आम आदमी पार्टी ऑटो संगठने चे मनपा आयुक्ताना निवेदन

नागपुर:- आज आम आदमी पार्टी च्या ऑटो संघटने ने मनपा आयुक्त श्री तुकाराम मुंडे यांना ऑटो रिक्शा सेवा सुरु करण्या बद्दल निवेदन दिले. सम्पूर्ण जगात कोरोनाचा थैमान सुरु आहे. नागपुर शहरात देखील कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. या मुळे पूर्ण जगाची आर्थिक परिस्तिति गंभीर झाली आहे. नागपुरात ही लोकांना आर्थिक झळ जाणवली आहे. यात समाजाच्या आर्थिक दृष्ट्या सगळ्यात कामजोक अंगाची विकट परिस्तिति आहे.

नागपुर मध्ये ऑटो रिक्षा सेवेन वर्ती कोरोना मुळे बंदी आहे. याच बरोबर टैक्सी सेवा सुरु आहे. या टैक्सी वातानुकूलित आहेत आणि यात कॉन्टेक्ट सरफेस सुद्धा ऑटो रिक्षा हुन जास्ती आहे. वैद्यकीय दृष्टया ऑटो रिक्शा जास्त सुरक्षित आहे. ऑटो रिक्शा चालक हे समाजाच्या आर्थिक दृष्टया कमजोर तापक्यातुन येतो. मनपा आयुक्तनि या विषया बाबत विशेष दखल घ्यावी असे आम आदमी पार्टी ऑटो संघटनेची मागणी आहे.

हे निवेदन देतांना आम आदमी पार्टी ऑटो संघटनेचे समन्वयक श्री संजय अनासाने, नागपुर सचिव श्री भूषण ढाकूलकर, अब्दुल हाफिज, इमरान शेख, अब्दुल शाहिद व अन्य कार्यकर्ते उपस्तित होते. आम आदमी पार्टी ऑटो संघटने मार्फत ऑटो रिक्शा चालक यांच्या मुद्यना येणाऱ्या वेळात शासना समोर प्रखर पणे मांडनार.

 

नागरिकों को मौका दिया जाना चाहिए। उसके बाद भी स्थिति नियंत्रण में नहीं थी, तो … ! महापौर जोशी

नागपुर:- शहर में कोरोना के मरीजों की बढ़ती संख्या चिंता का विषय है। लेकिन लॉकडाउन ही एक विकल्प नहीं हो सकता। लॉकडाउन आम नागरिकों के लिए एक वित्तीय संकट होगा।

इसलिए, लॉकडाउन की घोषणा करते समय, सौ बार सोचना चाहिए, कल मेयर संदीप जोशी ने कहा। नागरिकों को 31 जुलाई तक जीवनशैली में बदलाव का मौका दिया जाना चाहिए, इसके बाद भी स्थिति नियंत्रण में नहीं आए, तो ही 1 अगस्त से लॉकडाउन पर विचार किया जाना चाहिए।

लॉकडाउन के बारे में आयुक्त के बार-बार के बयान पर प्रतिक्रिया देते हुए, मेयर जोशी ने आज एक वीडियो प्रसारित किया जिसमें कहा गया कि आयुक्त को कर्फ्यू लगाते समय सौ बार सोचना चाहिए। शहर में रोगियों की संख्या बढ़ रही है, यह सच है। इनमें से करीब 30 फीसदी मरीज ग्रामीण इलाकों के हैं। तीन बार लॉकडाउन के बाद भी मरीजों की संख्या बढ़ रही है।

तो लॉकडाउन या कर्फ्यू से मरीजों की संख्या कम हो जाएगी, यह 100 प्रतिशत सच नहीं है। कोरोना को दूर करने के लिए लॉकडाउन कोई समाधान नहीं है। दुर्भाग्य से, अगर यह संख्या बढ़ती रहती है, तो आप, हम, व्यापारियों और सभी को संगठित रूप से काम करने की जरूरत है।

शहर को नियमों को सख्ती से लागू करने की जरूरत है। यदि फिजिकल दूरी और मास्क के नियमों का पालन किया जाता है, तो लॉकडाउन की आवश्यकता नहीं होगी। मध्यम वर्ग, ठेलेवाले, मजदूरों की हालत बहुत खराब है। तालाबंदी के दौरान कई नौकरियां चली गईं। कुछ लोगों ने यह भी संदेश दिया है कि अगर फिर से लॉकडाउन होता है, तो यह आत्महत्या कि नौबत का समय होगा।

