मोबाईल टॉवरबाबत नागपूर महापालिकेची सुस्ती नागरिकांच्या जीवावर?

नागपूर (Nagpur) : शहरात जवळपास नऊशे मोबाईल टॉवर असून, यातील फक्त ७० टॉवर अधिकृत आहेत. विशेष म्हणजे अनेक जुन्या इमारतींवर हे टॉवर उभे करण्यात आले आहे. या टॉवरमधून निघणारे रेडिएशन आरोग्यासाठी धोकादायक आहेत. मोबाईल टॉवर धोरण मंजूर झाल्यानंतरही महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सुस्तीमुळे एखादवेळी नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता बळावली आहे.

शहरात नऊशे मोबाईल टॉवर आहेत. यापैकी केवळ ७० मोबाईल टॉवरला परवानगी आहे. या अवैध मोबाईल टॉवरकडूनही महापालिका मालमत्ता कर वसूल करीत आहेत. अनधिकृत मोबाईल टॉवर नियमित करण्यासंदर्भात धोरण असताना नगररचना विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. नगररचना विभागाचे संपूर्ण लक्ष बहुमजली इमारतीच्या नकाशे मंजुरीकडे असल्याचे सुत्राने सांगितले. बहुसंख्य मोबाईल टॉवर जुन्या इमारतीवर आहे. या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिटपण झाले नाही. त्यामुळे एखादवेळी मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. याबाबत नगर रचना विभागाचे सहायक संचालकांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या इंटरनॅशनल एजेन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरनुसार मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे रेडिएशनची तीव्रता किती असावी, निवासी क्षेत्रात मोबाईल टॉवरला मंजुरी देण्याबाबत काही नियम आहेत. परंतु शहरात या नियमांची पायमल्ली होत आहे. शहरात मोबाईल टॉवरला मंजुरी देण्याची जबाबदारी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे आहे. २ मार्च रोजी झालेल्या मनपाच्या शेवटच्या सभेत मोबाईल टॉवरला परवानगीसाठी धोरण मंजूर करण्यात आले. त्यानंतर ५ मार्चपासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. प्रशासकाच्या काळात नागरिकांच्या हितासाठी प्रशासकीय कामांना वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु अजूनही या धोरणाबाबत नगररचना विभाग मूग गिळून आहे.

बापरे! 44.6 तापमानात वृक्ष लागवड; नागपूर महापालिका करणार 2 कोटींचा

नागपूर (Nagpur) : महापालिकेला प्रामाणिकपणे वृक्ष लावायचे आणि जगवायचे आहेत की फक्त दिखावा करायचा आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. वृक्ष केव्हा लावावे याचे काही नैसर्गिक नियम आहेत. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चक्क ४४.६ डिग्री तापामानात वृक्ष लागवड मोहीम सुरू केली आहे. यावर तब्बर सव्वा दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. भर उन्हाळ्यातील लागवडीने वृक्ष जगण्याची सुतराम शक्यता नसल्याने सव्वा दोन कोटी रुपयांचा पालापाचोळा होणार आहे.

महापालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर वि‌द्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरातील जागेमध्ये आठ हजार रोपांची लागवड करून येथे वन आच्छादन करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीला महापालिका आणि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित थाटात सुरुवात करण्यात आला. सध्या नागपूरचा पारा ४४ डिग्रीच्यावर गेला आहे. या तापमानात वृक्ष लागवडीसाठी शहरातील भौगोलिक स्थिती अनुकूल नाही, ही बाब शहरातील कुणीही सांगू शकेल. परंतु उच्चविद्याभूषित अधिकारीच यापासून अनभिज्ञ दिसून येत आहे. यावेळी आयुक्तांनी वृक्षलागवड व झाडांना पाणीपुरवठ्यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

