अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी स्वीकारला पदभार

नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी गुरूवारी (ता.३०) सकाळी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

मनपाचे उपायुक्त निर्भय जैन व सहा. आयुक्त महेश धामेचा यांनी त्यांचे स्वागत केले.

मूळ हरयाणा येथील निवासी असलेले जलज शर्मा बी.टेक कम्प्युटर इंजिनिअर आहेत. प्रथम २०११ मध्ये ते भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) रुजू झाले. त्यानंतर त्यांची २०१४ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड झाली. यवतमाळ जिल्हा परिषदेत सुमारे अडीच वर्ष कार्यभार स्वीकारल्यानंतर ते गुरुवारी (ता.३०) नागपूर महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून रूजू झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी जळगाव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे‍.

News Credit To NMC

नागपुरात शहरात लॉकडाऊन नाहीच…!

लॉकडाऊनमुळे जनता आधीच हवालदिल झाली आहे. लॉकडाऊन लागावा अशी मानसिकता या शहरातील नागरिकांची नाही. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींचीसुद्धा ही मानसिकता असून जर प्रशासनाने जबरीने लॉकडाऊन लादला तर लोकांसोबत आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

नागपुरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लॉकडाऊन लावावा की नाही यावर चर्चा करण्याकरिता महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला खासदार कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. प्रा. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) श्वेता खेडकर उपस्थित होते.

नागपूर शहरात ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत बाजारातील दुकाने सम आणि विषम तारखांच्या नियमानुसार सुरू आहेत. परंतु यापुढे १२ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या मार्गावरील दुकाने दररोज सुरू ठेवण्यात यावेत, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. ९ मीटर अथवा त्याखालील कमी रुंदीच्या मार्गावरील दुकानांसाठी सम-विषम तारखांचा नियम कायम ठेवण्यास त्यांनी सांगितले. अनेक दुकानदारांवर नियमाच्या नावाखाली दंड ठोठावण्यात येत आहे.

हा दंड आकारण्याचा निर्णय स्थायी समितीत झाला नाही. त्यामुळे असा बेकायदेशीररीत्या दंड आकारणे तात्काळ बंद करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. मूर्तीकारांवर आर्थिक दंड लावण्याचा त्यांनी विरोध केला. मस्कासाथ मध्ये गर्दी पहता सम-विषम नियम लागू कराव असे ही ते म्हणाले.

तत्पूर्वी सर्व लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन संदर्भात आपली भूमिका मांडली. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे सांगितले. शिवाय जी आरोग्य यंत्रणा रुग्णांवर उपचार करीत आहे, त्यांना योग्य साहित्य पुरविणे आवश्यक आहे. त्यांची सुरक्षासुद्धा महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार कृपाल तुमाने यांनी जनजागृतीवर भर दिला. कोरोनाला न घाबरता कोरोना नाहीच अशी मानसिकता करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आ.गिरीश व्यास म्हणाले की, किराणा ओळीमध्ये गर्दी पाहता ‍तिथे सम-विषम नियम लागू करा. आ. नागो गाणार म्हणाले, रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.

जनतेची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. यंत्रणेने ऍक्टिव्ह होऊन कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आ. मोहन मते म्हणाले, लॉकडऊनमुळे गरिबांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्याआधी गरिबांच्या पोटाची व्यवस्था करावी, अशी सूचना मांडली. आ. कृष्णा खोपडे म्हणाले, या विषयावर राजकारण करू नये असे सांगितले. सम-विषम नियम बंद करण्याचा पण त्यांनी सल्ला दिला. शहराच्या आउटर भागात दारूचे अड्डे सुरू झाले आहेत. तेथे होणाऱ्या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशी सूचना केली.

आ. विकास कुंभारे यांनी विलगीकरणाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की जर लॉकडाऊन केला तर नागरिक विरोध करतील. आ. प्रा. अनिल सोले यांनी शहरात जे निर्णय एकतर्फी घेणे सुरू आहे, त्यावर आक्षेप नोंदविला. लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, असे मत व्यक्त केले. स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्ता पक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनीही या शहरात लॉकडाऊन होऊ नये, अशी भूमिका मांडली. ते म्हणाले की, जनप्रतिनिधीनां सोबत घेऊन निर्णय घ्या. पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी पोलिसांच्या वतीने लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बाजू मांडली.

