सिमेंट रस्त्याची अर्धवट कामे तात्काळ सुरू करा : महापौर संदीप जोशी

कोव्हिडमुळे जवळपास अडीच महिन्यापासून लॉकडाउन आहे. या काळात सिमेंट रोडचे बांधकामही बंद होते. पावसाळा सुरू होणार असल्याने अर्धवट अवस्थेतील सिमेंट रस्ते धोकादायक ठरू शकतात. प्रशासनाने तात्काळ सिमेंट रस्त्याची अर्धवट कामे सुरू करा तसेच काम सुरू न केलेल्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

नागपूर शहरात सध्या सुरू असलेल्या सिमेंट रोड टप्पा १, २ आणि ३ च्या बांधकामाच्या सद्यस्थितीचा शुक्रवारी (ता.२९) महापौर संदीप जोशी यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत माजी महापौर व आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकुर, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, अमीन अख्तर, अविनाश भूतकर, मनोज गणवीर, ए.एस.मानकर, धनंजय मेंडुलकर आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर संदीप जोशी यांनी सिमेंट रोडच्या टप्पा १, २ आणि ३ च्या कामाचा आढावा घेतला. यासंबंधी अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी सविस्तर माहिती सादर केली. टप्पा १ मधील बहुतांशी सिमेंट रोडची कामे पूर्ण झालेली आहेत. तर टप्पा २ मध्ये एकूण ५९ रस्त्यांचे काम प्रस्तावित असून त्यापैकी ५२ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर तीन रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही माहिती अधीक्षक अभियंत्यांनी यावेळी दिले. टप्पा २ मधील अर्धवट कामे ताबडतोब येत्या सात दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिले. जी कामे सुरू झाली नाहीत त्या कंत्राटदारांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

टप्पा ३ मध्ये ३९ रस्त्यांचे बांधकाम प्रस्तावित असून १० रस्त्यांचे दोन्ही बाजूने तर आठ रस्त्यांचे एका बाजूने पीपीसी करण्यात आले आहे. यापैकी १२ रस्त्यांचे काम अद्याप सुरूच झाले नसल्याची माहिती अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी सादर केली. यावर महापौर संदीप जोशी यांनी सिमेंट रोडच्या टप्पा १, २ आणि ३ संदर्भात प्रशासनाचे अभिमत मुख्य अभियंत्यांनी येत्या सात दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले.

News Credit To:- NMC

मनपाने नाही तर केंद्राने बनवलेयत नियम: आयुक्तांचे नगरसेवकांना स्पष्टीकरण

नागपूर:- कोवीड पॉझिटिव्ह रूग्न आढळल्यानंतर मनपाचे वतीने शहरातील काही भागांस संचारबंदी क्षेत्र घोषित केले गेलेय, मात्र दिर्घकाळ प्रतिबंधित असल्याने होत असलेल्या दैनंदिन समस्यांमुळे आधी पांढराबोडी व पश्चात पार्वतीनगर येथील जनतेने नगरसेवकांसह जोरकसपने याविरोधात प्रदर्शन केले होते परंतु आता मनपा आयुक्तांनी अशा क्षेत्रासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचेच दिशानिर्देशानुसार कार्यप्रणाली लागू असल्याचे सांगीतलेय, लोकांस अावाहन करत त्यांनी सांगितले की या संदर्भात मनपा आयुक्तांचे अखत्यारीत नियम नव्याने निर्मीती केले गेलेले नाहीत. लोकांच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारावरच कार्य केले जातेय, करिता  कुठल्याही चुकीच्या माहितीने भ्रमित न होता प्रशासनास सहकार्य करावे.