पाच वर्षांपूर्वी अनिल सोले महापौर असताना महापालिकेने एका दिवशी एक लाख वृक्ष लागवड करण्याचा विक्रम नोंदवला होता. त्यानंतर ती झाडे कुठे गेली याचा कोणालाच थांगपत्ता लागला नाही. महापालिकेच्या उद्यान विभागालाही ही झाडे सापडली नाहीत. पावसाळा सुरू झाल्यावर वृक्ष लागवड केली जाते. त्यामुळे झाडे जगतात. मात्र महापालिका हा नैसर्गिक नियमच मानायला तयार नाही. केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मनपाला २ कोटी १४ लक्ष रुपये दिले आहेत. यातून विद्यापीठाच्या १५ एकर जागेमध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार असून आज ४४.६ अंश सेल्सिअस तापमानात या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या तापमानात लावलेली झाडे जगणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपुर NMC | नदी किनारे अतिक्रमण के खिलाफ बड़ी कार्रवाई

नागपूर : नगर आयुक्त राम जोशी ने एक बैठक में सभी अधिकारियों को उच्च न्यायालय के आदेश के अनुसार तत्काल कार्रवाई करने का निर्देश दिया. बैठक में अधीक्षण अभियंता मनोज तलवार, उपायुक्त अशोक पाटिल, कार्यपालक अभियंता अविनाश बरहाटे, श्वेता बनर्जी, अनिल गेदाम, गिरीश वासनिक, राजेश दुफारे, अनिल गेदाम, रक्षमवार, हेडाऊ, विधि अधिकारी वेंकटेश कपले, सूरज पारोचे, श्रीकांत वैद्य उपस्थित थे. बाजार विभाग।

नाग नदी, पीली नदी और पोहरा नदी के साथ-साथ नालों पर भी बड़े पैमाने पर अतिक्रमण किया गया है. अतिक्रमण करने वाले नागरिकों के खिलाफ बड़ी कार्रवाई की जाएगी। यह कार्रवाई नागपुर नगर निगम का अतिक्रमण उन्मूलन दस्ता करेगा। मुंबई हाईकोर्ट की नागपुर बेंच ने निगम और राज्य सरकार को अतिक्रमण हटाने का निर्देश दिया है. अंचल स्तर पर अनाधिकृत निर्माणों, अवैध मलिन बस्तियों एवं पशुओं को हटाने के लिए समयबद्ध कार्यक्रम भी स्थापित किया गया है।

नदी में जल प्रवाह में बाधा। यह समस्या बाढ़ का कारण बनती है। नदी के बहाव में बाधा डालने वाले लोगों के खिलाफ नगर पालिका ने कार्रवाई शुरू कर दी है. आयुक्त राम जोशी ने नगर प्रशासन द्वारा जोनल स्तर पर जल्द से जल्द कार्रवाई शुरू कर अतिक्रमण हटाने के निर्देश दिए हैं.

नागपूर | झमाझम पावसाने मनपाची पोल उघडली, नागपूर “तलावांचे शहर” बनले

मंगळवारी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने मनपाला उघडे पाडले. ड्रेनेज व्यवस्थेअभावी शहरातील रस्ते तलावांमध्ये रूपांतरित झाले. सर्वत्र पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील लोकांना मोठा त्रास झाला. शहरात सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे जाळे घातले जात आहे, पण पावसात ड्रेनेज व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले जात आहे हे विशेष. पावसाचे नाले नसल्याने रस्ते पाण्याखाली जात आहेत. रस्त्याच्या कडेला झाडे लावण्याबाबतही उदासीनता दिसून येते. त्यामुळे ही समस्या वाढत आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

कल था, आज कहाँ गया? नागपुर में बस स्टॉप चोरी.

नागपुर: नागपुर में एक बस स्टॉप चोरी हो गया है. नागपुर के महलगीनगर बस स्टॉप को चोरों ने चोरी कर लिया । नागपुर नगर निगम प्रशासन सो रहा है और अब नागपुर के लोग अपनी भावनाओं को व्यक्त कर रहे हैं कि यात्रियों को परेशानी हो रही है. फिलहाल नागरिक इंतजार कर रहे हैं कि इन बस स्टॉप चोरों के खिलाफ कब कार्रवाई होगी।

नागपुर में सीवेज लाइनों पर चैंबर के ढक्कन चोरी की कई घटनाएं हो चुकी हैं। लेकिन अब नागपुर में एक बस स्टॉप की चोरी का मामला सामने आया है. नागपुर में महलगीनगर बस स्टॉप, जो यात्रियों को बारिश से बचाने के लिए एक आश्रय स्थल था, सचमुच गायब हो गया है।

