मुसळधारचा शहराला त्रास: अनेक वस्त्या जलमय

नागपूर: बराच कालावधीचे विश्रांतीनंतर रविवारी उशिरा रात्री शहरात जोरदार वारा, विजा व गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. तो पहाटे 6 वाजेपर्यंत सुरूच होता. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्या, अनेक वस्त्यांमध्ये रस्ते नद्या बनले. वस्त्यांमध्ये पाणी शिरले. संपूर्ण शहरच जलमय झाले. हवामान विभागाने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात 117.1 मिमी पावसाची नोंद केली. रविवारी रात्री नागपूर शहरात सर्वाधिक पाऊस झाला. पावसामुळे तापमानातही घट झाली. विभागाने शहरातील कमाल तापमान 32.0 आणि किमान तापमान 22.4 अंश नोंदविले. रात्रभर पावसामुळे शहरातील अनेक खोलगट वस्त्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले. शेकडो कुटुंबाची रात्र जागण्यात गेली.

कंबरेपर्यंत पाणी: रात्रीच्या मुसळधार पावसामुळे महाल भागात अयाचित मंदिराशेजारी असलेल्या मानपुरा भागात कंबरभर पाणी तुंबले. येथील नाल्याचे पाणी ओसंडून वाहत असल्याचे नागरिकांनी सांगितले आणि गडर लाइनमधील बॅक वॉटर घरात प्रवेश घुसले. त्याचबरोबर गंगाबाईघाट परिसरातही खोल वस्त्यांत पाणी गुडघ्यापर्यंत भरून गेले त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. दक्षिण नागपुरात, स्वामीनारायण मंदिरामागील वस्त्या अशाच गुडघ्यापर्यंत पाण्याने भरल्या. कळमना परिसरातील काही वस्त्यांमध्ये पाणी भरल्याच्या बातम्या आहेत. एका रात्रीच्या पावसाने संपूर्ण शहर जलमग्न झाले. मानेवाडा परिसरातील सद्गुरु नगरातल्या गल्ल्या नद्यांसारख्या वाहत्या झाल्या. सकाळपर्यंत पाण्याचा निचरा झाला नाही आणि लोक त्यांचे घरात कैद झाले. नरेंद्रनगर पुलाखालगत दोन्ही बाजूंनी पाणी भरून असल्याने वाहतूक थांबवावी लागली. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

रात्रभर विज खंड: पावसाने त्रासलेले लोक वीज बंद पडल्यानेही तितकेच त्रस्त झाले, शहरातील अनेक भागात वीज खंडित झाली होती. रात्रभर वीज अडथळे निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले ऊर्जामंत्र्यांच्या गावीच या अघोषित लोडशेडिंगमुळे शहरवासी हैरान झाले. सोमवारी दुसर्‍या दिवशी अनेक भागात वीज आली. मात्र कुठेतरी सुधारणेच्या कामाच्या नावाखाली तर कुठे देखभालच्या नावाखाली वीजेची आंधळी कोशिंबीर सुरूच होती. राखी सणाच्या दिवशी वीज बंद असल्याने लोकांमध्ये संताप होता.

संध्याकाळी दमदार, नंतर संततधार: काल सायंकाळी 5.30 च्या सुमारास आकाशात गडद ढग होते. त्यानंतर बर्‍याच भागात दमदार पाऊस पडला. सुमारे अर्धा तास पाऊस पडल्यानंतर संततधार सरी सुरु झाल्या. रात्री उशिरापर्यंत अधून मधून पाऊस पडला. संततधार पावसामुळे वातावरण थंड झाले आणि आर्द्रतेपासून मुक्तता झाली.

जोमदार पावसाचा इशारा: हवामान खात्याने येत्या 24 तासांत शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. 9 ऑगस्टपर्यंत शहराचे हवामान असेच राहील. विभागाच्या म्हणण्यानुसार 5 ते 7 ऑगस्टला मुसळधार पाऊस पडेल. साधारणत: 7 ऑगस्ट या कालावधीपर्यंत हवामान ढगाळ राहील आणि दररोज पाऊस पडेल. त्याचबरोबर 8 आणि 9 ऑगस्टला जोरदार वा-यासह पावसाची शक्यता आहे.