पॉझिटिव्ह रूग्न आढळताच 28 दिवसांपर्यंतचे भाग सील:

आयुक्तांनी सांगितले की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे दिशादर्शक निर्देशानुसार प्रथम रूग्नाच्या निगेटिव्ह झाल्यानंतर पुढील 28 दिवसांपर्यंत संबंधित क्षेत्रास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून ठेवावे लागत असे. मात्र आता 17 मे रोजी नवीन दिशानिर्देशानुसार पॉझिटिव रूग्न मिळाल्यापासून 28 दिवस त्या भागास प्रतिबंधित ठेवले जात आहे. शहरात याच तत्वप्रणालीस राबवीले जात आहे. सरकारकडून   नियम निर्धारित असतात जे वैद्यक व वैज्ञानिक मिमांसे नंतरच ठरतात, 28 दिवसांना 14-14 दिवसांत विभागून आधीचे 14 दिवस अॅक्टिव्ह आणि नंतरचे 14 पॅसिव्हच्या रूपात निर्धारन करत प्रतिबंधित क्षेत्रांत राबवले जातात.

28 व्या दिवशी बाधित होण्याची शक्यता:

ते म्हणाले की कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या परिसरात 95 टक्के लोकांना 2 ते 14 दिवसांत संसर्गाची शक्यता असते, तर उर्वरीत 5 टक्के लोकांपैकी 2.5 टक्के लोक 0 ते 2 दिवस आणि इतर 2.5 टक्के लोक 14 व्या दिवसानंतर 28 व्या दिवसापर्यत संसर्गाची शक्यता असते. या 2.5 टक्के शक्यतेमुळेच 28 दिवसांपर्यंत संबंधित परिसर प्रतिबंधित ठेवणे जरूरीचे आहे. वैद्यक आणि वैज्ञानिक कारणांमुळेच केंद्र सरकारतर्फे दिशानिर्देश तयार केलेले आहेत, ज्यांचा विपरीत अर्थ लावने योग्य नाही. शहरास लवकरच कोरोना-मुक्त व कायमस्वरुपी ग्रीन झोनमध्ये आणण्यास प्रशासनाची प्रयत्न चालू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

’तो’ खड्डा पूर्वीपासूनच

घराघरातून संकलीत केलेल्या कच-यामध्ये माती मिश्रीत करून जास्तीचे वजन वाढवून मनपाकडून पैसे उकळण्यात येत आहे व त्यासाठी बीव्‍हीजी या कंपनीद्वारे पार्कींग स्थळाजवळ खड्डा करण्यात आला असल्याच्या आरोपावर रविवारी (ता.२४) घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार यांनी घटनास्थळी पाहणी केली.

पाहणीनंतर या संदर्भातील सत्यता पडताळण्याकरिता सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये बीव्‍हीजी कंपनीचे काम सुरू होण्यापूर्वीचे त्या परिसराचे फुटेज शोधण्यात आले. यामध्ये बीव्‍हीजी कंपनीच्या पार्कींग स्थळालगत असलेला खड्डा कंपनीला जागा उपलब्ध करून देण्याच्या आधीपासूनच असल्याचे निदर्शनास आले आहे.

कचरा संकलन करणा-या बीव्‍हीजी कंपनीला मनपातर्फे भांडेवाडी येथे पार्कींगसाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेजवळ खड्डा खणून त्यातील माती कच-यात मिश्रीत करून वजन वाढवून महानगरपालिकेकडून पैसे उकळले जात असल्याची तक्रार मनपाकडे प्राप्त झाली. बीव्‍हीजी कंपनीद्वारे शहरातील गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर आणि मंगळवारी झोनमधून कचरा संकलीत करण्यात येतो.

लॉकडाउनमुळे कचरा कमी निघत असल्याने कंपनीद्वारे माती मिश्रीत करून कच-याचे वजन वाढविण्यात येत असल्याचाही आरोप तक्रारीद्वारे करण्यात आला. यासंबंधी घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाउन चौकशी केली.

चौकशीमध्ये निदर्शनास आले की, नोव्हेंबर २०१९मध्ये बीव्‍हीजी कंपनीला भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे पार्कींगसाठी जागा देण्यात आली. यापूर्वी २८ ऑगस्ट २०१९मध्ये संपूर्ण परिसराचे ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यात आले. सर्व्‍हेमध्ये घेण्यात आलेल्या फुटेजमध्ये तक्रारदाराने नमूद केलेल्या खड्ड्याबाबतचे सुद्धा फोटो तपासण्यात आले असता त्यामध्ये तो खड्डा बीव्‍हीजी कंपनीचे काम सुरू होण्यापूर्वीचाच असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये सत्यता असल्याचे दिसून येत नाही.

