विलगीकरणातील लोकांची मनपा घेतेय आस्थेने काळजी

कोविड-१९चा संसर्ग रोखण्यासाठी व वेळेत उपचार मिळावे यासाठी मनपातर्फे ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील कोरोनाग्रस्तांचा शोध घेण्यात येतो व त्यांना मनपाच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाते. शहरामध्ये आमदार निवास, वनामती, रवीभवन, सिम्बॉयसिस, व्‍हीएनआयटी वसतीगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर, प्रोझोन चिचभवन आदी ठिकाणी सुमारे २५०० लोकांना विलगीकरण करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने विलगीकरणातील या नागरिकांच्या सुविधेसाठी मनपातर्फे सेवाकार्य सुरू आहे. या सर्व नागरिकांच्या आरोग्यासह त्यांची भोजन, निवास व्यवस्था व सुरक्षा या सर्वांबाबत मनपाद्वारे आस्थेने काळजी घेण्यात येत आहे.

शहरातील विविध विलगीकरण कक्षांपैकी सिम्बॉयसिस, व्‍हीएनआयटी वसतीगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर या तीन ठिकाणी सुमारे १५०० जणांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी विलगीकरण करून ठेवलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह त्यांना दोन वेळचे भाजी, पोळी, वरण, भात असे जेवण, चहा, नाश्ता ही सर्व व्यवस्था मनपातर्फे करण्यात येत आहे.
वाठोडा येथील सिम्बॉयसिसमध्ये ४५० जणांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मनपाची वैद्यकीय चमू आणि इतर टिम सेवा देत आहेत. ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये बहुतांशी मुस्लीम बांधव असून त्यांच्यासाठी रमजानच्या पर्वावर दररोज शहरी आणि इफ्तारीचे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आयोजन करण्यात येत आहे. या ठिकाणी मनपातर्फे भोजन व्यवस्था करण्यात येत आहे शिवाय नागरिकांसाठी बेड, चादर, उशी, पांघरून ही सर्व व्यवस्थाही मनपाने करून दिली आहे.
पाचपावली क्षेत्रामध्ये पोलिस क्वॉर्टरमध्ये सुमारे ५५० जणांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. पोलिस क्वॉर्टरमध्ये एकूण ७ विंग असून यातील प्रत्येक विंगमध्ये २७ फ्लॅट आहेत. यापैकी एक विंग वैद्यकीय चमूसाठी निर्धारित करण्यात आली आहे. या विंगमध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टॉफ, परिचारीका यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. इतर विंगमध्ये निवासाला असणा-या नागरिकांना मनपातर्फे टॉवेल, बकेट, ग्लास, टूथब्रश, टूथपेस्ट, सॅनिटायजर, पाण्याची कॅन, लहान मुलांसाठी दुध या सर्व गोष्टींचा पुरवठा करण्यात येत आहे.
तर व्‍हीएनआयटीच्या चार वसतीगृहामध्ये सुमारे ६०० संशयीतांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणीही सर्व रहिवाशांना दोन वेळचे जेवण, नाश्ता, चहा तसेच आवश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात येत आहे. सर्व विलगीकरण कक्षातील नागरिकांवर वैद्यकीय पथकाद्वारे उपचार करण्यात येत असून त्यांचे कोरोना ‘स्वॅब’ घेण्यात येते. ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार केले जाते. तर अहवाल निगेटिव्ह आल्यास पुन्हा १४व्या दिवशी ‘स्वॅब’ घेण्यात येतो. तो अहवाल सुद्धा निगेटिव्ह आल्यास रुग्णाला सुट्टी देण्यात येते.
या कार्यासाठी मनपाच्या अधिका-यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल अधिका-यांचे पथक अहोरात्र कार्य करीत असून विलगीकरणातील नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होउ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

Source:- news.nmcnagpur.org

 BACK TO HOME PAGE

 