हम सब मुंढे के साथ- बालासाहेब थोरात

नागपुर: राज्य के राजस्व मंत्री और कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष बालासाहेब थोरात ने नागपुर के नगर आयुक्त मुंढे का समर्थन किया है। हम सरकार के रूप में मुंढे और पूरे प्रशासन के पीछे खड़े हैं, यह बालासाहेब थोरात ने स्पष्ट किया।

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने सामना के एक साक्षात्कार में मुंढे को समर्थन किया था। उसके बाद, अब बालासाहेब थोरात ने भी कहा कि वह सब मुंढे के साथ हैं।

नागपुर में आज की बैठक में सभी को आमंत्रित किया गया था। बालासाहेब थोरात ने कहा कि हम नागपुर के भविष्य की स्थितियो को ध्यान में रखते योजनाए बना रहे हैं।

इस समय, बालासाहेब थोरात ने शिव संग्राम के अध्यक्ष विनायक मेटे द्वारा राज्य सरकार के खिलाफ की गई आलोचना का जवाब दिया। उन्होंने कहा मराठा आरक्षण के बारे में विनायक मेटे द्वारा लगाए गए आरोप निराधार हैं, मेटे वर्तमान में विपक्ष की भूमिका निभा रहे हैं। मंत्री अशोक चव्हाण ने मराठा आरक्षण पर कई बैठकें कीं। हमने दिल्ली में एक बड़ा वकील भी खड़ा किया है। बालासाहेब थोरात ने कहा कि हम मराठा आरक्षण को वैध बनाने की पूरी कोशिश कर रहे हैं।‌‌

स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत का पडले आयुक्त मुंढे वाचा !

नागपूर:- स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज महापालिकेतील कंपनीच्या सभागृहात पार पडली. या बैठकीची आवश्‍यकता काय होती, असा प्रश्‍न सदस्यांनी विचारला. दोनच दिवसांत या बैठकीसाठी विषयपत्रिका तयार करण्यात आली. एवढ्या घाईत बैठक घेण्याची गरज काय, असा प्रश्‍न महापौरांनी उपस्थित केला होता.

नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत आयुक्तांनी कंपनीच्या सीईओपदी नसताना अनेक निर्णय घेतले. या निर्णयांना मंजुरीच्या प्रस्तावात कायदेशीर बाबींचा मुद्दा उपस्थित करीत संचालक मंडळातील १३ सदस्यांनी धुडकावून लावला.

बैठकीत कंपनीचे चेअरमन प्रवीण परदेसी आणि दुसरे संचालक भारत सरकारचे दीपक कोचर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. एवढ्या घाईत बैठक आयोजित केल्यामुळे प्रवीण परदेशी यांनी नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ज्ञ एस. के. मिश्रा यांचे मत घेतले.

त्यावर त्यांनी उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू असून मागील संचालक मंडळाच्या बैठकीत स्पष्टपणे कायदेशीर मत घेण्याचे नमूद केले होते, असे सांगितले. त्यानंतरच १४ फेब्रुवारी ते १० जुलैपर्यंत आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयावर चर्चा करावी, असेही मिश्रा यांनी परदेसी यांना सांगितले.

विशेष म्हणजे हे सर्व प्रस्ताव आयुक्तांनीच आजच्या बैठकीसाठी तयार करून चेअरमन प्रवीण परदेसी यांच्याकडे पाठविले असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याच पुढाकाराने बोलावण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त पुन्हा एकाकी पडल्याचा टोला महापौरांनी लगावला.

आयुक्तांनी कुठल्याही कायदेतज्ज्ञांचे मत न घेता बैठक घेण्यामागचे कारण काय? असा प्रश्न महापौरांनी केला.

