कोव्हिडबाबत शासनाचे नियम पाळा नाहीतर होणार गुन्हे दाखल

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. शासनाच्या दिशानिर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करावे या अटीवर दैनंदिन कामकाज सुरू करण्याची सवलत देण्यात आली. नागरिकांना प्रशासनातर्फे वेळोवेळी आवाहन करण्यात आले. मात्र, नागरिक नियम पाळत नसल्याचे झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढत्या मृत्युसंख्येवरून दिसू लागले आहे. त्यामुळे आता नियम तोडणाऱ्यांवर तात्काळ प्रभावाने साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत सरळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक शहरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, नागपुरात लॉकडाऊन करण्याची गरज पडू नये, यासाठी आता नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी या विषयावर शुक्रवारी (ता. १७) नागपुरातील मनपाच्या दहाही झोनचे सहायक आयुक्त आणि पोलिस प्रशासनातील अतिरिक्त आयुक्तांसह सर्व झोनचे उपायुक्त यांची संयुक्त बैठक मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलिस उपायुक्त सर्वश्री विवेक मासाळ, राहुल माकणीकर, विक्रम साळी, निलोत्पल, श्वेता खेडकर, विनिता एस., पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख आणि मनपाच्या दहाही झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.

‘मिशन बिगीन अगेन’ सुरू होण्यापूर्वी नागपुरात ४०० च्या जवळपास कोव्हिड रुग्णसंख्या होती. मात्र, १६ जुलैपर्यंत ती २१०० च्या घरात गेली. म्हणजेच दीड महिन्यात १७०० रुग्णवाढ झाली. याचाच अर्थ नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत असूनही ते केले जात नाही. बाजारात व्यापाऱ्यांना ताकीद देऊनही सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात येत नाही. मास्कचा वापर केला जात नाही.

दुकानांसाठी जे नियम आखून दिले आहेत, त्याचेही उल्लंघन होत आहे. नाईट कर्फ्यूची ही गांभीर्यपूर्वक अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी पोलीस विभागास केले.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापुढे मार्केट परिसरात नियमांचे काटेकोरपणे पालन व्हायलाच हवे, असे म्हणत आजपर्यंत नागरिकांवर प्रशासनाने ही जबाबदारी टाकली होती. आता नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करीत असतील तर त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्याखाली ‘ऑन दि स्पॉट’ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यासाठी मनपा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने आजपासूनच ॲक्टिव्ह मोडवर यावे असेही त्यांनी सांगीतले.

हॉकर्सवर होणार कारवाई
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत काढण्यात आलेल्या आदेशात कुठेही शहरात हॉकर्सला परवानगी देण्यात आलेली नाही. मुख्य बाजारात आणि गल्ल्यांमध्येही हॉकर्स बसलेले आहेत. सम-विषम नियमात दुकानांना परवानगी आहे. मात्र, हॉकर्स दिशा बदलवून बसू लागले आहे. ही बाब पोलिस अधिकाऱ्यांनीच लक्षात आणून दिली. अशा शहरातील सर्व हॉकर्सवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिले. त्यांनी सांगितले की कुठल्याही वाहनामध्ये अनुज्ञेय संख्येपेक्षा जास्त प्रवासी असल्यास कारवाई करण्यात यावी.

दंडाची रक्कम वाढणार
बाजार परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दंड आकारण्यात येत होता. आता ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे. नवा आदेश काढून ही रक्कम वाढवणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी बैठकीत दिली. दुकाने सुरू ठेवण्याची वेळ निश्चित केलेली असतानाही रात्री ९ ते १० वाजतापर्यंत दुकाने उघडे राहात असल्याची बाब मनपा आयुक्तांनी सहायक आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांच्या लक्षात आणून दिली. अशा दुकानांवरही कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

रात्रीच्या संचारबंदीचीही कडक अंमलबजावणी
शासनाचे दिशानिर्देश आणि स्थानिक पातळीवर काढलेल्या आदेशानुसार रात्री ९ ते सकाळी ५ वाजतापर्यंत शहरात संचारबंदी राहील, असे नमूद आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिकांचे आवागमन सुरू आहे. यासाठी पोलिसांनी नाकाबंदी करावी, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देशही मनपा आयुक्तांनी दिले. विलगीकरण केंद्रातला पोलिस बंदोबस्त, प्रतिबंधित क्षेत्रातील आवगमनावरील नियंत्रण पूर्वीसारखे कडक करण्याचे निर्देशही मनपा आयुक्तांनी दिले.