आइए जागरूकता पैदा करें: इसलिए आज से 31 तारीख तक, जागरूकता लाने के लिए विधायकों और सभी जनप्रतिनिधियों के साथ सड़कों पर उतरें, उसके बाद भी अगर स्थिति नियंत्रण में नहीं है, तो हम लॉकब पर विचार करेंगे। लॉकडाउन लगाना दो मिनट का कार्य है। लेकिन उसके बाद जो स्थिति पैदा होगी, वह भयानक होगी। इस स्थिति से बचने के लिए सहयोग करें। उन्होंने कोरोना के खिलाफ एकजुटता से लड़ाई का भी आह्वान किया।

आता हजार ऐवजी ₹१० हजार दंड

नागपूर:- आर्थिक प्रणाली पुन्हा रुळावर आणण्यासाठी कोविड -१९ विषयक च्या केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करत काही अटींवर संचारबंदीत शिथिलता देण्यात आली होती. दुकान उघडण्याचे, बंद करण्याचे वेळोवेळी टाइम टेबलही निश्चित केले गेले आहे. दुकानदार व ग्राहकांचे मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसींग पाळणे, व ग्राहक गेल्यानंतर, सॅनिटाईजेशन, स्वच्छता करणे अनिवार्य केले गेले आहे, परंतु सर्व मार्गदर्शक सूचनांचे उघडपणे उल्लंघन केले जात असल्याचेच सर्वत्र निदर्शनास येत आहे.

अशा नियमबाह्य वागणूक असणा-या दुकानदारांविरूद्ध कठोर पावले उचलत मनपा प्रशासनाने स्वच्छता उपायुक्त ते निरीक्षक, एनडीएस जवान, पोलिस निरीक्षक व वरिष्ठ अधिकारी यांना कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. अधिकारांचा वापर करून शहरातील विविध बाजारपेठांतील 56 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आणि 3 लाख 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

स्वत:स सुधारा अन्यथा कर्फ्युसह लॉकडाऊन: मुंढे

नागपूर:- गेल्या कैक महिन्यांपासून देशातील समस्त जनता वाट पाहतेय की कधी एकदा या कोरोनापासून कायमची मुक्ती मिळेल, व आधीप्रमाणे सहज जिवन जगाया मिळेल परंतु जोपर्यंत सर्वसामान्य जनता स्वत: नियमांचे काटेकोर पालन करत नाही तोपर्यंत आपण कोरोनापासून कसे मुक्त होऊ, जर सरकार घरातच रहा, सामाजिक अंतराचे अनुसरण करा म्हणत असेल व आपण जर का सामाजिक अंतराचे अनुसरण करत नसू तर? जनतेनेही नियमांचे पालन केले पाहिजे, परंतु असे होत नाही.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की नागपुरात कोरोणा मृत्यूची संख्या वाढली आहे, सर्वसामान्य लोक नियम पाळत नाहीत आणि रोगाची अजूनही लपवणूक करताहेत ज्यामुळे नागपुरात आकडेवारी वाढत आहे, तरी येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

पण याच वेगाने आंकड़े वाढत राहिल्यास येथे 10 हजाराहून अधिक रुग्ण व्हायला जास्त वेळ लागणार नाही, आणि जर हे असेच चालू राहिले तर मी केवळ लॉकडाउनच करणार नाही तर कर्फ्यू देखील लावणार आहे. दुकानांत 5 ऐवजी 10 लोक वावरत आहेत, मी स्वत:च हे पाहिले आहे, पदपथांवर गर्दी आहे, ऑटो रिक्षांना परवानगी नाही, तरीही ते अंदाधुंदपणे सुरू आहेत. एकाऐवजी मोटारसायकलवर दोन ते तीन लोक असतात, मास्कचा वापर केला जात नाहीय.

आता आगामी लॉकडाउन 14, 15 दिवसांचा असेल आणि लोकांना 2/3 दिवस आगाऊ माहिती दिली जाईल. लॉकडाउन झाल्यास कुणीच घराबाहेर पडू शकणार नाही. नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत नागपूरकरांना ही सूचना दिली आहे.