आजच्या बैठकीच्या विषय पत्रिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांना महापालिकेत रुजू झाल्यापासून स्मार्ट सिटी कंपनीबाबत घेतलेल्या निर्णयांना कार्योत्तर परवानगी द्यावी, रुजू झालेल्या तारखेपासूनच सीईओ म्हणून मान्यताही द्यावी आणि या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांना परवानगी हवी आहे. यामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेले नियोजन, बायोमाईनिंगच्या निविदेला परवानगी, सर्व प्रशासकीय निर्णय, आर्थिक व्यवहाराचे घेतलेले सर्व निर्णय यांचा समावेश आहे. यावर महापौर जोशींनी आक्षेप घेतला.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कायदेशीर मत घेतल्यानंतरच या विषयावर विचार करावी, असा निर्णय एकमताने सर्व अधिकारी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. व्हीसीवरुन सहभागी झालेले दीपक कोचर यांचेही तेच मत पडले. त्यामुळे आजच्या बैठकीतही १३ जण एका बाजूला, तर तुकाराम मुंढे एका बाजूला असल्याचे चित्र दिसल्याचे जोशी यांनी सांगितले. नागपूर मेट्रो धक्कादायक घटनेने हादरली! मेट्रो कार्यालयाची टेलिफोन लाईन झाली हॅक..तब्बल इतक्या लाखांचा फटकाअशी बैठक घेताच येत नाही, असे मत एस.के. मिश्रा यांनी या आक्षेपावर व्यक्त केल्याचेही महापौर म्हणाले.

यामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेले नियोजन, बायोमाईनिंगच्या निविदेला परवानगी, सर्व प्रशासकीय निर्णय, आर्थिक व्यवहाराचे घेतलेले सर्व निर्णयाला मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव होता. यावर महापौर जोशींनी आक्षेप घेतला. विषय पत्रिकेतआयुक्त तुकाराम मुंढे यांना महापालिकेत रुजू झाल्यापासून स्मार्ट सिटी कंपनीबाबत घेतलेल्या निर्णयांना कार्योत्तर परवानगी द्यावी, रुजू झालेल्या तारखेपासूनच सीईओ म्हणून मान्यताही द्यावी आणि या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांना परवानगी हवी आहे.

NMC to drop SIS to ticket Aapli Bus

Nagpur:- Nagpur Municipal Corporation’s (NMC) transport department has decided to discontinue the Security and Intelligence Services (SIS) one of Aapli Bus operators’ ticketing agencies due to poor results.

“The ticketing agency’s contract ended on July 30 and the department will replace SIS with the lowest bidder, the Unity Security Force, and Training Institute,” Transport Committee Chair Narendra Borkar told.

Two ticketing agencies SIS and Unity Security Force were approved by the NMC. SIS was to have 242 drivers and Unity 751, and the two agencies had to run 380 buses together. The organization has struggled to allocate sufficient numbers of drivers commensurate with the number of scheduled services over the past few months, undermining the city bus service’s smooth operations. Every month, the NMC paid both agencies about Rs1 Crore.

He called on the conductors of SIS to deposit the electronic ticketing machines with the NMC. He also said all the conductors under the new dispensation should be inducted.

अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी स्वीकारला पदभार

नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी गुरूवारी (ता.३०) सकाळी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

मनपाचे उपायुक्त निर्भय जैन व सहा. आयुक्त महेश धामेचा यांनी त्यांचे स्वागत केले.

मूळ हरयाणा येथील निवासी असलेले जलज शर्मा बी.टेक कम्प्युटर इंजिनिअर आहेत. प्रथम २०११ मध्ये ते भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) रुजू झाले. त्यानंतर त्यांची २०१४ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड झाली. यवतमाळ जिल्हा परिषदेत सुमारे अडीच वर्ष कार्यभार स्वीकारल्यानंतर ते गुरुवारी (ता.३०) नागपूर महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून रूजू झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी जळगाव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे‍.

News Credit To NMC

नागपुरात शहरात लॉकडाऊन नाहीच…!

लॉकडाऊनमुळे जनता आधीच हवालदिल झाली आहे. लॉकडाऊन लागावा अशी मानसिकता या शहरातील नागरिकांची नाही. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींचीसुद्धा ही मानसिकता असून जर प्रशासनाने जबरीने लॉकडाऊन लादला तर लोकांसोबत आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

नागपुरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लॉकडाऊन लावावा की नाही यावर चर्चा करण्याकरिता महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला खासदार कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. प्रा. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) श्वेता खेडकर उपस्थित होते.