तरीही भविष्यात अशा तक्रारी प्राप्त होउ नये याची खबरदारी घेण्याकरिता व तक्रारकर्त्यांनी केलेल्या तक्रारीचे पूर्णत: समाधान करण्याकरिता मनपाद्वारे कच-याच्या वजन काट्यावर येणा-या वाहनांची तपासणी करण्यासाठी उपद्रव शोध पथकाचे दोन कर्मचारी तैनात करण्यात आले.

हे कर्मचारी आलेल्या गाडीचे वजन तपासतील त्यामध्ये काही शंका आल्यास गाडीतील कचरा तपासून बघतील व त्यानंतर ती गाडी एका विशिष्ठ ठिकाणी रिकामी करण्यास सूचना देतील. यामध्ये जर माती आढळून आल्यास संबंधित गाडीचे वजन रद्द केले जाईल व कंत्राटदारावर करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिली.

News Credit To:- NMC

 

अवैध टिल्लू पंपाविरुध्द कडक कारवाई करा : झलके

नागरिकांनी अवैधरित्या लावलेल्या टिल्लू पंपाविरुध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश मनपाच्या स्थायी समिती सभापती तथा जलप्रदाय समितीचे सभापती श्री.विजय (पिंटू) झलके यांनी दिले आहेत. गुरुवारी (ता.२८) त्यांनी पाणी समस्येबाबत नेहरुनगर झोन, हनुमाननगर झोन आणि धंतोली झोन मध्ये बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, जलप्रदाय समितीचे उपसभापती भगवान मेंढे आणि झोनचे नगरसेवक/नगरसेविका उपस्थित होते.

पाणी समस्येबाबत आढावा घेतल्यानंतर श्री.झलके यांनी नेहरुनगर झोन मध्ये प्रभाग २६, २७, २८ आणि ३० मध्ये पाणी पुरवठा वाढविण्याचे निर्देश दिले. हनुमाननगर झोन मधील प्रभाग ३४ मध्ये सुरु असलेल्या अमृत योजनेचे काम लवकरात-लवकर पूर्ण करणे आणि नागरिकांना नळाचे कनेक्शन देण्याचे निर्देश दिले. तसेच रामबाग आणि रेशीमबाग येथील पाणी पुरवठयाबाबत तक्रारी तात्काळ सोडविण्याचे निर्देश दिले.

आढावा बैठकीत धंतोली झोन सभापती लता काडगाये, डॉ.रविन्द्र भोयर, हर्षला साबळे, ‍विजय चुटेले, प्रमोद चिखले, मनोज गावंडे, भारती बुंदे, नेहरुनगर झोन मध्ये प्रतोद दिव्या धुरडे, समिता चकोले, मंगला गवरे, स्नेहल बिहारे, रेखा साकोरे, हनुमाननगर झोनमध्ये हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, बांधकाम समिती अध्यक्ष अभय गोटेकर, राजेन्द्र सोनकुसरे, मंगला खेकरे, कल्पना कुंभलकर, नागेश मानकर, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्लू चे संजय रॉय, के.एम.पी.सिंग, राजेश कालरा आणि डेलीगेट उपस्थित होते.

News Credit To:- NMC

नागपुरात येणा-या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक

विमान, रेल्वे, बस, खासगी वाहन अथवा अन्य कोणत्याही माध्यमातून नागपूर शहरात येणा-या प्रवाशांना शासनाच्या दिशानिर्देशानुसार १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. गृह विलगीकरणाचा शिक्का मारलेली कोणतिही व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्याला मनपातर्फे ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

लॉकडाउनमध्ये शहराबाहेर अडकलेले किंवा कामानिमित्त शहरात येउ पाहणारे लोक आता नागपुरात परतत आहेत. विविध माध्यमातून हे प्रवासी शहरात दाखल होत आहेत. मात्र शहरात आल्यानंतर त्यांना ‘होम क्वारंटाईन’ करणार की ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करणार हा अनेकांमध्ये संभ्रम आहे.

