तपासण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी 636 रुग्णांमध्ये संसर्ग होण्याची पुष्टी झाली. त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण सक्रिय प्रकरणे 8828 झाले आहेत. यापैकी 5670 रूग्णांवर घरातच विलगीकरणात उपचार सुरु आहेत.

कोरोना विषाणूची तीव्रता कमी होत असल्याचे दिसते आहे. शुक्रवारी 24 तासांत एकूण 6809 लोकांची चाचणी केली गेली. यामध्ये, 636 लोकांमध्ये संसर्गाची पुष्टी झाली. यासह जिल्ह्यात आतापर्यंत संक्रमित रूग्णांची संख्या 85463 वर पोहोचली आहे. दरम्यान, 26 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 7 ग्रामीण आणि 13 शहरी रुग्णांचा समावेश आहे. तर 6 रुग्ण इतर जिल्ह्यातील होते. यासह आता मृतांची संख्या 2750 वर पोहोचली आहे.

निष्काळजीपणा नको: जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 50594 चाचची करण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागात अजूनही तपासाची गती कमी आहे. असे समजते की ग्रामीण भागात तपासणीची सुविधा पुरविली गेली आहे, परंतु लोक पहिल्या टप्प्यात त्या घ्यायला येत नाहीत. शुक्रवारी ग्रामीण भागात एकूण 234 रुग्ण पॉजिटिव्ह आढळले आहेत. 1271 लोकांना सुट्टी देण्यात आली. यासह आतापर्यंत 73885 रूग्ण बरे झाले आहेत. यामुळेच आता जिल्ह्यातील रिकवरी दर वाढून 86.45 टक्के झाला आहे. जरी रुग्णांची संख्या कमी होत आहे. तरी डॉक्टरांनी लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. थोडीशी निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंबासाठी समस्या बनू शकते.

85463 एकूण संक्रमित.
2750 चा मृत्यू
73885 बरे होऊन घरी
शुक्रवारी 636 पॉझिटिव्ह

जिले में टेस्ट स्पीड अभी भी कम है, डॉक्टरों ने सावधानी बरतने की अपील की

डाक्टरों की माने तो मौसम में हो रहे बदलाव का असर सीधे तौर पर होता है। सितंबर की अपेक्षा अक्टूबर में कोरोना से मरने वाले मरीजों की संख्या कमी आ रही हैं।वहीं पाजिटिव पेशेंट भी कम हो रहे हैं।लेकिन प्रशासन द्वारा टेस्टिंग में सुस्ती बरती जा रही है।यही वजह है कि मामूली सर्दी, जुकाम को भी हल्के में लेना नुकसानदायक हो सकता है।

परन्तु संदेह होने पर तुरंत टेस्ट कराने पर ही बीमारी का पता चल सकेगा।इस बीच बुधवार को 976 नये संक्रमितों के साथ ही अब तक टोटल 84081 पर पहुंच गई है।वहीं अब तक 71602 मरीज स्वस्थ होकर अपने काम पर लौट चुके हैं।

मौसम का बिगड़ा हुआ मिजाज बार-बार लोगों को परेशान कर रहा है।अक्टूबर में ज्यादातर ठंड शुरू हो जाती है।लेकिन अब तक बारिश का ही सिलसिला यूंही जारी है। बेमौसम की बारिश एक बार फिर मुसीबतें ला सकती हैं।इस मौसम में बच्चों में सर्दी, जुकाम आम हो जाता है।और इसके कारण ही डाक्टरों ने सावधानी बरतने की अपील की है।

84081 कुल संक्रमित

2704 की मौत

71602 हुये ठीक

976 बुधवार को पाजिटिव

बुधवार को 24 घंटे के अंदर 22 मरीजों की मौत हो चुकी है। इनमें जिले के 18 मरीजों का समावेश रहा। जबकि 4 मरीज जिले से बाहर के रहे।इस तरह अब तक मरने वालों की संख्या 2704 हो गई है।बुधवार को 835 मरीजों को ठीक होने के बाद छुट्टी दी गई। इस तरह अब तक 71602 मरीज ठीक होकर अपने घर जा चुके हैं। अधिकाधिक पेशेंट्स के ठीक होने की वजह से अब रिकवरी रेट 85.16 फीसदी तक आ गया है। बुधवार को 976 पेशेंट्स में संक्रमण की पुष्टी हुई।वहीं अब तक टोटल 84081 हो गये हैं।फिलहाल जिले में 9775 एक्टिव केस है।इनमें आधे से अधिक होम आयसोलेशन में है।