बैठक नियमित होणार
लॉकडाऊन असो, जनजागृती असो की कोरोनाची परिस्थिती असो, या सर्व विषयांचा आढावा घेण्यासाठी आता यापुढे लोकप्रतिनिधींची नियमित बैठक होईल. पुढील बैठक शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी होईल, असे महापौर संदीप जोशी यांनी जाहीर केले.

News Credit To NMC

स्मार्टसिटीत खोडा: तक्रारीनंतरही मनपा थंड

नागपूर:- ऑरेंजसिटीला स्मार्टसिटीत रूपांतराचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार नाहीय. कारण शहराच्या कानाकोप-यांत अतिक्रमण करणारे बळकट होत असून, मनपाचे अधिकारी कार्यालयीन प्रक्रियांतच गुंतले आढळतात. अतिक्रमणधारकांविषयीच्या लेखी तक्रारी करूनही झोन ​​आयुक्त फक्त नोटीसा देत आहेत तर हटाव पथक केवळ कारवाईच्या देखाव्यात गुंतले दिसते.

ताजी घटना मंगळवारी झोनमधील मानसरोवर कॉलनी आणि राऊत लेआउट भागातील आहेत. अवस्थी नगर चौक ते झिंगाबाई टाकळी या रिंग रोडवरील पियू जमीन अतिक्रमणधारकांनी घेरून टाकली असून आता तेथे पक्के दुकानंही बांधले जात आहेत.

झाडे तोडली, पक्के दुकाने:

झिंगाबाई टाकळी खसरा क्रमांक 260 हा एनआयटीने मंजूर केलेला लेआउट आहे. 260 ते 254/4 लेआउट दरम्यान अवस्थी नगर चौक ते रिंगरोड पर्यंत 80 फूट डीपी रस्ता आहे जो थेट गोधनीकडे जातो. या मार्गावर 10 वर्षांपूर्वी रस्त्यालगत मॉइल वतीने झाडे लावली होती. सर्वच झाडे मोठी झाल्याने दोन्हीबाजूस एकदम हिरवेगार वाटायचे. 13 ऑक्टोबर 2018 रोजी अज्ञात लोकांनी हि हिरवीगार झाडे तोडून अतिक्रमण सुरू केले. काहि दुकानही लागली.

रिक्त जागा पाहून अनेक लोक आक्रमकपणे अतिक्रमण करीत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्या मार्गाच्या पीयू जागेबाबत नागपूर सुधार प्रन्यास इमारत विभागाकडून माहिती मागविण्यात आली. विभागाकडून नकाशा मिळाल्यानंतर सखोल तपासणी करण्यात आली. नकाशात रस्त्याच्या सभोवतालच्या मोकळ्या जागेचे वर्णन आहे. असे असूनही लोकांनी मनमानीपणे अतिक्रमण केले आहे. काहींनी पीयू जमीन ताब्यात घेऊन फर्निचर व खुर्च्या विक्री सुरू केले. तर काहींनी सिमेंटचे बांधकाम आणि शेड टाकत अतिक्रमण केलेय.

अतिक्रमणाची माहिती व ती हटविण्याची विनंती स्थानिकांनी एनआयटीचे अभियंता आणि एनआयटीचे अध्यक्ष यांच्याकडे 19 ऑक्टोबर 2018 रोजीच केली मात्र अतिक्रमणधारकांवर कोणतीही कारवाई नाही. यानंतर 5 मार्च 2019 रोजी एनआयटीच्या अध्यक्षांनाही विनंती केली गेली.

स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्यानंतर 8 जुलै 2020 रोजी मंगळवारी झोनच्या अधिका-यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणांची पाहणी केली. यानंतर प्रशासनाची परवानगी न घेता अतिक्रमण केल्याबद्दल दोघांना नोटीस पाठविली होती.  नोटीस पाठविण्यास 20 दिवस पूर्ण झाले आहेत, परंतु अद्यापपर्यंत अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई झालेली नाही.

‘रिकव्हरी’ वरच प्रत्येकाचे लक्ष: मनपा,

पोलिस, आणि वाहतूक विभाग घुसखोरांवर कारवाईऐवजी फक्त ‘रिकव्हरी’ वरच लक्ष केंद्रित करून आहे. मनपा अधिकारी आणि हटाव पथकातील काही लोक अतिक्रमणका-यांस  काही लोकप्रतिनिधीच्या कृपेने संरक्षण देत असल्याचे चर्चा आहेत, नगरसेवकांचे लक्ष नाही आणि जनता कुणाविरूद्ध उघडपणे बोलण्याची हिम्मत करत नाही. ज्याच्या बळावर अतिक्रमण  वाढ चालूच आहे.