याबाबत महाराष्ट्र शासनाने दिशानिर्देश जारी केले असून त्यानुसार शहरात येणा-या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारण्यात येणार असून त्याला १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. यासाठी मनपातर्फे संबंधित व्यक्तीच्या घराबाहेर पोस्टर लावले जाईल.

त्यामध्ये संबंधित व्यक्तीचे नाव नमूद करून ‘ही व्यक्ती ‘होम क्वारंटाईन’ असून बाहेर कुठेही फिरताना आढळल्यास मनपाच्या नियंत्रण कक्षात ०७१२-२५६७०२१ आणि ०७१२-२५५१८६६ या क्रमांकावर नागरिकांनी माहिती दयावी, तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित व्यक्तीला मनपाच्या विलगीकरण कक्षामध्ये नेण्यात येईल, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

गृह विलगीकरणामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वत:सह आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे त्यांनी घराबाहेर निघू नये. त्यांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास असा कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास त्यांनी तात्काळ मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा आपल्या जवळच्या खाजगी किंवा शासकीय दवाखान्यात जाउन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.

शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्येही नागरिकांना उपचार घेता येणार आहे. खाजगी दवाखान्यांमध्ये ताप, खोकला, निमोनिया किंवा तत्सम लक्षणे असलेले रुग्ण आल्यास संबंधित डॉक्टरांनी त्या रुग्णाचे ‘स्वॅब’ घ्यावे व त्याचा अहवाल येईपर्यंत रुग्णाला आयसोलेशनमध्येच ठेवावे. ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याची माहिती तात्काळ मनपाला देण्यात यावी. संबंधित रुग्णावर त्वरीत उपचार केले जाईल, असेही आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

News Credit To:- NMC

विमान प्रवाशांसाठी राज्य शासनाचे दिशानिर्देश जाहीर

महाराष्ट्र सरकारने सोमवारी (ता.२५) संध्याकाळी राज्यातल्या सर्व विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिशानिर्देश जाहीर केले आहेत. या दिशानिर्देशामध्ये विमानतळ प्रशासन आणि प्रवाशांसाठी महत्वाच्या सूचना देण्यात आल्यात आहेत. त्यानुसार राज्यातील विमानतळावर येणा-या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येईल आणि प्रवाशांनी १४ दिवस अनिवार्यपणे गृह विलगीकरणात (होम आयसोलेशनमध्ये) राहणे बंधनकारक आहे. 

या कालावधीमध्ये प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. राज्य शासनाच्या या दिशानिर्देशाची नागपुरातही अंमलबजावणी करण्यात येत असून मनपाच्या आरोग्य पथकामार्फत येणा-या व जाणा-या प्रत्येक प्रवाशाची ‘थर्मल स्क्रिनींग केली जात आहे.

राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक दिशानिर्देशानुसार, विमान प्रवास करणा-या प्रत्येक प्रवाशाला ‘आरोग्य सेतू’ ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे. प्रवास सुरु होण्यापूर्वी विमानतळ व्यवस्थापनाद्वारे प्रत्येक प्रवाशाची थर्मल चाचणी केली जात असून कोणतेही लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच फक्त प्रवासासाठी विमानात प्रवेश दिले जाते. सर्व प्रवाशांसह एअरलाईन कर्मचारी, क्रू आदी सर्वांनी मास्कचा वापर करणे तसेच प्रस्थान आणि आगमनानंतरही सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

आगमनानंतर विमानतळावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी केली जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरही येणा-या व जाणा-या सर्व प्रवाशांची थर्मल चाचणी केली जात असून यासाठी मनपाचे आरोग्य पथक तैनात आहे. थर्मल तपासणीमध्ये लक्षणे आढळल्यास संबंधित प्रवाशाला नजिकच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात नेउन यासंदर्भात केंद्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

विमानतळावर येताना किंवा विमानतळावरून निवासस्थानी जाताना प्रवाशांना स्वत:च्या वाहनातून निवासस्थान ते विमानतळ किंवा विमानतळ ते निवासस्थान असा प्रवास करावा लागेल. विशेष म्हणजे, प्रतिबंधित क्षेत्र ते विमानतळ किंवा विमानतळ ते प्रतिबंधित क्षेत्र अशा प्रवासांना परवानगी नाही.