पिछले दिनों प्रशासन द्वारा घर-घर जाकर लोगों की जांच की मुहिम शुरू की। इसके बावजूद टेस्ट कराने वाले नहीं बढ़ रहे हैं। बुधवार को कुल 5918 लोगों की जांच की गई। बताया जा रहा है कि जिन कर्मचारियों को जांच का दायित्व सौंपा गया है वे सिर्फ जानकारी लेकर ही डॉक्यूमेंट तैयार कर रहे हैं। वहीं महानगर पालिका द्वारा शुरू की गई मोबाइल फैसिलिटी का भी अधिकाधिक लोग फायदा नहीं ले रहे हैं।

गंभीर होने के बाद ही लोग हॉस्पिटल्स में जा रहे हैं और कोविड का टेस्ट करवा रहे हैं।शंका होने पर तुरंत हर व्यक्ति को टेस्ट करवाना चाहिए। बात करें टेस्टिंग की तो नागपुर को छोड़कर जिले में  टेस्ट की गति अभी भी धीमी ही रही है।

महानगर पालिका नागपुर ने जीता स्टार म्युनिसिपल लीडरशीप अवॉर्ड

महानगर पालिका द्वारा ग्रीन विजिल फाऊंडेशन के सहयोग से शुरू किए गए उपक्रम को संस्था द्वारा गंभीरता से लिया गया। पुर्णिमा दिवस के अवसर पर एनर्जी सेविंग का मैसेज देनेवाली नागपुर मनपा को अर्थ डे नेटवर्क इंडिया की तरफ से ऊर्जा बचत वर्ग में स्टार म्युनिसिपल लीडरशीप अवार्ड से सम्मानित किया गया। महानगर पालिका की इस सफलता के लिए महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्णन बी ने सभी स्वयंसेवक और महानगर पालिका कर्मचारियों का स्वागत किया।

ज्ञात हो के नागपुर में तत्कालीन महापौर अनिल सोले के मार्गदर्शन में वर्ष 2014 से ऊर्जा बचत का उपक्रम चलाया जा रहा है।विशेष तौर पर पुर्णिमा की रात में गैर जरूरी लाईट व बल्ब बंद करने की अपील लोगों से की जाती है।जिसमें रात 8 से 9 बजे तक लोगों को और दूकानदारों को बल्ब बंद करने की अपील की जाती है।

ऐसा अनुमान है कि इस उपक्रम के चलते अबतक 2.53 लाख किलो कार्बन उत्सर्जन पर नियंत्रण पाने में सफलता मिली है।यहां तक कि देश के प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने भी इस उपक्रम की प्रशंसा की। एलईडी प्रकल्प के तहत महानगर पालिका ने 1.39 लाख पारंपरिक पथदीपो को एलईडी लाईट में परिवर्तित किया है।जिसके कारण वर्ष में 2.27 लाख युनिट कार्बन फुटप्रिंट की सेविंग हुई है।

महापौर संदीप जोशी ने यह भी कहा कि शहर की ग्रीन सिटी के रूप में पहचान है।अब इस पुरस्कार से पर्यावरण की दृष्टि से शहर एक कदम आगे बढ़ा है।

ग्रीन सिटी के साथ ही एनर्जी सेविंग करनेवाले शहर के रूप में देश में नाम दर्ज हुआ है।इस सफलता के पीछे जनता के सहयोग के साथ ही ग्रीन विजिल फाऊंडेशन के स्वयंसेवकों द्वारा की गई जनजागृति की भी अहम रोल है।अब शहर के नागरिकों के रूप में हर एक की जिम्मेदारी बढ़ गई है।हर एक व्यक्ति ने पुर्णिमा की रात घर और आंगन में बिजली बंद रखकर अपनी नैतिक दायित्व निभाना चाहिए।

कोरोना: मृत्युदर कमी, रिकवरी दर वाढला

नागपूर:- शहरातील जानकार डॉक्टरांच्या अंदाजानुसार कोरोना रूग्णांचे संख्येत कमी होत आहे. सोमवारी, हा आंकड़ा 36 तर मंगळवारी 23 जणांचा मृत्यू झाला. यातील 5 रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील होते. यासह जिल्ह्यात आतापर्यंत 2682 रुग्णांचा मृत्यू झालाय. मंगळवारी वाढलेल्या चाचण्यांमुळे पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

सोमवारी 746 पॉझिटिव्ह आढळले होते. तर मंगळवारी संक्रमित रूग्णांची संख्या 898 होती, कालचे पॉझिटिव्ह रूग्णांसह जिल्हानिहाय आजवर 83105 संख्या झाली आहे. त्यापैकी 70767 बरे झाले आहेत. मंगळवारी जिल्ह्यात 7785 लोकांची चाचणी करण्यात आली. सर्वाधिक एन्टीजेन चाचण्या 4556 होत्या. ग्रामीण भागात 337 आणि शहरातील 556 रुग्ण संक्रमित झाले आहेत. शहरात रूग्णवाढ कमी होत असतानाच ग्रामीण भागात ही संख्या वाढत असल्याचे दिसते.