बेजबाबदार वागणूकच ठरणार पुन्हा लॉकडाउनसाठी कारणीभूत

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांना वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र या आवाहनाला अपेक्षेप्रमाणे शहरातील व्यापारी आणि नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. दुकानदारांकडून सम आणि विषम तारखांचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणे, दुकानांमध्ये गर्दी होउ देणे अशी बेजबाबदार वागणूकच शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे, असा सूचक इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

कोरोनाच्या संदर्भात नागरिक आणि व्यापा-यांनी नियमांचे पालन करावे यासंदर्भात जनजागृतीसाठी महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी (ता.२१) धरमपेठ झोन अंतर्गत बाजाराचा दौरा केला. यावेळी त्यांच्या सोबत धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेवक प्रमोद कौरती, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अंबाझरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय करे, व्यापारी आघाडीचे तुषार कोठारी, अजय शर्मा, गोपाल बावनकुळे, सागर जाधव, विजय डोंगरे, योगेश पाचपोर, मनोज पोद्दार आदी उपस्थित होते.

शंकरनगर चौकातून महापौरांनी दौ-याला सुरूवात केली. वेस्ट हायकोर्ट रोड, लक्ष्मीभूवन चौक, गोकूलपेठ बाजार, रामनगर परिसर या संपूर्ण भागात फिरून महापौर संदीप जोशी यांनी कोव्हिड-१९ संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले. दुकानांसंदर्भात सम आणि विषम तारखांच्यांच्या नियमांचे पालन करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले. कोव्हिड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने स्वत:सह इतरांच्या आरोग्याचा विचार करून सर्व नियमांचे पालन करावे. अन्यथा लॉकडाउनला सामोरे जावे, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे.

नियमांचे उल्लंघन करणा-या दोन दुकानांवर कारवाई

जनजागृती दौ-यादरम्यान महापौरांव्दारे नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असतानाच लक्ष्मीभूवन चौकातील मंगलकर ज्वेलर्स येथे ग्राहकांची गर्दी दिसून आली. कोणत्याही प्रकारचे शारिरीक अंतर राखले जात नसल्याचे दिसून येताच महापौर संदीप जोशी यांनी स्वत: ज्वेलर्सच्या दुकानात जावून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले व नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल सदर मालकाकडून दंड वसूल करण्याचे निर्देश उपद्रव शोध पथकाला दिले.

याशिवाय गोकुलपेठ ते राम नगर मार्गावरील दुकानांच्या ओळीत सम व विषम तारखांचे उल्लंघन करून तसेच फुटपाथवर अतिक्रमण करून दुकान पुढे आणलेल्या मिल्टन गिफ्ट अँड टॉय शॉपवरही कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. महापौरांच्या निर्देशानुसार पथकाद्वारे दोन्ही आस्थापनांकडून पाच हजार रुपये दंड वसूल केला. तसेच फुटपाथवर असलेले मिल्टन गिफ्ट अँड टॉय शॉपचे साहित्यही जप्त केले.

नगर आयुक्त मुंढे ऑन रोड

नागपुर:- उप-राजधानी में जहां कोरोना संक्रमण बढ़ता ही जा रहा है, वहीं अब नगर आयुक्त मुंढे  कार्रवाई के लिए कल यहां सड़कों पर उतरे। मुंढे ने बाजारों का अचानक दौरा किया। बर्डी, कॉटन मार्केट कॉम्प्लेक्स, सुभाष रोड, चिटनविस पार्क, शिवाजी प्रतिमा, गांधीसागर और इस के बीच कोविड के संबंध में नियमों का उल्लंघन करने वाले दुकानदारों और लोगों के खिलाफ कार्रवाई भी की गई। उन्होंने झांसी रानी चौक और आनंद टॉकीज के बीच वाली सड़क पर दुकानों में गए और दुकानदारों को जागरूक किया।

जिन दुकानों के कर्मचारियों या आने वाले ग्राहक जो मास्क पहने नहीं पाए गए उनपर जुर्माना लगाने का भी निर्देश दिया, उसके बाद, निगम के अधिकारियों ने तुरंत ऐसे नियमों को तोड़ने वाले दुकानदारों के खिलाफ दंडात्मक कार्रवाई की।

इसके बाद, उन्होंने बर्डी, कॉटन मार्केट कॉम्प्लेक्स, सुभाष रोड, चिटनविस पार्क, शिवाजी प्रतिमा और गांधी सागर के बीच वाली सड़क पर बाजार में घूमकर नियम उल्लंघन करने वालों के खिलाफ कार्रवाई करने का आदेश दिया।

यह देखने के बाद कि नियमों का उल्लंघन किया जा रहा है, मुंडे ने अधिकारियों से जवाब-तलब किया। लॉकडाउन में छुट का मतलब नियमों कि अनदेखी करना नहीं है। सरकारी दिशानिर्देशों का पालन करें।