प्रत्येक प्रवाशाने विमानतळावर स्वयं घोषणापत्र (सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म) भरुन घेणे बंधनकारक आहे. स्वयं घोषणापत्रात (सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म) संबंधित प्रवाशी प्रतिबंधित क्षेत्रातील नाही, तो कोणत्याही प्रकारच्या विलगीकरणात नाही, त्याला कोणतिही लक्षणे नाहीत, कोरोनाची चाचणी केली असल्यास त्याचा अहवाल निगेटिव्हच आहे ही सर्व माहिती सादर करणे अनिवार्य आहे.

वरील नियमाचे पालन करणे बंधनकारक राहील. विमानप्रवासांनंतर प्रत्येक प्रवासी हा स्वताचे घरातच १४ दिवसाचे विलगीकराणत राहील. याबाबतीत कुठलीही हयगय संबंधीतां कडून होणार नाही यांची दक्षता संबंधीताने घ्यावयाची आहे. व 14 विलगीकरणाचे अत्यंत काटेकोरपणे व न चुकता पालन करावयाचे आहे.

मनपा ने संपत्ती व पाणी करात सवलत द्यावी मनसे चे अति. आयुक्त जोशी यांना निवेदन

नागपूर:- कोविड -१९ संक्रमणास आळा म्हणून  उपाययोजनांत संपूर्ण देशात २४ मार्चपासून तर शहरात त्या ही आधीपासून लॉकडाउन घोषित झाले. यादरम्यान रोजंदारी करणारे श्रमिक, इतर व्यावसाईक आणि नोकरदार नागरिकांचे अर्थाजनावर यांचा गंभीर परिणाम झाला.

सलग वाढत असलेल्या लॉकडाऊन मुळे लोकांची आर्थिक स्थिती काय असेल, याविषयक आकलन करणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मालमत्ता आणि पाणी करांत पुढील 2 महिन्यांपर्यंत सवलत देण्याची मागणी मनसेच्या वतीने केली गेली. या संदर्भात अति. आयुक्त राम जोशी यांना निवेदन सोपविले गेले. मनसे प्रांत महासचिव हेमंत गडकरी यांचे मार्गदर्शनात विशाल बडगे, घनश्याम निखाडे, शशांक गिरडे, आशिष पांढरे, सुमित वानखेडे, अन्ना गजभिये आणि अरविंद सावरकर यावेळी उपस्थित होते.

जप्ती नोटिस देऊ नये

चर्चेवेळी शिस्तमंडळाने सांगितले की कोणत्याही मालमत्ताधारकास जप्ती नोटिस देऊ नये. त्यासह मालमत्ता करभरनी न केल्यास दरमहा 2 टक्के बसणारा दंड आणि पाणी कराची विलंब राशीही लावू नये. कोरोनाच्या या संकटकाळात मनपातर्फे मालमत्ताधारकांस याप्रकारे दिलासा दिल्या जाऊ शकतो. ते म्हणाले की, मनपाकडे जीएसटीचे माध्यमातून, आवकाचा स्त्रोत आहे, ज्यातून पूर्ण करमाफी तर्कसंगत नाही. म्हणून किमान २-३ महिने करसंकलनास सक्ती करू नये, या संदर्भात महापौर, स्थायी समिति सभापति आणि आयुक्तांनी सहानुभूतीने विचार करण्याची मागणीही त्यांनी केली.