नागपूर शहरात ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत बाजारातील दुकाने सम आणि विषम तारखांच्या नियमानुसार सुरू आहेत. परंतु यापुढे १२ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या मार्गावरील दुकाने दररोज सुरू ठेवण्यात यावेत, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. ९ मीटर अथवा त्याखालील कमी रुंदीच्या मार्गावरील दुकानांसाठी सम-विषम तारखांचा नियम कायम ठेवण्यास त्यांनी सांगितले. अनेक दुकानदारांवर नियमाच्या नावाखाली दंड ठोठावण्यात येत आहे.

हा दंड आकारण्याचा निर्णय स्थायी समितीत झाला नाही. त्यामुळे असा बेकायदेशीररीत्या दंड आकारणे तात्काळ बंद करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. मूर्तीकारांवर आर्थिक दंड लावण्याचा त्यांनी विरोध केला. मस्कासाथ मध्ये गर्दी पहता सम-विषम नियम लागू कराव असे ही ते म्हणाले.

तत्पूर्वी सर्व लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन संदर्भात आपली भूमिका मांडली. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे सांगितले. शिवाय जी आरोग्य यंत्रणा रुग्णांवर उपचार करीत आहे, त्यांना योग्य साहित्य पुरविणे आवश्यक आहे. त्यांची सुरक्षासुद्धा महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार कृपाल तुमाने यांनी जनजागृतीवर भर दिला. कोरोनाला न घाबरता कोरोना नाहीच अशी मानसिकता करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आ.गिरीश व्यास म्हणाले की, किराणा ओळीमध्ये गर्दी पाहता ‍तिथे सम-विषम नियम लागू करा. आ. नागो गाणार म्हणाले, रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.

जनतेची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. यंत्रणेने ऍक्टिव्ह होऊन कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आ. मोहन मते म्हणाले, लॉकडऊनमुळे गरिबांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्याआधी गरिबांच्या पोटाची व्यवस्था करावी, अशी सूचना मांडली. आ. कृष्णा खोपडे म्हणाले, या विषयावर राजकारण करू नये असे सांगितले. सम-विषम नियम बंद करण्याचा पण त्यांनी सल्ला दिला. शहराच्या आउटर भागात दारूचे अड्डे सुरू झाले आहेत. तेथे होणाऱ्या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशी सूचना केली.

आ. विकास कुंभारे यांनी विलगीकरणाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की जर लॉकडाऊन केला तर नागरिक विरोध करतील. आ. प्रा. अनिल सोले यांनी शहरात जे निर्णय एकतर्फी घेणे सुरू आहे, त्यावर आक्षेप नोंदविला. लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, असे मत व्यक्त केले. स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्ता पक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनीही या शहरात लॉकडाऊन होऊ नये, अशी भूमिका मांडली. ते म्हणाले की, जनप्रतिनिधीनां सोबत घेऊन निर्णय घ्या. पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी पोलिसांच्या वतीने लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बाजू मांडली.

बैठक नियमित होणार
लॉकडाऊन असो, जनजागृती असो की कोरोनाची परिस्थिती असो, या सर्व विषयांचा आढावा घेण्यासाठी आता यापुढे लोकप्रतिनिधींची नियमित बैठक होईल. पुढील बैठक शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी होईल, असे महापौर संदीप जोशी यांनी जाहीर केले.

News Credit To NMC

स्मार्टसिटीत खोडा: तक्रारीनंतरही मनपा थंड

नागपूर:- ऑरेंजसिटीला स्मार्टसिटीत रूपांतराचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार नाहीय. कारण शहराच्या कानाकोप-यांत अतिक्रमण करणारे बळकट होत असून, मनपाचे अधिकारी कार्यालयीन प्रक्रियांतच गुंतले आढळतात. अतिक्रमणधारकांविषयीच्या लेखी तक्रारी करूनही झोन ​​आयुक्त फक्त नोटीसा देत आहेत तर हटाव पथक केवळ कारवाईच्या देखाव्यात गुंतले दिसते.

ताजी घटना मंगळवारी झोनमधील मानसरोवर कॉलनी आणि राऊत लेआउट भागातील आहेत. अवस्थी नगर चौक ते झिंगाबाई टाकळी या रिंग रोडवरील पियू जमीन अतिक्रमणधारकांनी घेरून टाकली असून आता तेथे पक्के दुकानंही बांधले जात आहेत.