नियम का पालन करो। अन्यथा, बड़ी कार्रवाई की जाएगी, ऐसी चेतावनी नगर आयुक्त मुंढे ने पहले ही दे रखी थी। और कल शाम वे सड़कों पर ख़ुद चले गए। उन्होंने शहर के मुख्य बाजारों में जाकर नियमों का उल्लंघन करने वाले दुकानदारों के खिलाफ कार्रवाई करने के निर्देश भी दिये।‌‌

 

NMC plans to ban entry, exit from town in lockdown of 15 days

Nagpur:- In addition to shutting down even important businesses such as groceries and vegetables, Nagpur Municipal Corporation (NMC) is reportedly preparing to limit all movement of people into or out of the city during the planned 15-day full curfew lock-out. The civic body, along with the police department and other government departments from Monday, is likely to begin preparing for this.

In the meeting on Saturday, NMC sources told Municipal Commissioner Tukaram Mundhe about his decision to ban people from entering the city and also exiting people from the city during the full lockdown in front of home minister Anil Deshmukh and guardian minister Nitin Raut.

“Mundhe said full curfew lockdown for containing Covid-19 spread would only succeed with a ban on people going into and out of the area. The ministers asked Mundhe and police department to hammer out information, “sources said.

शिस्त पाळण्यासाठी मनपाच्या मदतीने व्यापारी बनविणार ‘टास्क फोर्स’

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा अंतिम पर्याय असू शकतो. मात्र स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. यासाठी व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाच्या मदतीने स्वत: ‘टास्क फोर्स’ तयार करण्याचा निर्णय घेतला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या निर्णयाचे स्वागत करीत नागपूर कोरोनामुक्त करुया असे आवाहन केले.

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागपुरात रुग्णसंख्या वाढली. सध्या बाजार हे गर्दीचे ठिकाण असून तेथील गर्दी कशी नियंत्रित करायची, यासंदर्भात चर्चा करण्याकरिता नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त कक्षात विविध व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत शनिवारी (ता. १८) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, उपायुक्त निर्भय जैन, श्रमिक विभागाचे सहायक आयुक्त उज्ज्वल लोया, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अभय देशपांडे, शरद कोलते यांच्यासह नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया, एनसीसीएलचे विष्णू पचेरीवाला, रामअवतार तोतला, रेडिमेड मार्केट असोशिएशनचे अध्यक्ष रितेश मोदी, जागनाथ रोड क्लॉथ मार्केट असोशिएशनचे सचिव कल्पेश मदान, स्टील ॲण्ड हार्डवेअर चेंबर ऑफ विदर्भचे अध्यक्ष राजेश लखोटिया, सचिव संजय अग्रवाल, एनएचआरएचे अध्यक्ष तेजिंदरसिंह रेणू, नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे सचिव हेतल ठक्कर, नागपूर सराफा असोशिएशनचे राजेश रोकडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव संजय शिरपूरकर, व्हीटीएचे उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी, एनसीसीएलचे सहसचिव तरुण निर्बाण आदी उपस्थित होते.

व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, ३१ मे पर्यंत नागपुरात कोव्हिड रुग्णांची संख्या ४०० च्या जवळपास होती. मात्र, केवळ दीड महिन्यात १७०० ने आकडा वाढला. सद्या बाधितांची संख्या २१०० च्या घरात आहे. मृत्यूसंख्याही १३ वरून २५ वर पोहोचली.

यामागील सर्वात मोठे कारण नियमांचे पालन करण्याचे बंधन असतानाही ते पाळले जात नाही. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणजे बाजार आहे. बाजारातही नियम पाळले जात नसल्याचे लक्षात आले आहे. सम-विषम तारखेचा नियम असतानाही त्याचे उल्लंघन होणे, दुकानात क्षमतेपेक्षा अधिक ग्राहक येणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग न पाळणे या सर्व बाबींमुळे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे.

यासाठी व्यापाऱ्यांनी स्वत: पुढाकार घेणे आवश्यक आहे. किमान स्वत:च्या दुकानासाठी व्यापाऱ्यांनी नियम पाळायला आणि दुकानात येणाऱ्यांना नियम पाळण्याबाबत सांगितले तरी कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होवू शकते पर्यायाने लॉकडाऊन नव्याने लावण्याची गरज पडणार नाही. यासाठी व्यापाऱ्यांच्या सर्वच असोशिएशनने पुढाकार घेऊन आजपासूनच स्वयंशिस्त पाळण्यासोबत येणाऱ्या ग्राहकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्यांनी सांगीतले की, बहुतांश दुकानदार नियमांचे पालन करतात परंतु जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्यास व्यापारी संघटनांचे प्रतिनिधीनी पाठींबा दिला.