मिळकतीचे स्रोत निर्मितीस प्राथमिकता

त्यांनी सांगितले की मनसे वतीने नेहमीच वेगवेगळ्या निवेदनांद्वारे मिळकतीचे ईतर स्रोत निर्मितीसाठीची विनंती केली गेलीय. कोरोना प्रभावाने आंतरराष्ट्रीय पर्यटनावर परिणाम  संभवतो, अशात स्थानिक स्तरावर पर्यटनाचा प्रचार प्रसारात वाढ करणे शक्य आहे. या दृष्टिकोनातून आता मनपाचे बाजूने योग्य पाऊले उचलली जावी, ज्यायोगे शहरातही पर्यटन स्थळांचा विकास करता येईल, मनपासाठी पर्यटन हेदेखील मिळकतीचा एक प्रमुख मार्ग बनण्याची अपेक्षा त्यांनी केली. चर्चेदरम्यान पर्यटन हेतुने नागपूर दर्शन बस पुढिल फक्त काही दिवसांतच सुरू करण्याचे आश्वासन जोशी यांनी दिले.

NMC turns 5 hospitals, bungalow into Covid-19 centres

Nagpur:- The Nagpur Municipal Corporation (NMC) is all set to treat productive patients, after achieving fair progress in producing Covid-19. Five shambles hospitals and health centers are being converted into Dedicated COVID Health Centers (DCHC) with a capacity of 450-465 beds, including 50 in the ICU.

The Surana Maternity Home in Sadar, which was used for more than a decade as the official bungalow, is set to be used again for patients. Going through central government communication, the state government had projected 11,114 cases in the city between May 15-31 and directed the administration to be ready with as many beds as possible.

The administration will also plan COVID Care Centers (CCC) for asymptomatic positive corona patients, DCHCs for moderately serious patients, and a Dedicated COVID Hospital (DCH) for severe patients. Municipal commissioner Tukaram Mundhe, chief medical officer Dr. Yogendra Savai, and additional chief medical officer Dr. Praveen Gantawar decided to establish NMC’s own DCHCs to reduce pressure on state-run hospitals and rely entirely on private ones.

Surana Maternity Home had become vacant after the retirement of the additional Municipal Commissioner. Work is nearing completion to develop it as a 35-bed DCHC. The Unani Hospital and Physiotherapy Center of the NMC is located in the adjacent building and serving the same purpose. Another important task assumed by the NMC is to transform a health center at KT Nagar into a 130-bedded DCHC. The ICU facility is being built here too. Residents have turned against the move.

The three hospitals in NMC Indira Gandhi Rugnalaya (IGR) at LAD Square, Panchpaoli Maternity Home and Rambagh Isolation Hospital were in shambles. Work is nearing completion to convert IGR into a 130 bedded-DCHC including ICU. The hospital is set to look a little new.

Similarly, the Panchpaoli Maternity Home is set to be a 110-bedded DCHC and will probably be ready soon. In a short time, the Isolation Hospital will be converted to a 60-bedded DCHC. The ICU facility is being developed in this area too.

In case of a sudden increase in cases, the five hospitals, situated in various parts of town, will come handy.”The Urban primary health centers run by the civic body are in good condition. Recently they were developed under the scheme of the central government. The hospitals were in poor condition and lacked adequate facilities.

 

 

 

शहरातील रोडची अर्धवट कामे तात्काळ सुरू करा

शहरातील लॉकडाऊनचे नियम हळुहळू शिथिल होत असल्याने शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळही वाढत आहे. लॉकडाऊनमुळे शहरात अनेक ठिकाणच्या रस्त्यांची कामे अर्धवट राहिली आ हेत. लवकरच पावसाळा सुरू होण्याचे संकेतही हवामान विभागातर्फे देण्यात आले आहेत. अशा स्थितीत अर्धवट बांधकाम झालेले रस्ते धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य जपून अर्धवट स्थितीतील रस्त्यांची सर्व कामे तात्काळ सुरू करा, असे निर्देश कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी प्रशासनाला दिले.