कार्यालयांनाही उपस्थिती संख्येचे बंधन पाळावे
राज्य शासनाने खाजगी कार्यालयात १० टक्के किंवा जास्तीत जास्त १० कर्मचारी अनुज्ञेय केले आहे. तसेच शासकीय कार्यालयात १५ टक्के किंवा जास्तीत जास्त १५ कर्मचारी अनुज्ञेय करण्यात आले आहे. यामधून अत्यावश्यक सेवा देणारे शासकीय कार्यालय जसे आरोग्य विभाग, लेखा विभाग, आपातकालीन व्यवस्थापन, पोलीस, एन.आय.सी., खाद्यान्न आपूर्ति विभाग, महानगरपालिकेची सेवा, एफ.सी.आय, आणि एन.वाय.के. यांना वगळण्यात आले आहे.

लॉकडाऊन हा अंतिम पर्याय : आयुक्त तुकाराम मुंढे
महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणे नागपुरातही लॉकडाऊन व्हावे, ही आपली भूमिका सद्यास्थितीत नाहीच. पण नागरिकांना वेळोवेळी आवाहन करूनही जर त्यांनी नियमांचे पालन केले नाही, शिस्त पाळली नाही तर ‘लॉकडाऊन’च्या पर्यायावरही विचार करावा लागेल असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपा आणि पोलिस प्रशासनासोबतच्या संयुक्त बैठकीत सांगितले. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंन्सिंग पाळावे, रात्र संचारबंदीचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, हॉकर्सने दुकाने थाटू नये, हे नियम जे पाळत नसतील त्यांच्यावर कुठलीही तमा न बाळगता कारवाई करा, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपाचे सहायक आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांना दिले. आपल्यासाठी मनुष्याचा जीव आणि या शहराचे आरोग्य महत्त्वाचे आहे. यात नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी बैठकीच्या माध्यमातून केले.

News Credit To:- NMC

पावसाचे पाणी घरात…?

नागपुर:- नागपुरात मुसळधार पाऊस आला की नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये आणि घरांमध्येही पाणी शिरते. दरवर्षी याबाबत ओरड होते. मनपा प्रशासनाकडे बोट दाखविले जाते. यासंदर्भात अनेक तक्रारीही मनपाला प्राप्त होतात. विषय तसा गंभीरच. परंतु पाऊस संपला की हा विषयही संपतो. पावसाळा आला की पुन्हा हा विषय डोके वर काढतो.

पण यावर्षी या विषयाच्या मुळाशी जाण्याचे मनपा प्रशासनाने ठरविले आणि त्याचा अभ्यास सुरू केला. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अभ्यासाअंती या विषयातील अनेक गंभीर बाबी समोर आल्या. हा प्रश्न नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित असल्याचे अभ्यासाअंती निष्पन्न झाले. शहरातील अनेक गडरलाईनवर नागरिकांनी पक्के बांधकाम करून ठेवले. सुमारे २७५ ठिकाणी गडरलाईनवर घरे बांधणे, अतिक्रमण केल्याचे समोर आले. यामुळे गडरलाईन चोक झाल्यास त्याची दुरुस्ती करता येत नाही. स्वच्छतेत अडथळा निर्माण होतो. चोकेजमुळे घाण पाणी बाहेर येऊन घरात शिरते.

नाल्यांचीही परिस्थिती अशीच आहे. नाल्यांमध्ये काँक्रीटचे स्तंभ उभारणे, स्लॅब टाकणे, त्यावर वऱ्हांडा बांधणे, पक्के बांधकाम करणे, घरे उभारण्यासारखे गंभीर प्रकार आहेत. अनेक ठिकाणी नाल्यामध्येच अतिक्रमण करून नैसर्गिक प्रवाह वळविण्यात आला आहे. नाल्याच्या भिंतीवर बिल्डर्सनी उंच भिंती उभ्या केल्या.