मृताचा कोरोना अहवाल येईपर्यंत संपर्क टाळा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अधिक जास्त सतर्कता आणि सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. नागपूरमध्ये नुकतेच एका युवकाचा मृत्यू झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (मेडिकल) आकस्मीक विभागात भरती करण्यात आले होते. त्याचा कोरोना ‘स्वॅब’ अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, त्याच्या मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल आल्याने त्या युवकाच्या संपर्कात आलेले किंवा घरी जमलेल्या नागरिकांना कोरोनाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा कोरोना अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी. कुणीही मृत व्यक्तीच्या घरी किंवा अन्य ठिकाणी संपर्क साधू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

शहरातील पार्वतीनगर, रामेश्वरी परिसरातील एका युवकाचा दि.०५/०५/२०२० मंगळवारी मृत्यू झाला. बुधवारी (ता.६) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (मेडिकल) मधून या मृत तरुणाचा कोरोना ‘स्वॅब’चा अहवाल प्राप्त झाला. त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे युवकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर कोविड-१९ संदर्भात मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. युवकाच्या मृत्यूनंतर घरी येणा-या नागरिकांनाही कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाग्रस्त मृतदेहापासून होणारा संसर्ग टाळणे अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यासाठी कोणत्याही कारणाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल येईपर्यंत मृताशी संबंधित कोणत्याही प्रकारचा संपर्क टाळावा. अहवाल निगेटिव्ह आल्यास मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत नियमांचे पालन करण्यात यावे. यासाठी अंत्यविधीला कमीत-कमी लोक उपस्थित राहणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे आदी नियमांचे पालन केले जाणे आवश्यक आहे, असेही आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
मृताचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या विल्हेवाटीसंदर्भात मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात येईल. यासंबंधी यापूर्वीच मनपा आयुक्तांनी कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या विल्हेवाटीसंदर्भात मार्गदर्शक तत्वांबाबत आदेश जारी केले आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार मृतदेहाला कुणीही स्पर्श करू नये. मृतदेहावर अंत्यविधी करताना पाच पेक्षा अधिक लोकांनी उपस्थित राहू नये. वरील दोन्ही नियमांचे काटेकोर पालन व्हावे याकरिता संबंधित रुग्णालय प्रशासनाने मृत्यूची माहिती आधी संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी. अंत्यविधी करण्यात येणारे घाट किंवा स्मशानभूमीतील कर्मचा-यांनी मास्क, ग्लोव्ह आणि अन्य सुरक्षा साहित्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वयंसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. मृतदेहाच्या विल्हेवाटी संदर्भात वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होणे गरजेचे आहे. याबाबत काटेकोर कार्यवाही करिता आयुक्तांतर्फे सर्व झोनचे सहाययक आयुक्त, मनपा आरोग्य विभाग तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत.

Source:- news.nmcnagpur.org

स्वगृही परतणा-यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दहाही झोनमध्ये व्यवस्था

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे शहरात अडकलेल्या लोकांना स्वगृही परतण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शहरात अडकलेले मजूर, विद्यार्थी व अन्य प्रवाशांना स्वगृही परत जाण्यासाठी त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. वैद्यकीय प्रमाणपत्राविना कुणालाही शहराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे परराज्यातील किंवा नागपूर बाहेरील लोकांना वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे दहाही झोनमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मनपातर्फे टोकन प्रणाली सुरू करण्यात आली असून टोकन घेतल्यानंतर दुस-या दिवशी संबंधितांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येत आहे. याशिवाय व्यवस्था करण्यात आलेल्या मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये पोलिस बंदोबस्तही आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची मनपाच्या वैद्यकीय चमूमार्फत आरोग्य तपासणी केली जाते. थर्मल गनच्या माध्यमातून व्यक्तीचे तापमान मोजले जाते. स्वगृही परतल्यानंतर संबंधित व्यक्तीला १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ राहणे बंधनकारक आहे. शहराबाहेर जाणा-या व शहरात येणा-या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील मनपाद्वारे घेण्यात येत आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य उपसंचा अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे यांनी दिली.