मंगळवारी (ता.१९) कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांच्यासह स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा आणि विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी संयुक्तरित्या शहरातील विविध ठिकाणच्या अपूर्णावस्थेतील रस्त्यांची पाहणी केली.

शहरातील अनेक ठिकाणच्या सिमेंट व डामरी रस्त्याच्या कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली आहे. मात्र ती कामेही बंदच आहेत. याशिवाय जी कामे सुरू होती ती सुद्धा लॉकडाऊनमुळे बंदच आहेत. मागील दोन महिने नागरिक घरात होते. त्यामुळे या अपूर्णावस्थेतील मार्गांमुळे काही बाधा निर्माण झाली नाही. मात्र आता अनेक बाबींना परवानगी मिळाल्याने लोक घराबाहेर पडत आहेत. अशा स्थितीत ही अपूर्ण कामे सुरू होणे अत्यावश्यक आहे. दत्तात्रय नगर येथील सिमेंट रोडचे अपूर्ण काम तसेच जरीपटका येथील दुर्गे पिठ गिरणी समोरील रस्त्याचेही काम अर्धवट आहे.

शहरातील अशा अनेक ठिकाणी हिच स्थिती आहे. पावसाळा सुरू झाल्यास हे अपूर्ण बांधकाम झालेले रस्ते नागरिकांच्या जीवासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाद्वारे या अपूर्ण रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करून ती लवकरात लवकर पूर्ण करावीत, असेही निर्देश कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी दिले.

शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्व भागातील अपूर्णावस्थेतील रस्त्यांची यादी त्वरीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी लोककर्म विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांना दिले.

नागपूर शहरात २२ मे पर्यंत जुनेच आदेश लागू

महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउनमध्ये शिथिलता संबंधिचे नवीन आदेश मंगळवारी (ता.१९) निर्गमीत करण्यात आले आहेत. हे आदेश राज्यात २२ मे पासून अंमलात येणार आहेत. त्यामुळे सद्यातरी नागपूर रेड झोनमध्ये आहे. मागील चार ते पाच दिवसात शहरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात अजूनही अनेक ‘हॉटस्पॉट’ आहेत. 

राज्य शासनाने १९ मे रोजी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये रेड झोनमधून नागपूरचे नाव वगळले असले तरी शहरातील स्थिती पाहता अजुनही कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करणे व उचित दक्षता घेणे आवश्यक आहे. सद्यातरी नागपूर शहरामध्ये लागू असलेल्या मनपाच्या १७ मे रोजीच्या आदेशात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. त्यामुळे २२ मे पर्यंत नागपूर शहरात जुनेच आदेश लागू राहणार आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

यासंबंधी माहिती देताना त्यांनी सांगितले की, लॉकडाउन संबंधी महानगरपालिकेचे १७ मे आणि त्यापूर्वी काढलेले आदेश सद्या अस्तित्वात आहेत. नवीन आदेश २२ मे रोजी शहरातील परिस्थिती पाहून निर्गमीत करण्यात येईल. नागपूर शहराला कायमस्वरूपी रेड झोनमधून बाहेर काढण्यासाठी सद्या आहे त्या आदेशाचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे.

१७ मे रोजी देण्यात आलेलेच आदेश लागू असून कुणीही या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, प्रशासनीक कायदा आणि भारतीय दंड विधान कायद्यानुसार कारवाई केली जाईल. त्यामुळे परवानगी दिलेल्या बाबींव्यतिरिक्त कुणीही घराबाहेर पडू नये.

यापूर्वी १७ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेने घरपोच मद्यविक्री, नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील, तेथे बांधकाम सुरू करता येईल. आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल, संगणक, मोबाईल, होम अम्प्लायन्सेस दुरूस्ती, (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे सुरू राहतील. ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण), खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत, सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत सुरू करता येतील.

याव्यतिरिक्त, मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू करता येतील. प्रतिबंधित क्षेत्रात हा आदेश लागू राहणार नाही. केवळ तेथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू असतील. प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.

News Credit To:- NMC

Exit mobile version