कोव्हिड ॲम्बॅसेडर आणि टास्क फोर्स

यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी मांडतानाच अतिशय चांगल्या सूचनाही केल्या. यापुढे आम्ही प्रत्येक व्यापारी कोव्हिड-१९च्या नियंत्रणासाठी ‘कोव्हिड ॲम्बॅसेडर’ म्हणून कार्य करण्यास तयार आहोत, अशी सूचना श्री. बी.सी. भरतिया व श्री.रितेश मोदी यांनी केली. प्रत्येक व्यापाऱ्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासून असणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रशासनाच्या नियमांमुळे घरी बसावे लागत आहे. अशा कर्मचाऱ्यांचा उपयोग करून प्रत्येक व्यापारी असोशिएशन एक टास्क फोर्स तयार करेल. दुकानात येणाऱ्या ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगण्यापासून मास्क लावण्याच्या सूचना देण्याचे कार्य ही टास्क फोर्स करेल. बाजार परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठीसुद्धा मनपाच्या सहकार्याने कार्य करेल, अशी सूचना श्री. अग्रवाल यांनी केली. नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया आणि नागपूर सराफा असोशिएशनचे राजेश रोकडे यांनी शहरात ठिकठिकाणी जनजागृतीचे फलक असोशिएनशनतर्फे लावण्याची सूचना केली. या सर्व सूचनांचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वागत करीत मनपाच्या वतीने या कार्यात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. असाच लोकसहभाग राहिला तर कोरोना हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले.

स्वातंत्र्यदिन हा कोरोनामुक्ती दिन ठरावा!

व्यापाऱ्यांनी संघटितपणे मनपा प्रशासनाला साथ दिली तर कोरोना नागपुरात हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही. यंदाचा स्वातंत्र्यदिन हा नागपूरसाठी ‘कोरोनामुक्ती दिन’ करण्याचा निर्धार करु या असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. या आवाहनाला व्यापारी असोशिएशनच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी दाद देत त्यादृष्टीने लवकरच संपूर्ण नियोजन करण्याचे आश्वासन दिले. मनपा अधिकाऱ्यांच्या समवेत समन्वय ठेवून हे ध्येय गाठण्याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याचाही विश्वास व्यापारी असोशिएनशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

News Credit To NMC

If complete lockdown returns, total curfew in town: Mundhe

Nagpur:- Municipal commissioner Tukaram Mundhe said on Friday that if complete lockdown is re-imposed in the coming days, there will be total curfew in which only medical emergencies with restrictions will be permitted, even on critical services.

At a joint meeting with top Nagpur Municipal Corporation (NMC) officials and the NMC headquarters police department, Mundhe instructed them to get into ‘action mode’ and first strictly enforce the Covid-19 guidelines.

Mundhe told that all choices, including complete lockout, are available when people still don’t listen. “As in the case of many other cities, I want to stop complete lockdown,” he said.

On Thursday he had left for Mumbai and returned in the evening. The July 25 visit and meeting with police officers caused speculations about full lockdown.

नाला आणि गडरलाईनवरील अतिक्रमणावर होणार मोठी कारवाई!

नागपूर:- नागपूर शहरातील नाले आणि गडरलाईनवरील अतिक्रमण हे पावसाचे पाणी घरात शिरण्यासाठी सर्वात मोठे कारण ठरत आहे. मुसळधार पाऊस आला की नाल्यांलगतच्या वस्त्यांमध्ये नेहमी ही परिस्थिती उद्‌भवते. या विषयाच्या अभ्यासाअंती नाला आणि गडरलाईनवर असलेले अतिक्रमण हे सर्वात मोठे कारण असून लवकरच अशा अतिक्रमणांवर मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

नागपूर शहरासाठी हा प्रश्न सध्या गंभीर असून यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारींच्या आधारे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी आणि अन्य अधिकाऱ्यांची एक समिती बनवून याचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते. या विषयाच्या अभ्यासाअंती मोठ्या गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

यासंदर्भात माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, गडरलाईनवरील अतिक्रमण ही शहरासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. गडरलाईनवर केलेल्या पक्क्या बांधकामामुळे दुरुस्तीचे कामे होऊ शकत नाही. त्यात अडथळे निर्माण होत आहे. शहरात सुमारे २७५ पेक्षा अधिक ठिकाणी पक्के घर बांधणे, गडरलाईन कव्हर करणे, वऱ्हांडा बांधणे अशी कामे नागरिकांनी केली आहेत. यामुळे चोकेज काढता येत नाही. पाऊस आला की चोकेजमुळे घाण पाणी बाहेर पडतं आणि घरांमध्ये शिरतं.