या ठिकाणाहून घेता येईल वैद्यकीय प्रमाणपत्र
अ.क्र—- झोन———-आरोग्य क्रेंद्र १——लक्ष्मीनगर—–सोमलवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कांजी हाउस
————————जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमान मंदिर, जयताळा मनपा शाळेजवळ

२——धरमपेठ——–के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उत्कर्ष नगर, रिहॅबिलीटी सेंटर जवळ गिट्टीखदान रोड
————————-फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन फुटाळा गल्ली नं. ३, मनपा शाळेसमोर अमरावती रोड

३——हनुमाननगर—-हुडकेश्वर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवाजी कॉलनी नासरे सभागृहाच्या मागे हुडकेश्वर रोड

४——धंतोली———बाबुळखेडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मानवता शाळेजवळ, बाबुळखेडा
———————–आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा पोलिस स्टेशनच्या मागे इमामवाडा

५—–नेहरूनगर——नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दर्शन कॉलनी गजानन महाराज मंदिराजवळ के.डी.के.कॉलेज रोड

६—–गांधीबाग——–महाल डायग्नोस्टिक सेंटर, नर्सिंग टॉकिज जवळ महाल पोस्ट ऑफिस

७—–सतरंजीपुरा—–मेहंदीबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंग्ल सेलिब्रेशन रोड देवतारे चौक, राष्ट्रसंत तुकडोजी हॉल जवळ, मेहंदीबाग रोड

८—–लकडगंज——-पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मनपा शाळेजवळ पारडी बस स्थानकाच्या मागे

९——आसीनगर—–पाचपावली मॅटर्निटी होम, बाळाभाउपेठ, कमाल चौक
————————कपीलनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कपीलनगर हिंदी हायस्कूल कपील नगर १०——मंगळवारी—–इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेझनबाग मैदान

केवल 6 क्षेत्रों में राहत ,होजयरी और स्टेशनरी दुकानों को अनुमति

नागपुर:- राज्य सरकार ने स्थानीय प्रशासन को हॉटस्पॉट को छोड़कर सभी क्षेत्रों में लॉक डाउन में रियायतें प्रदान करने का अधिकार दिया है। उम्मीद थी कि नगर आयुक्त तुकाराम मुंडे नागपुर के लोगों को एक बड़ी राहत देंगे। उन्होंने केवल  होजरी, स्टेशनरी की दुकानों  को अनुमति दी है। अनुमति, निश्चित रूप से नौ प्रतिबंधित क्षेत्रों और गांधीबाग, सतरंजीपुरा, अशीनगर और मंगलवारी क्षेत्रों को छोड़कर शेष शहर तक विस्तारित की गई है।

तालाबंदी का तीसरा चरण सोमवार से शुरू हुआ। इस बीच, राज्य सरकार ने स्थानीय प्रशासन को हॉटस्पॉट को छोड़कर सभी क्षेत्रों में तालाबंदी रियायतें देने की छूट दी है। इसका उपयोग करते हुए, नगर आयुक्त तुकाराम मुंडे ने सोमवार को प्रतिबंधित क्षेत्र और चार नगरपालिका क्षेत्रों को छोड़कर बाकी शहर में दुकानें शुरू करने का फैसला किया। इस बीच, आयुक्त ने कल स्पष्ट किया था कि तालाबंदी में ढील नहीं दी जाएगी।

सरकार द्वारा घोषित नए दिशानिर्देशों के अनुसार, नागपुर शहर में केवल होजरी और स्टेशनरी की दुकानों, निर्माण कार्य और आवासीय परिसर और आवासीय क्षेत्र में 10 प्रतिशत कर्मचारियों के साथ एक सरकारी कार्यालय स्थापित करने का निर्णय लिया गया है। इसके अलावा, उल्लेखित क्षेत्रों में 10% उपस्थिति के साथ सरकारी कार्यालयों को शुरू करने की अनुमति भी दी गई है। इसके लिए सभी संबंधितों को सामाजिक दूरी का पालन करना, मास्क पहनना और सैनिटाइजर का उपयोग करना अनिवार्य है।

केवल छह क्षेत्रों में आराम:-

कमिश्नर द्वारा जारी किए गए फैसले से शहर के छह क्षेत्रों लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली, नेहरू नगर, लक्ष्मणगंज में आवासीय क्षेत्रों, आवासीय परिसरों और आवासीय क्षेत्रों में केवल होजरी और स्टेशनरी की दुकानों की अनुमति दी गई है।

दुकाने, बांधकाम आणि शासकीय कार्यालयांना अटींच्या अधीन राहून परवानगी

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शासनाने घोषित नवीन मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (ता.४) घेतला आहे. 