महलगीनगर बस स्टैंड यहां पिछले कई सालों से है। यात्री यहां आकर बस का इंतजार करते थे। हालांकि, लॉकडाउन के दौरान एक हैरान कर देने वाला वाकया तब हुआ जब चोरों ने पूरे बस स्टॉप को उठा लिया। नागरिकों ने इसकी जानकारी स्थानीय पार्षदों को दी। हालांकि, अभी तक कोई कार्रवाई नहीं की गई है। प्रशासन द्वारा कोई कार्रवाई नहीं किए जाने के कारण इसका खामियाजा क्षेत्र के यात्रियों को भुगतना पड़ रहा है.

नागपूरच्या 3360 खड्ड्यांसाठी एक कोटीची तरतूद

नागपूर शहराला अनेक ओळख आहेत, त्यापैकी एक म्हणजे शहरातील रस्त्यांचे खड्डे, महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खड्डे बुजवण्यासाठी खर्च करते, एकदा या कामासाठी सुमारे 00 1000000 वाटप केले गेले.

नागपूर शहराला अनेक ओळख आहेत, त्यापैकी एक म्हणजे शहरातील रस्त्यांचे खड्डे, महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खड्डे बुजवण्यासाठी खर्च करते, एकदा या कामासाठी सुमारे 00 1000000 वाटप केले गेले. शहरातील रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करणारी महानगरपालिका आणि त्यातून जाणाऱ्या नागपुरातील लोक या शहरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनाचा एक भाग बनले आहेत.

नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी झालेल्या बैठकीत, शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी सुमारे 00 1000000 मंजूर केले, नागपुरी भाषेत खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी विशेष तरतूद केली जाते. खड्ड्यांबाबत महानगरपालिकेची स्थिती दर्शवते की सध्या रस्त्यावर 3360 खड्डे आहेत, त्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च केले जातील.

अब एनएमसी के रिटायर्ड कर्मचारियों को भी प्राप्त होगा सातवें वेतन आयोग का लाभ

राज्य सरकार ने एनएमसी के रिटायर्ड नागपुर कर्मचारियों के लिए सातवें वेतन आयोग के कार्यान्वयन को परमिशन दे दी है। 
पूर्व में एनएमसी कर्मचारियों के लिए सातवां वेतन आयोग लागू था, किंतु रिटायर्ड कर्मचारियों के लिए ऐसा नहीं किया गया था।

राष्ट्रीय नागपुर निगम कर्मचारी संघ के प्रतिनिधिमंडल ने 9 जून को अभिभावक मंत्री डॉ नितिन राउत से मीटिंग की थी और इन विषयों पर डिस्कस किया था।

इसके बाद राज्य के उप सचिव सतीश मोघे ने एनएमसी आयुक्त को सातवें वेतन आयोग के क्रियान्वयन के संबंध में आदेश दिए

1 जनवरी 2016 से 7 जुलाई 2020 के बीच रिटायर्ड हुए अनुमोदित पदों पर कार्यरत एनएमसी कर्मचारी सातवें वेतन आयोग का लाभ पाने के पात्र हैं।

इसी तरह, 1 अगस्त 2019 के बाद रिटायर्ड या मृत्यु होने वालों को इन लाभों के अलावा बकाया राशि मिलेगी।

राष्ट्रीय नागपुर निगम कर्मचारी संघ के अध्यक्ष सुरेंद्र टिंगने, महासचिव रंजन नालोडे और कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाले सहित एसोसिएशन के अधिकारियों ने इस निर्णय का स्वागत किया।

१८ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी मनपा सज्ज, शासनाच्या निर्देशाची प्रतीक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार २१ जूनपासून संपूर्ण देशात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू करण्यात येईल. मात्र यासंदर्भात अद्याप राज्य शासनाचे कुठलेही निर्देश नाहीत. तरीही लसीकरणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका सज्ज असून जर निर्देश प्राप्त झाले तर २१ जूनपासून लसीकरण सुरू करता येईल, यादृष्टीने संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.