झाडे तोडली, पक्के दुकाने:

झिंगाबाई टाकळी खसरा क्रमांक 260 हा एनआयटीने मंजूर केलेला लेआउट आहे. 260 ते 254/4 लेआउट दरम्यान अवस्थी नगर चौक ते रिंगरोड पर्यंत 80 फूट डीपी रस्ता आहे जो थेट गोधनीकडे जातो. या मार्गावर 10 वर्षांपूर्वी रस्त्यालगत मॉइल वतीने झाडे लावली होती. सर्वच झाडे मोठी झाल्याने दोन्हीबाजूस एकदम हिरवेगार वाटायचे. 13 ऑक्टोबर 2018 रोजी अज्ञात लोकांनी हि हिरवीगार झाडे तोडून अतिक्रमण सुरू केले. काहि दुकानही लागली.

रिक्त जागा पाहून अनेक लोक आक्रमकपणे अतिक्रमण करीत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्या मार्गाच्या पीयू जागेबाबत नागपूर सुधार प्रन्यास इमारत विभागाकडून माहिती मागविण्यात आली. विभागाकडून नकाशा मिळाल्यानंतर सखोल तपासणी करण्यात आली. नकाशात रस्त्याच्या सभोवतालच्या मोकळ्या जागेचे वर्णन आहे. असे असूनही लोकांनी मनमानीपणे अतिक्रमण केले आहे. काहींनी पीयू जमीन ताब्यात घेऊन फर्निचर व खुर्च्या विक्री सुरू केले. तर काहींनी सिमेंटचे बांधकाम आणि शेड टाकत अतिक्रमण केलेय.

अतिक्रमणाची माहिती व ती हटविण्याची विनंती स्थानिकांनी एनआयटीचे अभियंता आणि एनआयटीचे अध्यक्ष यांच्याकडे 19 ऑक्टोबर 2018 रोजीच केली मात्र अतिक्रमणधारकांवर कोणतीही कारवाई नाही. यानंतर 5 मार्च 2019 रोजी एनआयटीच्या अध्यक्षांनाही विनंती केली गेली.

स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्यानंतर 8 जुलै 2020 रोजी मंगळवारी झोनच्या अधिका-यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणांची पाहणी केली. यानंतर प्रशासनाची परवानगी न घेता अतिक्रमण केल्याबद्दल दोघांना नोटीस पाठविली होती.  नोटीस पाठविण्यास 20 दिवस पूर्ण झाले आहेत, परंतु अद्यापपर्यंत अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई झालेली नाही.

‘रिकव्हरी’ वरच प्रत्येकाचे लक्ष: मनपा,

पोलिस, आणि वाहतूक विभाग घुसखोरांवर कारवाईऐवजी फक्त ‘रिकव्हरी’ वरच लक्ष केंद्रित करून आहे. मनपा अधिकारी आणि हटाव पथकातील काही लोक अतिक्रमणका-यांस  काही लोकप्रतिनिधीच्या कृपेने संरक्षण देत असल्याचे चर्चा आहेत, नगरसेवकांचे लक्ष नाही आणि जनता कुणाविरूद्ध उघडपणे बोलण्याची हिम्मत करत नाही. ज्याच्या बळावर अतिक्रमण  वाढ चालूच आहे.

आम्ही सर्व आरोग्य यंत्रणेच्या पाठिशी!

कोव्हिड-१९ या महामारीविरुद्ध गेल्या चार महिन्यांपासून आरोग्य यंत्रणा जिकरीने लढा देत आहे. त्यांच्या अडचणी आम्हाला ठाऊक आहे. या परिस्थितीत त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि लोकप्रतिनिधी म्हणून हवी असेल ती मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आपण आवाज द्या. आम्ही धावून येऊ, असा विश्वास देत महापौर संदीप जोशी यांच्यासह खासदार आणि आमदारांनी मेयो आणि मेडिकलमधील अधिकाऱ्यांकडून व्यवस्थेची माहिती घेतली आणि परिस्थितीशी सामना करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठिशी उभे आहोत, असा विश्वास दिला.

महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारात आणि नेतृत्वात खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे यांनी सोमवारी (ता. २७) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे भेट देऊन कोव्हिड-१९ संदर्भात असलेल्या संपूर्ण व्यवस्थेची माहिती घेतली आणि अडचणीसुद्धा जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई होते. प्रारंभी त्यांनी मेयो रुग्णालयाला भेट दिली. प्रारंभी मेयोतील कोव्हिड हॉस्पीटलला जाऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर अधिष्ठाता कक्षात झालेल्या बैठकीत व्यवस्था आणि अडचणी जाणून घेतल्या. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आणि डॉ. सागर पांडे यांनी सध्या मेयोमधील व्यवस्थेची संपूर्ण माहिती दिली. आतापर्यंत मेयोमध्ये १७४० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ५५० बेडची व्यवस्था असून ग्रामीणमधील रुग्णांचाही भार वाढत असल्याने भविष्यात बेड कमी पडू शकतात, असे त्यांनी सांगितले. मात्र, सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशाच्या आधार घेत नागपूर महानगरपालिकेने लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिवाय आमदार निवास, व्हीएनआयटी, वनामती, सिम्बॉयसीस आणि पाचपावली विलगीकरण केंद्राचे रुपयांतर कोव्हिड केअर सेंटरमध्ये केल्याने २२०० बेडची व्यवस्था झाली आहे. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर तेथे उपचार होईल, अशी माहिती डॉ. योगेंद्र सवाई यांनी दिली. शिवाय काही खासगी रुग्णालये आणि हॉटेल्समध्येही अशा रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर सर्व लोकप्रतिनिधी यांनी मेडिकल रुग्णालयाला भेट दिली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुजल मित्रा यांच्यासह अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. तिरपुडे, डॉ. गोसावी ह्यांनी मेडिकलमध्ये कोव्हिड रुग्णांवर होत असलेल्या उपचाराची आणि व्यवस्थेची माहिती दिली. मेयोमध्ये कोव्हिड रुग्णांसोबतच अन्य रुग्णांचाही भार वाढला असल्याने बेडची कमतरता भविष्यात भासू शकते. शिवाय नागपूर शहराव्यतिरिक्त नागपूर ग्रामीण आणि नागपूर व अमरावती विभागातील सर्व शहरे यासोबतच मध्यप्रदेशातील काही शहरातील रुग्ण सरळ येत असल्याने मेडिकलचा ताण वाढत चालला आहे. लक्षणे नसलेली रुग्ण अधिक प्रमाणात येत असल्याने पेच निर्माण झाला होता. परंतु आता मनपाने नव्या आदेशानुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्यान असल्याने मेडिकलचा भार बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असे ते म्हणाले.
अधिष्ठाता डॉ. सुजल मित्रा यांनी सांगितले की, अमरावती विभागातील अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत येथे येतात. कोव्हिड पॉझिटिव्ह असलेल्या १७ गरोदर माता मेडिकलमध्ये दाखल आहेत. त्यात ७ महिलांची प्रसूती झाली. अशी अनेक आव्हाने समोर आहेत. असे असतानाही संपूर्ण चमू निकराने आणि जिकरीने लढा देत असल्याचे ते म्हणाले.

‘बेस कॅम्प’ची संकल्पना उत्तम
सरळ रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर नियंत्रण असावे यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात मुंबई आणि पुणे शहराच्या धर्तीवर ‘बेस कॅम्प’ तयार केले तर रुग्णालयांवरील भार बराचसा कमी होईल. जो कोणी व्यक्ती पॉझिटिव्ह असेल किंवा लक्षणे असतील त्याने सर्वप्रथम बेस कॅम्पमध्ये जावे. तेथून त्याला कुठल्या रुग्णालयात न्यायचे, लक्षणे नसतील आणि पॉझिटिव्ह असेल तर त्याला गृह विलगीकरणात ठेवायचे की अन्यत्र कुठे न्यायचे यासंदर्भात तेथील यंत्रणा निर्णय घेईल. मेडिकलचे अधिष्ठाता आणि अधिकाऱ्यांनी मांडलेली ही संकल्पना महापौरांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी उचलून धरली. यावर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