शहरातील नऊ प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) व गांधीबाग, सतरंजीपुरा, आसीनगर आणि मंगळवारी हे चार प्रशासकीय मनपा झोन वगळता लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, लकडगंज या सर्व सहाही मनपा झोनसाठी हे आदेश लागू राहणार आहेत. मात्र संपूर्ण शहरातील खाजगी कार्यालयासह दारुची दुकाने, वाईन शॉप, पानठेले, शॉपींग मॉल, सलून, स्पा आदी सर्व बंदच राहणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार नागपूर शहरामध्येही १५ मे पर्यंत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार शहरात निर्माण होणारा कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी तिसरे लॉकडाऊन लागू करण्यात आले असून यामध्ये नागरिकांना केवळ काही गोष्टींसाठीच शिथिलता देण्यात आली आहे. मात्र त्यासाठीही त्यांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

नागपूर शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घेण्यात येत आहेत, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे. मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या निर्णयामध्ये तीन महत्वाच्या गोष्टींसाठी त्यांनी शिथिलता दिली आहे. शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, लकडगंज या सहा झोनमध्ये रहिवासी क्षेत्रातील, निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच नमूद क्षेत्रातील इन सीटू बांधकामासाठी परवानगी देण्यात आली आहे.

यासाठी बांधकामस्थळी कामगारांच्या निवासाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. याशिवाय नमूद क्षेत्रातील शासकीय कार्यालये १० टक्के उपस्थितीसह सुरू करण्याबाबत सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सर्व संबंधितांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे शहरातील कोणत्याही भागात दारूची दुकाने किंवा वाईन शॉप, पानठेले, शॉपिंग मॉल सुरू करण्याबाबत कोणतिही परवानगी नसल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.

शहरात कोविडची स्थिती लक्षात घेता संबंधित शिथिलता देण्याबाबत टप्प्याटप्प्याने पुढील आदेश जारी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनुज्ञेय केलेल्या शिथिलतेबाबत नव्याने कोणतिही परवानगी घेण्याची गरज नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या एस.ओ.पी. चे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बुध्द पौर्णिमा दिनानिमित्त कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत

‘बुध्द पौर्णिमा’ दिनानिमित्त गुरुवार दि. ०७ मे, २०२० ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दि.०२/०९/२०१८ रोजीच्या स्थगीत साधारण सभेतील मंजूर ठराव क्रं.२४० दि. ०२/०७/२०१८ अन्वये मा. आयुक्त यांचे दि. ०३/०८/२०१८ चे मंजूरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. 

त्यानुसार गुरुवार दि. ०७ मे, २०२० ला ‘ बुध्द पौर्णिमा’ दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल.

News Credit To:- NMC

शहरातील ‘हॉटस्पॉट’ कोरोनामुक्त करण्यासाठी मनपा आयुक्तांचा ‘मास्टर प्लॉन’

नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील रुग्णांची संख्या वाढीसाठी काही ‘हॉटस्पॉट’ कारणीभूत ठरले आहेत. शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ‘मास्टर प्लॉन’ तयार करण्यात आला आहे. या ‘मास्टर प्लॉन’ नुसार ‘हॉटस्पॉट’मधील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात येणा-या लोकांचा शोध घेउन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे व सर्वांचे कोरोना ‘स्वॅब’ घेतले जात आहे. 

मनपा आयुक्तांच्या या ‘मास्टर प्लॉन’ नुसार कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या सतरंजीपुरा भागात कार्य सुरू झाले आहे. आतापर्यंत सतरंजीपुरा भागातील १७०० पेक्षा जास्त जणांना ‘क्वारंटाईन’ करून मनपाच्या ‘कोविड केअर सेंटर’ मध्ये आणण्यात आले आहे.