यामुळे बॅक वॉटरमुळे नाल्याचे पाणी बाहेर फेकल्या जाते. परिणामी वस्त्या जलमय होतात. २२७ नाल्यांची संख्या १३० च्या आसपास आल्याची गंभीर बाब यानिमित्ताने उजेडात आली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर शहरातील नाले गायब होतील आणि पावसाळ्यात सर्वत्र पाणीच दिसेल. ही परिस्थिती टाळायची असेल तर नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन ही अतिक्रमणे काढायला हवी. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यास मनपा मागेपुढे पाहणार नाही, हे ही तितकेच खरे!

लॉकडाऊन करा, मात्र लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन.. !

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाने अनेक बाबीत शिथिलता दिली. मात्र त्याबरोबरच दिशानिर्देशांचे पालन करण्याचे बंधन घातले. नागपूरकरांनी या गोष्टीला तिलांजली देत नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याच्या आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्याला आपले समर्थन आहे. फक्त निर्णय घेताना या शहरातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, अशी विनंतीवजा सूचना महापौर संदीप जोशी यांनी केली आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल एक व्हिडिओ प्रसारित करून नागरिकांनी नियम पाळले नाही तर नागपुरात संचारबंदी लागू करावी लागेल असा इशारा दिला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागपुरात नागरिकांनी नियम पाळले नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली, हे वास्तव आहे. आयुक्तांच्या या मताशी आपण पूर्णतः सहमत आहोत. नागरिकांना जी सूट देण्यात आली त्याचा गैरफायदा घेत सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात आहे. घालून दिलेले नियम पायदळी तुडविले जात आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी संचारबंदीसारखा निर्णय स्वागतार्ह आहे.

पण या निर्णयाने कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांचे मोठे नुकसान होणार आहे. याची चाचपणी करण्यासाठी आयुक्तांनी माझ्यासोबत शहराचा संयुक्त दौरा करावा. जे व्यापारी नियम पाळत नाहीत अशा बाजारपेठामध्ये महापौर आणि आयुक्त संयुक्तरित्या फिरल्यास त्यातून एक वेगळा संदेश जाईल. परिणामही होईल. यामुळे कदाचित समचारबंदी लागू करण्याची वेळही येणार नाही. याउपरही परिस्थिती जर आटोक्याबाहेर जात असेल तर निश्चितच संचारबंदीचा निर्णय घ्यायला हवा.

परंतु हा निर्णय घेताना मनपा आयुक्तांनी या शहरातील खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासनाला विश्वासात घ्यावे. संचारबंदीचे नियम काय असतील यावर साधकबाधक चर्चा व्हायला हवी. कारण कुठलीही अडचण आली तर नागरिक सर्वप्रथम लोकप्रतिनिधीकडे येतो. नागरिकांची नस जनप्रतिनिधींना माहिती आहे. संचारबंदी जाहीर करण्यापूर्वी जनजागृती करावी. या कुठल्याही प्रयत्नांचा परिणाम झाला नाही तर नक्कीच संचारबंदी जाहीर करावी, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पूर्णपणे प्रशासनाच्या सोबत राहू, असेही महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे.

If violations continue, full lockdown: Tukaram Mundhe

Nagpur:- Municipal commissioner Tukaram Mundhe warned on Saturday that complete lockdown and curfew would be reimposed on lines from other cities if violations of guidelines meant to contain spread of novel coronavirus persisted.

Alarmed by the sharp increase in Covid-19 positive cases as well as deaths after lockdown requirements were loosened from June 1, Mundhe appealed to citizens to obey caution and discipline. He also said that from Monday, FIR will be reported against violators.

According to data released on Saturday by the Nagpur Municipal Corporation (NMC), 1,337 corona-positive cases were reported in the city between 1 June and 10 July, whereas the number was 495 between 11 March and 31 May. Doubling rate also fell significantly from 49 to 18 days, though deaths rose to 17.

Thane, Kalyan-Dombivli and Mira-Bhayander municipal corporations have reimposed full lockdowns following a increase in cases after ease in lockdown. Lockdown from 13 July in Pune and Pimpri-Chinchwad will be improved.

Mundhe told that, when protocols were followed, there were fewer cases in town during full lockdown. “Rules were relaxed to restore economic and social life but people stopped following the guidelines of the government and the NMC, leading to a spike in cases,” he said.