मंगळवारी 1425 रुग्णांना बरे झाल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात सध्या 9656 सक्रिय प्रकरणे आहेत. जे मागील आठवड्यापेक्षा कमी आहे. घरात विलगीकरणात असलेल्यांची संख्या जास्त: जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 487049 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. डॉक्टरांचा अंदाज आहे की 15 ऑक्टोबरपर्यंत शहरातील रूग्णांची संख्या कमी होईल. ग्रामीण भागातील वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी आढळत आहे.

त्यांच्या तुलनेत, बरे झाल्यानंतर घरी जाणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळेच आता जिल्ह्यात रिकवरी दर 85.15 टक्के झाला आहे. खरं तर मृत्यूसंख्या आटोक्यात ठेवूनच अंदाज लावला जाऊ शकतो की साथीचा प्रादुर्भाव कमी होत आहे अथवा नाही. गृह विलगीकरणात उपचार घेणार्‍या रूग्णांची संख्या 5975 आहे. म्हणजेच आता रुग्णालयांमध्ये रूग्णांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारपर्यंत विविध रुग्णालयात एकूण 3681 रुग्ण दाखल होते.

मृत्युसंख्येत किंचीत घट, चाचण्याही घटल्या

नागपूर:- शहरात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोना मृत्यूंची संख्या अचानक वाढली होती. परिस्थिती अशी होती की दररोज 50 हून अधिक रुग्ण मृत्यूमुखी पडत होते, परंतु ऑक्टोबरपासून या मृत्यूंची संख्या कमी होऊ लागली आहे. डॉक्टरांनूसार 15 ऑक्टोबर नंतर, पॉजिटिव्ह आणि मृत्यू या दोहोंची संख्या हळूहळू कमी होईल. दरम्यान, शनिवारी 22 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2596 रुग्णांनी आपला जीव गमावला. जिल्ह्यातील कोरोनाच्या चाचण्या पुन्हा एकदा कमी होऊ लागल्या आहेत. या महिन्यात अधिकाधिक चाचण्या केल्या पाहिजेत, जेणेकरुन रुग्ण आढळून येतील. पण प्रशासन सुस्त असलेले दिसत आहे.

एकूण 22 रुग्ण मरण पावले, ज्यात 4 ग्रामीण आणि 17 शहरी रुग्णांचा समावेश आहे. एक रुग्ण जिल्ह्याच्या बाहेरील आहे. शनिवारी 876 लोकांत या संसर्गाची पुष्टी झाली. यासह जिल्ह्यात आता संक्रमित रूग्णांची संख्या 80844 पर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण सक्रीय प्रकरण 11250 आहे. यापैकी बर्‍याच रूग्णांवर घरातच विलगीकरण करत उपचार सुरु आहेत.

ग्रामीण भागात तपासण्या वाढवण्याची गरज:

या महिन्यात अधिकाधिक चाचण्या करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून संक्रमित व्यक्तींस वेळेत शोधून त्यावर उपचार करता येईल. दरम्यान आणखी काही खासगी प्रयोगशाळांनाही आता तपासण्यांची मान्यता देण्यात आली आहे. या स्थितीत, चाचण्या अधिकाधीक व्हावयास हव्या, परंतु परिस्थिती याउलट असल्याचे दिसून येते. शनिवारी 24 तासात सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांसह फक्त 5452 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये 2064 एन्टीजेन चाचण्यांचा समावेश होता. मेयो आणि मेडिकलमध्ये चाचण्या कमी होती असल्याचे आढळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 469336 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात परीक्षनं वाढवण्याची गरज आहे. कारण शहरानंतर ग्रामीण भागातील हा प्रवाह वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कमी होत जाणा-या चाचण्यांमुळे पॉजिटिव दर देखील खाली येत आहे असे दिसतेय. शनिवारी, 1821 रूग्ण बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 66998 रूग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या, रिकवरी दर 82.87 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

आतापर्यंत शहरातील स्थिती
80844 एकूण संक्रमित.
66998 ठीक झाले
2596 चा मृत्यू
शनिवारी 876 पॉझिटिव्ह

Exit mobile version