नाल्यांच्याही बाबतीत अशीच परिस्थिती आहे. ७० पेक्षा अधिक भागांमध्ये नाल्यांमध्ये काँक्रीटचे स्तंभ उभारणे, स्लॅब टाकणे, नाल्याकाठी सोसायटी उभारणाऱ्या बिल्डरने नाल्याची भिंत उंच करणे, नाल्याची जागा बळकावून आत बांधकाम करणे आणि नाल्याचा प्रवाह वळविणे, असे गंभीर प्रकारही समोर आले आहेत. शहरात २२७ नाले आहेत. परंतु आता ही संख्या १३० च्या आसपास आल्याचे तीन महिन्यांच्या अभ्यास लक्षात आले. ही बाब अत्यंत गंभीर असून आता याविरोधात मोहिमच उघडण्यात येत असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

अतिक्रमण काढा नाहीतर कारवाई!
नैसर्गिक प्रवाह अडविण्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरु लागले आहे. अतिक्रमण हा त्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे ज्यांनी गडरलाईनवर, नाल्यांवर जेथे कुठे अतिक्रमण केले आहेत, पिलर्स उभारले आहेत, त्यांनी तातडीने अतिक्रमणे काढावीत, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अतिक्रमण करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

शहरातील नाले आणि गडरलाईनवरील अतिक्रमण हे पावसाचे पाणी घरात शिरण्यासाठी सर्वात मोठे कारण ठरत आहे. मुसळधार पाऊस आला की नाल्यांलगतच्या वस्त्यांमध्ये नेहमी ही परिस्थिती उद्‌भवते. या विषयाच्या अभ्यासाअंती नाला आणि गडरलाईनवर असलेले अतिक्रमण हे सर्वात मोठे कारण असून लवकरच अशा अतिक्रमणांवर मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

नागपूर शहरासाठी हा प्रश्न सध्या गंभीर असून यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारींच्या आधारे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी आणि अन्य अधिकाऱ्यांची एक समिती बनवून याचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते. या विषयाच्या अभ्यासाअंती मोठ्या गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
यासंदर्भात माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, गडरलाईनवरील अतिक्रमण ही शहरासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. गडरलाईनवर केलेल्या पक्क्या बांधकामामुळे दुरुस्तीचे कामे होऊ शकत नाही. त्यात अडथळे निर्माण होत आहे. शहरात सुमारे २७५ पेक्षा अधिक ठिकाणी पक्के घर बांधणे, गडरलाईन कव्हर करणे, वऱ्हांडा बांधणे अशी कामे नागरिकांनी केली आहेत. यामुळे चोकेज काढता येत नाही. पाऊस आला की चोकेजमुळे घाण पाणी बाहेर पडतं आणि घरांमध्ये शिरतं.
नाल्यांच्याही बाबतीत अशीच परिस्थिती आहे. ७० पेक्षा अधिक भागांमध्ये नाल्यांमध्ये काँक्रीटचे स्तंभ उभारणे, स्लॅब टाकणे, नाल्याकाठी सोसायटी उभारणाऱ्या बिल्डरने नाल्याची भिंत उंच करणे, नाल्याची जागा बळकावून आत बांधकाम करणे आणि नाल्याचा प्रवाह वळविणे, असे गंभीर प्रकारही समोर आले आहेत. शहरात २२७ नाले आहेत. परंतु आता ही संख्या १३० च्या आसपास आल्याचे तीन महिन्यांच्या अभ्यास लक्षात आले. ही बाब अत्यंत गंभीर असून आता याविरोधात मोहिमच उघडण्यात येत असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

अतिक्रमण काढा नाहीतर कारवाई!
नैसर्गिक प्रवाह अडविण्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरु लागले आहे. अतिक्रमण हा त्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे ज्यांनी गडरलाईनवर, नाल्यांवर जेथे कुठे अतिक्रमण केले आहेत, पिलर्स उभारले आहेत, त्यांनी तातडीने अतिक्रमणे काढावीत, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अतिक्रमण करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

News Credit to NMC

Exit mobile version