He stressed that the pandemic can be “managed easily if everyone maintains distancing Covid, wearing masks in public, upholding the respiratory etiquette and avoiding vomiting in public places.”

“Norms which are formulated for shops and private establishments are not followed either. Enough chances have been given but stringent action against violators will be taken from now on, “he said.

Citing cases in which some people had attempted to refuse admission to isolation wards after positive testing, he said, “This will increase cases further. They should be immediately admitted for the sake of self and the safety of society. Some people do not seek medical advice while showing symptoms, which could lead to death as has happened in the last few days.

Testing has increased, rapid antigen tests and antibody tests have begun, patients with Covid-19 are now being treated in private hospitals, all forms of facilities are being provided in quarantine centers and asymptomatic patients have been set up in Covid Treatment Centres. People should be cooperating with authorities now. Anyone who has health problems should consult doctors compulsorily. Everyone can call the control room at the NMC and request assistance, “he said.

Mundhe said Nagpur Central Jail has emerged as a new hotspot as more than 300 positively screened while many of the prisoners have yet to be checked. “Early detection and treatment of cases would help to keep the mortality low and control Covid-19 spread. We’ll need to prevent new hotspots from emerging, “he said.

आयुक्त क्यो रह गए अकेले

नागपुर:- स्मार्ट सिटी के निदेशक मंडल की बैठक में कुछ निदेशकों ने सीधे और कुछ ने सीईओ के रूप में नियुक्ति के आयुक्त के प्रस्ताव का विरोध किया। नागपुर स्मार्ट एंड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन के अध्यक्ष, प्रवीण परदेसी ने भी अपनी नाराजगी जताई। इसलिए, पूरी बैठक में आयुक्त के अकेले होने की तस्वीर दिखाई दी। केवल शिवसेना के नगरसेविका ने उनके प्रस्ताव का समर्थन किया।

मेयर और आयुक्त के बीच लंबे समय से चलते विवाद के बाद नागपुर स्मार्ट एंड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड के निदेशक मंडल की लंबे समय से प्रतीक्षित बैठक संपन्न हुई। बैठक के दौरान, अध्यक्ष प्रवीण परदेसी ने स्पष्ट किया कि आयुक्त को सीईओ के रूप में कभी नियुक्त नहीं किया गया है। इसलिए कमिश्नर पसोपेश में थे। विशेष यह भी, कि आयुक्त ने खुद स्मार्ट सिटी के सीईओ के रूप में अपनी (आयुक्त) नियुक्ति का प्रस्ताव रखा। मेयर संदीप जोशी ने आश्चर्य व्यक्त करते हुए इसका विरोध किया। उसके बाद, अध्यक्ष प्रवीण परदेसी ने प्रत्येक निदेशक से सीईओ के रूप में आयुक्त के प्रस्ताव पर पूछा। इनमें कलेक्टर रवींद्र ठाकरे, पुलिस आयुक्त डॉ भूषण कुमार उपाध्याय, नासुप्र स्पीकर शीतल उगले भी शामिल हैं। इन अधिकारियों ने सुझाव दिया कि स्मार्ट सिटी की मानव संसाधन नीति के अनुसार सीईओ को नियुक्त किया जाना चाहिए।‌‌

एचआर पॉलिसी में, अगर कोई पूर्णकालिक सीईओ नहीं है, तो डिप्टी सीईओ को चार्ज दिया जा सकता है, यह बात स्पष्ट है। बाद में, मेयर जोशी, स्थायी समिति के अध्यक्ष पिंटू झलके, सत्तारूढ़ पार्टी के नेता संदीप जाधव, विपक्ष के नेता तानाजी वनवे और बसपा समूह के नेता वैशाली नारनवरे ने भी मांग की कि यह पद पूर्णकालिक सीईओ बनने तक डेप्युटी सीईओ को दिया जाए। बैठक के दौरान, आयुक्त मुंडे अकेले दिखाई दिए। केवल सेना पार्षद मंगला गवरे ने आयुक्त के प्रस्ताव का समर्थन किया। लेकिन उन्होंने यह भी कहा कि निर्णय नियमानुसार लिया जाना चाहिए।