आम्ही सर्व आरोग्य यंत्रणेच्या पाठिशी!

कोव्हिड-१९ या महामारीविरुद्ध गेल्या चार महिन्यांपासून आरोग्य यंत्रणा जिकरीने लढा देत आहे. त्यांच्या अडचणी आम्हाला ठाऊक आहे. या परिस्थितीत त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि लोकप्रतिनिधी म्हणून हवी असेल ती मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आपण आवाज द्या. आम्ही धावून येऊ, असा विश्वास देत महापौर संदीप जोशी यांच्यासह खासदार आणि आमदारांनी मेयो आणि मेडिकलमधील अधिकाऱ्यांकडून व्यवस्थेची माहिती घेतली आणि परिस्थितीशी सामना करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठिशी उभे आहोत, असा विश्वास दिला.

महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारात आणि नेतृत्वात खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे यांनी सोमवारी (ता. २७) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे भेट देऊन कोव्हिड-१९ संदर्भात असलेल्या संपूर्ण व्यवस्थेची माहिती घेतली आणि अडचणीसुद्धा जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई होते. प्रारंभी त्यांनी मेयो रुग्णालयाला भेट दिली. प्रारंभी मेयोतील कोव्हिड हॉस्पीटलला जाऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर अधिष्ठाता कक्षात झालेल्या बैठकीत व्यवस्था आणि अडचणी जाणून घेतल्या. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आणि डॉ. सागर पांडे यांनी सध्या मेयोमधील व्यवस्थेची संपूर्ण माहिती दिली. आतापर्यंत मेयोमध्ये १७४० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ५५० बेडची व्यवस्था असून ग्रामीणमधील रुग्णांचाही भार वाढत असल्याने भविष्यात बेड कमी पडू शकतात, असे त्यांनी सांगितले. मात्र, सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशाच्या आधार घेत नागपूर महानगरपालिकेने लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिवाय आमदार निवास, व्हीएनआयटी, वनामती, सिम्बॉयसीस आणि पाचपावली विलगीकरण केंद्राचे रुपयांतर कोव्हिड केअर सेंटरमध्ये केल्याने २२०० बेडची व्यवस्था झाली आहे. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर तेथे उपचार होईल, अशी माहिती डॉ. योगेंद्र सवाई यांनी दिली. शिवाय काही खासगी रुग्णालये आणि हॉटेल्समध्येही अशा रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर सर्व लोकप्रतिनिधी यांनी मेडिकल रुग्णालयाला भेट दिली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुजल मित्रा यांच्यासह अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. तिरपुडे, डॉ. गोसावी ह्यांनी मेडिकलमध्ये कोव्हिड रुग्णांवर होत असलेल्या उपचाराची आणि व्यवस्थेची माहिती दिली. मेयोमध्ये कोव्हिड रुग्णांसोबतच अन्य रुग्णांचाही भार वाढला असल्याने बेडची कमतरता भविष्यात भासू शकते. शिवाय नागपूर शहराव्यतिरिक्त नागपूर ग्रामीण आणि नागपूर व अमरावती विभागातील सर्व शहरे यासोबतच मध्यप्रदेशातील काही शहरातील रुग्ण सरळ येत असल्याने मेडिकलचा ताण वाढत चालला आहे. लक्षणे नसलेली रुग्ण अधिक प्रमाणात येत असल्याने पेच निर्माण झाला होता. परंतु आता मनपाने नव्या आदेशानुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्यान असल्याने मेडिकलचा भार बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असे ते म्हणाले.
अधिष्ठाता डॉ. सुजल मित्रा यांनी सांगितले की, अमरावती विभागातील अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत येथे येतात. कोव्हिड पॉझिटिव्ह असलेल्या १७ गरोदर माता मेडिकलमध्ये दाखल आहेत. त्यात ७ महिलांची प्रसूती झाली. अशी अनेक आव्हाने समोर आहेत. असे असतानाही संपूर्ण चमू निकराने आणि जिकरीने लढा देत असल्याचे ते म्हणाले.