१८ ते ४४ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासंदर्भात एक विशेष बैठक शुक्रवारी (ता. १८) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात पार पडली. बैठकीला उपमहापौर मनीषा धावडे, माजी महापौर तथा आमदार प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., आरोग्य समिती सभापती संजय महाजन, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, स्थायी समितीचे माजी सभापती विजय (पिंटू) झलके, माजी सत्तापक्ष नेता संदीप जाधव, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त राजेश भगत, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे आदी उपस्थित होते.
यासंदर्भात अधिक माहिती देताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, १८ ते ४४ वर्षादरम्यान असलेल्या नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उत्साह आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. लसीकरणासाठी सध्या १०४ केंद्र तयार असून सर्व नगरसेवकांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा आठ ते दहा केंद्रांची वाढ करण्यात येत आहे. प्रथम नोंदणी केल्यानंतर स्लॉट आणि केंद्र ज्याप्रकारे मिळेल त्यानुसारच नागरिकांना लसीकरण केंद्रावर जायचे आहे. केंद्रांची संख्या अधिक असल्यामुळे गर्दी होणार नाही, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीनेच हे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. अशी संपूर्ण तयारी नागपूर महानगरपालिकेने करून ठेवलेली आहे. शासनाचे जसे आदेश येतील तसे लसीकरण सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. भविष्यात कोरोनावर नियंत्रण असावे यासाठी आतापासून प्रत्येक व्यक्तीची चाचणी व्हावी यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. प्रशासनाने नुकताच ‘चाचणी आपल्या दारी’ असा उपक्रम सुरू केला. कॉर्पोरेट सेक्टर, बँका, खासगी कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने ज्या ठिकाणी एकत्र २० च्या वर लोकांची चाचणी करायची आहे त्या संस्थांनी आपली मागणी मनपाकडे नोंदवावी. मनपाची चमू तेथे जाऊन चाचणी करेल. या उपक्रमाबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. या योजनेचा अधिकाधिक लाभ देण्यासाठी व्यापारी संघटनांना लेखी पत्र पाठविण्याचे निर्देश महापौरांनी दिले. याप्रमाणेच ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाचेही नियोजन करण्यात येणार आहे. फक्त कमीत कमी ५० ऐवजी ती अट २५ ची करावी, अशी सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली. मुस्लीम समाजात लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे या समाजातील धर्मगुरुंच्या माध्यमातून लसीकरणाच्या संदर्भात जनजागृती करण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
महापौरांनी सांगितले की, लसीकरणाला गति देण्यासाठी एक संस्था स्लम भागात जाऊन नागरिकांना एक महिन्याचे राशन देण्यास तयार आहे. यासाठी मनपा तर्फे त्यांना लसीकरणासाठी मदत केली जाईल.
बैठकीत माहिती देताना मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरणासंदर्भात अद्याप कुठलेही निर्देश नाहीत. परंतु मनपा प्रशासनाची संपूर्ण तयारी आहे. सध्या मनपाकडे ३५ ते ४० हजार डोज उपलब्ध आहेत. राज्य शासनाच्या निर्देशाशिवाय लसीकरण करणे शक्य होणार नाही. साठा उपलब्ध होताच कुठल्याही क्षणी लसीकरण सुरू करता येईल. होणारी गर्दी लक्षात घेता शंभरावर केंद्र सुरू करण्यात येत आहे. ३०० केंद्रांचे उद्दिष्ट असून लसीकरण सुरू झाल्यानंतर ते मागणीनुसार वाढविण्यात येईल तसेच यासाठी जनप्रतिनिधी यांची सुध्दा मदत घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, स्थायी समितीचे माजी सभापती विजय झलके यांनीही यावेळी सूचना मांडल्या. आमदार प्रवीण दटके यांनी लसीकरणाच्या नोंदणीसंदर्भात सूचना केली. ऑनलाईन नोंदणीत अनेक अडचणी असल्यामुळे सर्व केंद्रांवर एक दिवस अगोदर नोंदणी करण्यात यावी, जेणेकरून दुसऱ्या दिवशी नागरिकांची फरफट होणार नाही, अशी सूचना केली.