और आयुक्त बैठक से चले गए: सीईओ पद तय नहीं किया गया तो, कमिश्नर बैठक खत्म होते ही पहले बाहर आ गए। बैठक के दौरान प्रवीण परदेसी को छोड़, उन्होंने किसी से भी ज्यादा बात नहीं की।

समर्थक काम में लग गए: हालांकि आयुक्त को सीईओ के रूप में नियुक्त नहीं किया गया है, लेकिन उन्हें सोशल मीडिया पर अपने समर्थकों का बहुत समर्थन मिल रहा है। एक समर्थक ने आयुक्त के समर्थन में सड़कों पर उतरने की लोगों से अपील की।‌‌

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा : दिशानिर्देशांचे कडक पालन करण्याचे आवाहन

नागपूर:- नागपुरात गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलेली कोव्हिड-१९ रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सुरू झालेल्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली. परंतु, हे करताना दिशानिर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. नागपुरात नागरिकांकडून दिशानिर्देशांचे पालन होत नाही, हे गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत झालेल्या वाढीने सिद्ध केले आहे. यापुढेही जर अशीच परिस्थिती राहिली तर नागपुरात पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

नागपुरातील कोरोनाच्या परिस्थितीवर शनिवारी (ता. ११) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी कोरोनासंदर्भात नागपुरातील परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळला होता. आज ११ जुलै आहे. चार महिन्यात रुग्णांची संख्या १७८९ इतकी आहे. मात्र, ही संख्या गेल्या दीड महिन्यात झपाट्याने वाढली. राज्य शासनाने १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु केले. याअंतर्गत काही बंधने पाळून आणि दिशानिर्देशांचे पालन करून नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार करण्याची मुभा दिली.

जर आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नये, असेही राज्य शासनाने म्हटले होते. मात्र, राज्य शासन आणि स्थानिक पातळीवर महानगरपालिकेने दिलेल्या दिशानिर्देशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे लक्षात आले आहे. खासगी किंवा शासकीय कार्यालयात १५ व्यक्ती किंवा १५ टक्के यापेक्षा जी संख्या अधिक असेल त्या संख्येत कर्मचाऱ्यांना बोलावून काम करण्याच मुभा देण्यात आली होती. परंतु त्याचेही उल्लंघन होत आहे. दुकाने सुरु करण्यासंदर्भातील काही नियम आहेत. बाजार परिसरातील दुकाने एका बाजूची एक दिवस आणि दुसऱ्या बाजूची दुसऱ्या दिवशी उघडावी, तसे दिवस ठरवून देण्यात आले आहेत. दुकाने सुरू ठेवण्याचा वेळ हा सकाळी ९ ते सायंकाळी ७ असा आहे.

मात्र, हा नियमही पाळला जात नाही. दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी सोशल डिस्टंसिंग पाळावे, मास्कचा वापर करावा या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी दुकान मालकांची आहे. त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. अनेक जण विनाकारण शहरात फिरत आहे. दुचाकींवर दोन व्यक्ती तर चार चाकी वाहनांत पाच-पाच व्यक्ती फिरत आहे. परिणामी आता नागपूर शहरात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  ही परिस्थिती अशीच राहिली, नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर आणखी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे दिशानिर्देशांचे पालन करा, स्वत: सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

उल्लंघन करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

लॉकडाऊनचा निर्णय घेण्याअगोदर सोमवारपासून मनपा आणि पोलिस प्रशासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवणार आहे. कुणी नियम तोडताना आढळून आल्यास मनपा आणि पोलिस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती नागरिकांनी द्यावी. अशा नियम मोडणाऱ्या व्यक्ती, संस्था, खासगी कार्यालये आदींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

मध्यवर्ती कारागृह नवा ‘हॉटस्पॉट’

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील ५०० कैद्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे ३०० कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. अजून सुमारे १२०० जणांची चाचणी व्हायची आहे. त्यातून मोठा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. एकंदरच मध्यवर्ती कारागृह आता कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’ झाला आहे. असे हॉटस्पॉट नागपूर शहरात इतरत्र तयार होऊ नये, असे वाटत असेल तर कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी दिशानिर्देशांचे पालन करा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

नागपुरात कोरोनाच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण : मा मंत्री आदित्य ठाकरे

श्री. आदित्य ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेव्दारे कळमेश्वर येथील राधास्वामी सत्संग ब्यास येथे उभारण्यात आलेल्या पाच हजार खाटांच्या कोविड केअर सेंटरची सुध्दा प्रशंसा केली. श्री. मुंढे यांनी सांगितले की, ५०० खाटा तयार आहेत आणि जर आवश्यकता भासली तर त्याची क्षमता ५००० पर्यंत केली जाऊ शकते. आयुक्तांनी सतरंजीपुरा, मोमिनपुरा आणि नाईक तलाव येथील घनदाट वस्तीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची चर्चा केली.