आजघडीला शहरात कोरोनाचे १३४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी बहुतांशी रुग्ण हे सतरंजीपुरा भागातीलच आहेत. त्यामुळे या भागातील कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न मनपातर्फे केले जात आहेत. सतरंजीपुरा परिसरात एका कोरोनाबाधित व्यक्तीमुळे कोरोनाच्या संसर्गाची मोठी साखळी निर्माण झाली.

ही साखळी खंडीत करण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्ण राहत असलेल्या परिसरातील २८० घरांमधील १७०० पेक्षा जास्त लोकांना ‘क्वारंटाईन’ करून त्यांना मनपाच्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले आहे. यासर्वांचे ‘स्वॅब’ घेण्याचे काम सुरू आहे. ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह येणा-या रुग्णावर जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारही सुरू आहेत.

शहरात आतापर्यंत १४५ कोविड-१९ पॉझिटिव्ह रुण आढळले असून यापैकी ४० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत शहरात सुमारे ९६ ‘ॲक्टिव्ह’ केसेस असून त्यापैकी ८८ रुग्ण फक्त सतरंजीपुरा परिसरातील आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मनपातर्फे अहोरात्र काम सुरू आहे. नागरिकांनीही कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

News Credit To:- NMC 

दोन हजारांवर नागरिकांनी स्वगृही जाण्याकरिता मनपाकडे केला अर्ज

कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि अन्य व्यक्तींसाठी केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेनेही त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला दाद देत नागपुरातून बाहेर जाण्यासाठी सुमारे दोन हजार व्यक्तींनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज केले आहेत.

यासाठी नागपूर महानगरपालिकेने https://forms.gle/ra3cySfPtBeVBvzi6 ही लिंक जारी केली आहे. त्या लिंकवर गेल्यानंतर असलेला फॉर्म नागरिकांना भरायचा होता. नागपूर महानगरपालिकेने जाहीर केल्यानंतर शनिवारी (ता. २) दिवसभरात सुमारे एक हजारांवर नागरिकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले.

याव्यतिरिक्त नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या बेघर निवाऱ्यातही परराज्यातील अनेक मजूर आहेत. त्यातील ज्या मजुरांना त्यांच्या स्वगृही जायचे असेल त्यांची माहिती देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निवारा व्यवस्थापकांना दिले होते. तेथून आणि अन्य ठिकाणाहून ऑफलाईन अर्जाची संख्या ही सुद्धा एक हजारांच्या घरात आहे.

ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांचा आकडा मिनिटामिनिटाला वाढत असून सायंकाळी ६ वाजतापर्यंत १०५२ व्यक्तींनी अर्ज केले होते. ज्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यांना नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी संपर्क करून त्यांच्या जाण्यासंदर्भातील व्यवस्थेची माहिती देतील. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या या सुविधेबद्दल अनेक नागरिकांनी मनपाचे आभार मानत मनपाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर आभार मानले आहे.

News Credit To:- NMC

नागपुरातील पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ सुरू

नागपूर:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाउन करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी सर्वत्र सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र भाजी बाजारात या निर्देशाचे ग्राहक आणि दुकानदारांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय वाढीव दरामध्येही भाजी विक्री होत असल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. 

त्यामुळे शेतकऱ्यांकडून माफक दरात ताजा आणि उत्तम दर्जाचा भाजीपाला, फळे नागरिकांना त्यांच्या घराजवळ उपलब्ध व्हावा या उद्देशाने महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून आठ रस्ता चौकातील लक्ष्मीनगर मैदानात शहरातील पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ साकारण्यात आले असून त्याचा गुरूवारी (ता.३०) शुभारंभ झाला. यावेळी महापौर संदीप जोशी यांनी ‘कम्युनिटी मार्केट’ला भेट देउन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली व शेतकरी आणि ग्राहकांशीही संवाद साधला.

दीनदयाल थाली आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने ही संकल्पना राबविण्यात येत आहे. गुरूवारी (ता.३०) सकाळी ६ वाजता ‘कम्युनिटी मार्केट’ला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या बाजारात सोशल आणि फिजिकल डिस्टंसिंगची पुरेपुर काळजी घेण्यात येत आहे. भाजी, फळांचे स्टॉल्स योग्य अंतरावर लावण्यात आले असून त्यापुढे पाच फुटाच्या अंतरावर चौकोन आखण्यात आले आहेत.