ये हम है……ये मास्क नही………ये हमारी लापरवाही हो रही है

नागपूर: महानगरात कोरोना वेगाने पसरत आहे. दररोज हजारो रुग्ण पॉजिटिव्ह आढळून येत आहेत. हे रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन सातत्याने लॉकडाऊन आणि सार्वजनिक सुविधा कमी/ बंद करत आहेत. पोलिस प्रशासन रात्रंदिवस नियमांचे पालन करण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत, सामाजिक जबाबदारी आणि योग्य प्रकारे मास्क लावून आपण कमीतकमी बाहेर पडायला हवे ही आपलीही जबाबदारी आहे.

आपल्याकडे आवश्यक काम नसेल तर आपले घर सोडू नका. परंतु जर आपण बाहेर पडलो तर तोंड आणि नाक झाकून योग्य मार्गाने मास्क लावा. परंतु असे दिसून येत आहे की लोक फक्त फाईन टाळण्यास्तव मास्क वापरत आहेत. बाजारात बाहेर जाणारे लोक त्यांच्या गळ्याभोवती मास्क घालतात. तर कोणी आपली दाढी झाकण्यासाठी मास्क वापरत असेल तर राही महाभाग तर मास्कच वापरत नाहीत.

आपणही जबाबदार बनावे: कोरोना नियंत्रित करताना प्रशासनापेक्षा सामान्य माणसाची भूमिका महत्वाची आहे. लोकांना हे समजले पाहिजे की कोरोना साखळी केवळ तेव्हाच ब्रेक होईल जेव्हा ते स्वत:हून खबरदारी घेतिल. प्रशासन केवळ नियम बनवू शकते परंतु त्याचे पालन करण्याची जबाबदारी सामान्य माणसाची आहे. म्हणून घराबाहेर पडू नये असा प्रयत्न करा. त्याच बरोबर, जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन केले आणि घरी स्वतंत्र राहिले. लोकांना भेटू नका. जेणेकरुन शहर कोरोना साथीच्या आजारापासून वाचू शकेल.

सोनेगांव तलावाचे सौंदर्यीकरण होणार

शहरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील भोसलेकालीन सोनेगांव तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम नागपूर महानगरपालिकेने आपल्या हाती घेतले आहेत. सोनेगांव तलावाचे प्रस्तावित सौंदर्यीकरण कामाचे सादरीकरण गुरुवारी (१८ मार्च) रोजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्यासमोर करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती श्री.प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते श्री. अविनाश ठाकरे उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनानी सोनेगांव तलावाच्या सौंदर्यीकरण करण्यासाठी रु. १७.३२ कोटीच्या प्रस्तावाला अगोदरच मंजूरी दिली आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेता श्री. देवेन्द्र फडणवीस यांच्या समोर याचे सादरीकरण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
आर्किटेक्ट भिवगडे असोसिएटसचे प्रतिनिधी इंजीनिअर चेतन कावरे आणि आर्कि.राजेन्द्र माहुलकर यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की सोनेगांव तलावाच्या सर्व बाजूने पदपाथ तयार केला जाईल तसेच काही ठिकाणी सुरक्षा भिंत सुध्दा बांधली जाईल. या तलावाचे सौंदर्यीकरणामुळे पर्यटनला चालना मिळेल. येथे येणा-या नागरिकांसाठी १५० दुचाकी वाहन आणि ४ चारचाकी वाहनांची मोठी पार्किंग उभारली जाईल. लहान मुलांसाठी खेळणी तसेच नागरिकांसाठी ग्रीन जिमची व्यवस्था केली जाईल.
येथे येणा-या पर्यटकांसाठी शौचालय व उद्यान व्यवस्था तसेच रोशनाई केली जाईल. काही ठिकाणी दगडी भिंती चे दुरुस्तीचे काम करणे प्रस्तावित आहे. या ठिकाणी नाश्त्याचे स्टॉल सुध्दा राहतील. या हेरीटेज तलावाला त्यावेळेचा “लुक” देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी मुख्य अभियंता श्रीमती लीना बुधे, अधीक्षक अभियंता श्री. अजय पोहेकर, श्री. सुनील शर्मा आदी उपस्थित होते.

Exit mobile version