त्यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांकडून सुध्दा सारी रुग्णांची माहिती घेतली जाते. जर त्यांचा स्वॅब टेस्ट पॉजिटीव्ह निघाला तर त्यांना शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येते. श्री. तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला अद्ययावत रुग्णवाहिका (लाईफ सर्पोट एम्बुलेंस) देण्याची विनंती केली. श्री. ठाकरे यांनी या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राखण्यासाठी आणि मृत्यू दर कमीत-कमी ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री मा श्री आदित्य ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांची मनापासून प्रशंसा केली.

श्री. आदित्य ठाकरे गुरुवारी सकाळी नागपूर, नाशिक आणि औरंगाबादच्या मनपा आयुक्तांसोबत कोरोनावर प्रभावी ‍नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने चर्चा करत होते. श्री. ठाकरे म्हणाले की, नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका आणि नावीन्यपूर्ण उपाय करुन कोरोनाचे प्रभावी नियंत्रण केले. त्यांनी काँटॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग आणि शीघ्र उपचाराची व्यवस्था केली. त्यांनी सांगितले की, आता राज्याच्या इतर ठिकाणी सुध्दा कॉटॅक्ट ट्रेसिंगवर जोर दिल्या जात आहे. महानगरपालिकेने घरोघरी सर्वेक्षण, समूह विलगीकरण रणनितीवर जास्त भर दिला पाहिजे, असेही ना. आदित्य ठाकरे म्हणाले.
मनपा आयुक्त श्री. मुंढे यांनी नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, कोरोनाशी लढण्यासाठी शासनाच्या दिशानिर्देशाच्या अधीन राहून महानगरपालिकेने “कोरोना वार रुम” मध्ये तज्ञांशी दररोज चर्चा करुन नवीन-नवीन उपाय योजनांचा शोध घेतला. कुठलीही वेळ वाया न घालवता या उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन कोविड-१९ चा प्रसार प्रभावीपणे रोखला.

महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या रुग्णालयांमधील खाटांची संख्या ५०० पर्यंत नेली आणि खासगी रुग्णालयांनासुद्धा कोविड-१९ च्या रुग्णांसाठी तयारी ठेवण्याचे निर्देश दिले. केंद्र शासनाच्या पथकाने सुध्दा नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमाने केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. नागपुरात मनपाच्या माध्यमाने घरोघरी सर्वेक्षण, गरोदर स्त्रिया, टी.बी. रुग्ण, कुष्ठरोगी, कर्करोगी रुग्णांची विशेष तपासणी आणि विशेष काळजी घेण्यात आली.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरु केली. कोरोना कंट्रोल रुमच्या माध्यमाने पण रुग्णांची माहिती मिळवण्यात मदत झाली. लॉकडाऊनच्या काळात १२००० नागरिकांचे मानसिक समुपदेशन करण्यात आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
श्री. आदित्य ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेव्दारे कळमेश्वर येथील राधास्वामी सत्संग ब्यास येथे उभारण्यात आलेल्या पाच हजार खाटांच्या कोविड केअर सेंटरची सुध्दा प्रशंसा केली. श्री. मुंढे यांनी सांगितले की, ५०० खाटा तयार आहेत आणि जर आवश्यकता भासली तर त्याची क्षमता ५००० पर्यंत केली जाऊ शकते.