‘बेस कॅम्प’ची संकल्पना उत्तम
सरळ रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर नियंत्रण असावे यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात मुंबई आणि पुणे शहराच्या धर्तीवर ‘बेस कॅम्प’ तयार केले तर रुग्णालयांवरील भार बराचसा कमी होईल. जो कोणी व्यक्ती पॉझिटिव्ह असेल किंवा लक्षणे असतील त्याने सर्वप्रथम बेस कॅम्पमध्ये जावे. तेथून त्याला कुठल्या रुग्णालयात न्यायचे, लक्षणे नसतील आणि पॉझिटिव्ह असेल तर त्याला गृह विलगीकरणात ठेवायचे की अन्यत्र कुठे न्यायचे यासंदर्भात तेथील यंत्रणा निर्णय घेईल. मेडिकलचे अधिष्ठाता आणि अधिकाऱ्यांनी मांडलेली ही संकल्पना महापौरांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी उचलून धरली. यावर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

महापौरांनी केले संपूर्ण चमूचे कौतुक
मेयो आणि मेडिकलची संपूर्ण यंत्रणा पहिल्या दिवसापासून कोव्हिडशी लढा देत आहे. त्यांचे काम सर्वोत्तम आहेत. हेच खरे सैनिक आहे, असे म्हणत सर्व चमूचे तोंडभरून कौतुक केले. या कार्यात स्वयंसेवी संस्थांची मदत हवी असेल तर तसे सांगा. अन्य कुठलीही मदत सांगा. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या मदतीसाठी सज्ज आहोत. मेडिलकमध्ये प्रस्तावित हेल्पडेस्क तातडीने सुरू करायचा असेल आणि तेथेही स्वयंसेवकांची आवश्यकता असेल, ५०० लोकांच्या भोजनाची व्यवस्था हवी असेल तर ते सुद्धा करून देण्यास महापौर संदीप जोशी यांनी तयारी दर्शविली. स्वयंसेवकांना कोव्हिडशी कसे लढायचे हे प्रशिक्षण द्यावे जेणेकरून प्रतिबंधित क्षेत्र किंवा रुग्णालयात त्यांची मदत घेता येईल, अशी सूचनाही त्यांनी मांडली. अन्य लोकप्रतिनिधींनीही काही सूचना करीत आवश्यक ती सर्व मदत करु, असा विश्वास दिला.

शासनाच्या निर्देशांचे पालन करा : आयुक्त

महानगर पालिकेचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे अभिनंदन करीत आभार मानले. ते म्हणाले की, शनिवारी नागरिकांनी जसा उत्स्फूर्तपणे कर्फ्यू पाळला तसाच रविवारीही जनता कर्फ्यू पाळावा. आता अशा पध्दतीने जगणे शिका, हे सांगण्यासाठीच हा जनता कर्फ्यू आहे. राहणीमानात बदल करण्याने आणि शासनाच्या निर्देशांचे योग्य प्रकारे पालन केले तर कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल. आपल्या जीवाची पर्वा करा, लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यूची गरज भासणार नाही, अशी जीवनपद्धती आत्मसात करा, असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले.

आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी शनिवारी जनता कर्फ्यूचे निरीक्षण करण्यासाठी गोकुलपेठ, सीताबर्डी, इतवारी, मस्कासाथ, सेन्ट्रल एव्हेंन्यू भागाचा सकाळी दौरा केला.

News Credit To NMC

9 कर्मचारियों को कमिश्नर ने किया सस्पेंड

नागपुर:- नगर आयुक्त मुंढे पहले ही जनप्रतिनिधियों के साथ विवाद मे हैं, शुक्रवार को उन्होंने कुछ कर्मचारियों को फटकार लगाई। मुंढे कल सुबह 6 बजे अचानक निगम मुख्यालय में गए। मुख्यालय के मुख्य द्वार के निकट कोरोना नियंत्रण कक्ष है। यह कमरा 24 घंटे खुला रहता है। यहां स्टाफ को शिफ्ट में बुलाया जाता है।

रात के शिफ्ट में कर्मचारी ठीक से ड्युटी नहीं बजा रहे थे। कर्तव्य नहीं निभा रहे इन चारो कर्मचारीयो को कमिश्नर ने तत्काल प्रभाव से निलंबित कर दिया।

इसके बाद मुंढे ने अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशंस सेंटर का दौरा किया। वहां से, शहर के प्रत्येक क्षेत्र में सफाईकर्मी ड्यूटी के लिए मौजूद हैं या नहीं यह दिखाई देता हैं, उनका निरीक्षण किया। फोन लगाकर अचानक स्वच्छता निरीक्षकों को विभिन्न क्षेत्रों में जांचा और उनके लोकेशन चेक कीए।