महापौरांनी केले संपूर्ण चमूचे कौतुक
मेयो आणि मेडिकलची संपूर्ण यंत्रणा पहिल्या दिवसापासून कोव्हिडशी लढा देत आहे. त्यांचे काम सर्वोत्तम आहेत. हेच खरे सैनिक आहे, असे म्हणत सर्व चमूचे तोंडभरून कौतुक केले. या कार्यात स्वयंसेवी संस्थांची मदत हवी असेल तर तसे सांगा. अन्य कुठलीही मदत सांगा. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या मदतीसाठी सज्ज आहोत. मेडिलकमध्ये प्रस्तावित हेल्पडेस्क तातडीने सुरू करायचा असेल आणि तेथेही स्वयंसेवकांची आवश्यकता असेल, ५०० लोकांच्या भोजनाची व्यवस्था हवी असेल तर ते सुद्धा करून देण्यास महापौर संदीप जोशी यांनी तयारी दर्शविली. स्वयंसेवकांना कोव्हिडशी कसे लढायचे हे प्रशिक्षण द्यावे जेणेकरून प्रतिबंधित क्षेत्र किंवा रुग्णालयात त्यांची मदत घेता येईल, अशी सूचनाही त्यांनी मांडली. अन्य लोकप्रतिनिधींनीही काही सूचना करीत आवश्यक ती सर्व मदत करु, असा विश्वास दिला.

शासनाच्या निर्देशांचे पालन करा : आयुक्त

महानगर पालिकेचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे अभिनंदन करीत आभार मानले. ते म्हणाले की, शनिवारी नागरिकांनी जसा उत्स्फूर्तपणे कर्फ्यू पाळला तसाच रविवारीही जनता कर्फ्यू पाळावा. आता अशा पध्दतीने जगणे शिका, हे सांगण्यासाठीच हा जनता कर्फ्यू आहे. राहणीमानात बदल करण्याने आणि शासनाच्या निर्देशांचे योग्य प्रकारे पालन केले तर कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल. आपल्या जीवाची पर्वा करा, लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यूची गरज भासणार नाही, अशी जीवनपद्धती आत्मसात करा, असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले.

आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी शनिवारी जनता कर्फ्यूचे निरीक्षण करण्यासाठी गोकुलपेठ, सीताबर्डी, इतवारी, मस्कासाथ, सेन्ट्रल एव्हेंन्यू भागाचा सकाळी दौरा केला.

News Credit To NMC

9 कर्मचारियों को कमिश्नर ने किया सस्पेंड

नागपुर:- नगर आयुक्त मुंढे पहले ही जनप्रतिनिधियों के साथ विवाद मे हैं, शुक्रवार को उन्होंने कुछ कर्मचारियों को फटकार लगाई। मुंढे कल सुबह 6 बजे अचानक निगम मुख्यालय में गए। मुख्यालय के मुख्य द्वार के निकट कोरोना नियंत्रण कक्ष है। यह कमरा 24 घंटे खुला रहता है। यहां स्टाफ को शिफ्ट में बुलाया जाता है।

रात के शिफ्ट में कर्मचारी ठीक से ड्युटी नहीं बजा रहे थे। कर्तव्य नहीं निभा रहे इन चारो कर्मचारीयो को कमिश्नर ने तत्काल प्रभाव से निलंबित कर दिया।

इसके बाद मुंढे ने अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशंस सेंटर का दौरा किया। वहां से, शहर के प्रत्येक क्षेत्र में सफाईकर्मी ड्यूटी के लिए मौजूद हैं या नहीं यह दिखाई देता हैं, उनका निरीक्षण किया। फोन लगाकर अचानक स्वच्छता निरीक्षकों को विभिन्न क्षेत्रों में जांचा और उनके लोकेशन चेक कीए।

उसके बाद पाचपावली, इंदौरा, धरमपेठ जैसे कुछ स्थानों पर उपस्थिति शेड का दौरा किया। वहां उपस्थिति रजिस्टर जांचे। वहां भी कुछ स्वच्छता निरीक्षक और अन्य कर्मचारी इमानदारी से ड्यूटी करते नहीं पाए गए। उन्हें भी तत्काल निलंबित करने का आदेश दिया गया है।

Exit mobile version