आयुक्तांनी सतरंजीपुरा, मोमिनपुरा आणि नाईक तलाव येथील घनदाट वस्तीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची चर्चा केली. त्यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांकडून सुध्दा सारी रुग्णांची माहिती घेतली जाते. जर त्यांचा स्वॅब टेस्ट पॉजिटीव्ह निघाला तर त्यांना शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येते.
श्री. तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला अद्ययावत रुग्णवाहिका (लाईफ सर्पोट एम्बुलेंस) देण्याची विनंती केली. श्री. ठाकरे यांनी या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

News Credit To NMC

स्मार्ट सिटी बैठक: महापौर बना रहे रणनीति

नागपुर: स्मार्ट सिटी के निदेशक मंडल की बैठक अगले शुक्रवार को होने वाली है। आज, मेयर संदीप जोशी और सत्तारूढ़ पार्टी के नेता संदीप जाधव ने सभी निदेशकों को नोटिस भेजे। निदेशक मंडल की बैठक में, कानूनन प्रक्रिया से खड़े रहें, अन्यथा स्मार्ट शहर में अनियमितताए आपके पता चलते के हुईं है माना जाएगा, यह चेतावनी महापौर संदीप जोशी ने दी।

स्मार्ट सिटी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स की शुक्रवार की बैठक से पहले, सत्तापक्ष ने आयुक्त के खिलाफ रणनीति बनाना शुरू कर दिया है। स्मार्ट सिटी के सीईओ के रूप में आयुक्त की नियुक्ति स्मार्ट सिटी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स की बैठक में प्रस्तावित है। महापौर ने पहले ही स्पष्ट कर दिया है कि वह आयुक्त के पद पर नियुक्ति के विरोधी नहीं हैं। पर उन्होंने आरोप लगाया है कि आयुक्त ने नियमों के विपरित निदेशक मंडल की मंजूरी के बिना सीईओ पद को हथियाने और मनमाने रूप से कई लोगों को बरखास्त करने, ठेकेदार को 20 करोड़ रुपये का भुगतान करने जैसे मामले हैं, इस पृष्ठभूमि पर, जोशी को उम्मीद है कि आगामी बोर्ड बैठक में अन्य निदेशक कानून के पक्ष मे खड़े रहेंगे।

उन्होंने कहा कि अन्य निर्देशकों को ईस बारे में नोटिस भेजे हैं। निदेशक मंडल में 14 सदस्य और छह नगरपालिका के पदाधिकारी होते हैं। इनमें मेयर संदीप जोशी, सत्तारूढ़ नेता संदीप जाधव, स्थायी समिति के अध्यक्ष पिंटू झलके, विपक्ष के नेता तानाजी वनवे, सेना पार्षद मंगला गवरे और बसपा पार्षद वैशाली नारनवरे शामिल हैं। इसके अलावा स्मार्ट सिटी के चेयरमैन प्रवीण परदेसी, कमिश्नर तुकाराम मूंढे, कलेक्टर रवींद्र ठाकरे, पुलिस आयुक्त डॉ भूषण कुमार उपाध्याय, नासुप्र स्पीकर शीतल उगले, सीए अनिरुद्ध शेनवाई, सीए जयदीप शाह भी निर्देशक हैं। पिंटू झलके और आयुक्त मुंढे के निदेशक पद के लिए मंजूरी मिलने की प्रक्रिया इस सभा में होगी।‌‌

यंदाचा गणेशोत्सव “आरोग्योत्सव” म्हणून साजरा करू

सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागपुरात रुग्णसंख्या दोन हजारापर्यंत पोहोचली आहे. अशात आपल्याला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील महिन्यात २२ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. मात्र कोरोनाच्या या संकटात दरवर्षीप्रमाणे आपल्याला हा उत्सव साजरा करायचा नाही आहे. गणेशोत्सवासंबंधी लवकरच राज्य शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र आपण सर्वांनी दक्षता घेउन यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून करूया, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी निमित्त करण्यात येणा-या उपाययोजना संदर्भात मंगळवारी (ता.७) महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीतून त्यांनी नागपूरकरांना आवाहन केले. याप्रसंगी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, प्रतोद दिव्या धुरडे, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, धंतोली झोन सभापती लता काडगाये, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, सतरंजीपूरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपरा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, २२ ऑगस्टपासून सुरू होणा-या गणेशोत्सवासंबंधी येत्या २० जुलैपर्यंत महाराष्ट्र शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र कोव्‍हिडची सद्याची स्थिती पाहता शहरवासीयांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शक्यतो सार्वजनिक गणेशोत्सव टाळावे. या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्योत्सव साजरा करण्यात यावे. आजच्या परिस्थितीशी निगडीत समाजात जनजागृती करणारे आरोग्याबाबत दक्ष करणारे कार्यक्रम घेण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणेच शहरातही कोणत्याही गणेशमूर्ती चार फूट पेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात. उत्सव साजरा करताना ५० लोकांपेक्षा जास्त जणांची उपस्थिती नसावी. सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे, सर्वांनी मास्क लावावे, हँड सॅनिटायजरचा वापर करावा. विशेष म्हणजे, श्री गणेशाची स्थापना करताना किंवा विसर्जन करतानाच्या मिरवणूका टाळावे, असेही आवाहन महापौरांनी केले आहे.
विघ्नहर्त्या श्रीगणेशाचा यंदाचा उत्सव आपल्याला कोरोनाच्या संकटाचा सामना करताना विशेष काळजी घेउनच साजरा करायचा आहे. कुठेही नागरिकांची गर्दी होणार नाही याचीही विशेष दक्षता घ्यायची आहे. गणेश मूर्तींचे विसर्जनही कृत्रिम तलावातच करायचे आहे, असेही आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