उसके बाद पाचपावली, इंदौरा, धरमपेठ जैसे कुछ स्थानों पर उपस्थिति शेड का दौरा किया। वहां उपस्थिति रजिस्टर जांचे। वहां भी कुछ स्वच्छता निरीक्षक और अन्य कर्मचारी इमानदारी से ड्यूटी करते नहीं पाए गए। उन्हें भी तत्काल निलंबित करने का आदेश दिया गया है।

आम आदमी पार्टी ऑटो संगठने चे मनपा आयुक्ताना निवेदन

नागपुर:- आज आम आदमी पार्टी च्या ऑटो संघटने ने मनपा आयुक्त श्री तुकाराम मुंडे यांना ऑटो रिक्शा सेवा सुरु करण्या बद्दल निवेदन दिले. सम्पूर्ण जगात कोरोनाचा थैमान सुरु आहे. नागपुर शहरात देखील कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. या मुळे पूर्ण जगाची आर्थिक परिस्तिति गंभीर झाली आहे. नागपुरात ही लोकांना आर्थिक झळ जाणवली आहे. यात समाजाच्या आर्थिक दृष्ट्या सगळ्यात कामजोक अंगाची विकट परिस्तिति आहे.

नागपुर मध्ये ऑटो रिक्षा सेवेन वर्ती कोरोना मुळे बंदी आहे. याच बरोबर टैक्सी सेवा सुरु आहे. या टैक्सी वातानुकूलित आहेत आणि यात कॉन्टेक्ट सरफेस सुद्धा ऑटो रिक्षा हुन जास्ती आहे. वैद्यकीय दृष्टया ऑटो रिक्शा जास्त सुरक्षित आहे. ऑटो रिक्शा चालक हे समाजाच्या आर्थिक दृष्टया कमजोर तापक्यातुन येतो. मनपा आयुक्तनि या विषया बाबत विशेष दखल घ्यावी असे आम आदमी पार्टी ऑटो संघटनेची मागणी आहे.

हे निवेदन देतांना आम आदमी पार्टी ऑटो संघटनेचे समन्वयक श्री संजय अनासाने, नागपुर सचिव श्री भूषण ढाकूलकर, अब्दुल हाफिज, इमरान शेख, अब्दुल शाहिद व अन्य कार्यकर्ते उपस्तित होते. आम आदमी पार्टी ऑटो संघटने मार्फत ऑटो रिक्शा चालक यांच्या मुद्यना येणाऱ्या वेळात शासना समोर प्रखर पणे मांडनार.

 

नागरिकों को मौका दिया जाना चाहिए। उसके बाद भी स्थिति नियंत्रण में नहीं थी, तो … ! महापौर जोशी

नागपुर:- शहर में कोरोना के मरीजों की बढ़ती संख्या चिंता का विषय है। लेकिन लॉकडाउन ही एक विकल्प नहीं हो सकता। लॉकडाउन आम नागरिकों के लिए एक वित्तीय संकट होगा।

इसलिए, लॉकडाउन की घोषणा करते समय, सौ बार सोचना चाहिए, कल मेयर संदीप जोशी ने कहा। नागरिकों को 31 जुलाई तक जीवनशैली में बदलाव का मौका दिया जाना चाहिए, इसके बाद भी स्थिति नियंत्रण में नहीं आए, तो ही 1 अगस्त से लॉकडाउन पर विचार किया जाना चाहिए।

लॉकडाउन के बारे में आयुक्त के बार-बार के बयान पर प्रतिक्रिया देते हुए, मेयर जोशी ने आज एक वीडियो प्रसारित किया जिसमें कहा गया कि आयुक्त को कर्फ्यू लगाते समय सौ बार सोचना चाहिए। शहर में रोगियों की संख्या बढ़ रही है, यह सच है। इनमें से करीब 30 फीसदी मरीज ग्रामीण इलाकों के हैं। तीन बार लॉकडाउन के बाद भी मरीजों की संख्या बढ़ रही है।

तो लॉकडाउन या कर्फ्यू से मरीजों की संख्या कम हो जाएगी, यह 100 प्रतिशत सच नहीं है। कोरोना को दूर करने के लिए लॉकडाउन कोई समाधान नहीं है। दुर्भाग्य से, अगर यह संख्या बढ़ती रहती है, तो आप, हम, व्यापारियों और सभी को संगठित रूप से काम करने की जरूरत है।