मनपाच्या ६० विद्यार्थ्यांना शहरातील खासगी कोचिंग क्लासेस देणार ‘जेईई’ आणि ‘नीट’चे धडे

कोव्हिडच्या संकटाने अनेकांचे हाल झाले आहेत. मात्र या संकटात नागरिकांच्या सेवेसाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेउन माणुसकीची प्रचिती दिली आहे. आता शिक्षण क्षेत्रातही नागपूरकर संस्थांनी सहकार्याचे मोठे पाउल उचलले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणा-या ६० विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेसह ‘जेईई’ आणि ‘नीट’चे नि:शुल्क धडे देण्यासाठी शहरातील दोन कोचिंग क्लासेस पुढे आले आहेत. महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारातून अग्रवाल स्टडी सेंटर आणि कॅलिबर्स नोव्हा या संस्थांनी या विद्यार्थ्यांच्या कोचिंगची जबाबदरी उचलली आहे.

समाजातील अनेक प्रतिभावंत विद्यार्थी योग्य संधी आणि मार्गदर्शनाअभावी मागे राहतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी अग्रवाल स्टडी सेंटर आणि कॅलिबर्स नोव्हा या कोचिंग क्लासेसद्वारे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मनपाच्या शाळांमध्ये शिकणारे अनेक प्रतिभावंत विद्यार्थी परिस्थितीअभावी पुढे जाउ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांमधील प्रतिभा हेरून त्यांना योग्य मार्गदर्शन देउन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये इतर विद्यार्थ्यांशी बरोबरीने शिक्षण घेण्याचे बळ दिले जाणार आहे.
यावर्षी दहावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांपैकी सर्वोत्तम ६० विद्यार्थ्यांची दोन्ही संस्थांद्वारे निवड केली जाणार आहे. यामधील विज्ञान शाखेतील ३० विद्यार्थ्यांना ‘जेईई’ आणि ‘नीट’चे तर ३० विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेचे धडे दिले जातील. यासाठी दोन्ही संस्था मनपाच्या प्रत्येकी १०० अशा एकूण २०० विद्यार्थ्यांची चाचणी घेणार आहेत. यामधून सर्वोत्तम ३०-३० असे एकूण ६० विद्यार्थ्यांची विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी निवड केली जाणार आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे अनेक प्रतिभावान विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या आवडीचे करिअर निवडण्याचा आणि त्यासाठी आवश्यक ते शिक्षण घेण्याचा इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच अधिकार आहे. मात्र त्यांच्या यशाच्या आड परिस्थिती येत असते. ही बाब लक्षात घेउन महापौर संदीप जोशी यांनी या विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला साकार करण्यासाठी शहरातील दोन कोचिंग संस्थांनी सहकार्य दर्शविले आहे. मनपाच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुढे आलेल्या अग्रवाल स्टडी सेंटर आणि कॅलिबर्स नोव्हा संस्थेच्या या पुढाकाराबद्दल महापौरांनी संस्थेचे पंकज अग्रवाल, जगदीश अग्रवाल, प्रिती अग्रवाल आणि राहुल राय यांचे आभार मानले आहे.

Exit mobile version