शहर को नियमों को सख्ती से लागू करने की जरूरत है। यदि फिजिकल दूरी और मास्क के नियमों का पालन किया जाता है, तो लॉकडाउन की आवश्यकता नहीं होगी। मध्यम वर्ग, ठेलेवाले, मजदूरों की हालत बहुत खराब है। तालाबंदी के दौरान कई नौकरियां चली गईं। कुछ लोगों ने यह भी संदेश दिया है कि अगर फिर से लॉकडाउन होता है, तो यह आत्महत्या कि नौबत का समय होगा।

आइए जागरूकता पैदा करें: इसलिए आज से 31 तारीख तक, जागरूकता लाने के लिए विधायकों और सभी जनप्रतिनिधियों के साथ सड़कों पर उतरें, उसके बाद भी अगर स्थिति नियंत्रण में नहीं है, तो हम लॉकब पर विचार करेंगे। लॉकडाउन लगाना दो मिनट का कार्य है। लेकिन उसके बाद जो स्थिति पैदा होगी, वह भयानक होगी। इस स्थिति से बचने के लिए सहयोग करें। उन्होंने कोरोना के खिलाफ एकजुटता से लड़ाई का भी आह्वान किया।

आता हजार ऐवजी ₹१० हजार दंड

नागपूर:- आर्थिक प्रणाली पुन्हा रुळावर आणण्यासाठी कोविड -१९ विषयक च्या केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करत काही अटींवर संचारबंदीत शिथिलता देण्यात आली होती. दुकान उघडण्याचे, बंद करण्याचे वेळोवेळी टाइम टेबलही निश्चित केले गेले आहे. दुकानदार व ग्राहकांचे मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसींग पाळणे, व ग्राहक गेल्यानंतर, सॅनिटाईजेशन, स्वच्छता करणे अनिवार्य केले गेले आहे, परंतु सर्व मार्गदर्शक सूचनांचे उघडपणे उल्लंघन केले जात असल्याचेच सर्वत्र निदर्शनास येत आहे.

अशा नियमबाह्य वागणूक असणा-या दुकानदारांविरूद्ध कठोर पावले उचलत मनपा प्रशासनाने स्वच्छता उपायुक्त ते निरीक्षक, एनडीएस जवान, पोलिस निरीक्षक व वरिष्ठ अधिकारी यांना कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. अधिकारांचा वापर करून शहरातील विविध बाजारपेठांतील 56 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आणि 3 लाख 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

स्वत:स सुधारा अन्यथा कर्फ्युसह लॉकडाऊन: मुंढे

नागपूर:- गेल्या कैक महिन्यांपासून देशातील समस्त जनता वाट पाहतेय की कधी एकदा या कोरोनापासून कायमची मुक्ती मिळेल, व आधीप्रमाणे सहज जिवन जगाया मिळेल परंतु जोपर्यंत सर्वसामान्य जनता स्वत: नियमांचे काटेकोर पालन करत नाही तोपर्यंत आपण कोरोनापासून कसे मुक्त होऊ, जर सरकार घरातच रहा, सामाजिक अंतराचे अनुसरण करा म्हणत असेल व आपण जर का सामाजिक अंतराचे अनुसरण करत नसू तर? जनतेनेही नियमांचे पालन केले पाहिजे, परंतु असे होत नाही.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की नागपुरात कोरोणा मृत्यूची संख्या वाढली आहे, सर्वसामान्य लोक नियम पाळत नाहीत आणि रोगाची अजूनही लपवणूक करताहेत ज्यामुळे नागपुरात आकडेवारी वाढत आहे, तरी येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

पण याच वेगाने आंकड़े वाढत राहिल्यास येथे 10 हजाराहून अधिक रुग्ण व्हायला जास्त वेळ लागणार नाही, आणि जर हे असेच चालू राहिले तर मी केवळ लॉकडाउनच करणार नाही तर कर्फ्यू देखील लावणार आहे. दुकानांत 5 ऐवजी 10 लोक वावरत आहेत, मी स्वत:च हे पाहिले आहे, पदपथांवर गर्दी आहे, ऑटो रिक्षांना परवानगी नाही, तरीही ते अंदाधुंदपणे सुरू आहेत. एकाऐवजी मोटारसायकलवर दोन ते तीन लोक असतात, मास्कचा वापर केला जात नाहीय.

आता आगामी लॉकडाउन 14, 15 दिवसांचा असेल आणि लोकांना 2/3 दिवस आगाऊ माहिती दिली जाईल. लॉकडाउन झाल्यास कुणीच घराबाहेर पडू शकणार नाही. नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत नागपूरकरांना ही सूचना दिली आहे.

Exit mobile version