या चौकोनामध्ये खुर्च्याही ठेवण्यात आल्या आहेत. शिस्तीमध्ये सुरक्षितरित्या भाजी खरेदी करता यावी यासाठी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता त्यांच्यासाठी रांगेत खुर्च्याही लावण्यात आल्या आहेत. बाजार संपल्यानंतर संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरणही करण्यात येत आहे.

दररोज सकाळी ६ ते ८.३० आणि सायंकाळी ६ ते ८.३० यावेळेत नागरिकांच्या सुविधेसाठी बाजार लावण्यात येत आहे. या ‘कम्युनिटी मार्केट’मुळे लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत माफक दरात पोहोविले जात आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही त्याचा थेट फायदा मिळत आहे. भाजी विक्री करताना किंवा खरेदी करताना कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टसिंगची पायमल्ली होउ नये किंवा संसर्गाचा धोका निर्माण होउ नये यासाठी दीनदयाल थाली आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊनचे स्वयंसेवक कार्यरत आहेत. नागरिकांना आवश्यक मदत त्यांच्यामार्फत केली जाते. बाजारात भाजी खरेदी करायला येताना प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक आहे.

तर शहरात इतर ठिकाणीही सुरू होणार ‘कम्युनिटी मार्केट’
लक्ष्मीनगर मैदानातील ‘कम्युनिटी मार्केट’ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मास्क लावून, सोशल डिस्टसिंगचे पालन करून सर्वच भाजी विक्रेते शेतकरी आणि ग्राहकांनीही मनपाला उत्तम सहकार्य केले आहे. लॉकडाउनमध्ये नागरिकांना माफक दरात चांगल्या व ताज्या भाज्या, फळे मिळावेत या उद्देशाने शहरात प्रायोगिक तत्वावर हे पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ सुरू करण्यात आले आहे. येत्या दिवसांत या ‘कम्युनिटी मार्केट’चा प्रतिसाद कायम राहिल्यास शहरातील अन्य ठिकाणीही याच संकल्पनेनुसार संपूर्ण सुरक्षितरित्या असे मार्केट सुरू करण्यात येतील, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

News Credit To:- NMC

Keeping 3.75L in slums secure a major challenge for NMC

Nagpur:- The Nagpur Municipal Corporation (NMC) has a daunting task at hand to protect the more than 3,75 lakh population living in 458 slum dwellings from coronavirus in crowded spaces and unhygienic conditions. Most of the slums are assembly constituencies in the North, South, and East.

“The slums with the most insecurity are in North Nagpur. Many hutments here measure only 8×8 ft and 5-8 people in the house. While NMC had built toilets in most houses under Swachh Bharat Mission, still scores of families share common toilets and public taps. The probability of transmission of coronavirus here is strong, “said Leena Buddhe, director of Center for Sustainable Development. NMC has installed roughly 60 community toilets in slum areas of the city.

Central Nagpur, which is the current hotspot of Covid-19, has the highest slum population in town. The population of slum dwellers here is 1,11,275 according to slum department data from NMC. The appeal of NMC to the slum dwellers to stay home has been largely ignored at 72,322 and 67,411, respectively, by West and North Nagpur.

Here has found flagrant violations of the lockout and social distancing requirements. There were at least 30 kids playing cricket on an open terrain near Dipty Signal. The general refrain of slum dwellers was “Our houses are so crowded that we prefer to stay outdoors.”

Buddhe attributed a rise in corona cases to the slums in the city and cited examples of the Takia Deewanshah areas of Satranjipura and Mominpura. NMC’s greatest obstacle is touch tracking in a highly congested environment where social distancing is almost impossible.

The two immediate challenges before the municipal corporation are rapid and mass testing and having bigger isolation and medical services in the city.

Municipal commissioner Tukaram Mundhe said NMC had used institutional quarantine as a method to suppress Covid-19’s spread. “We’re working on different aspects and finding high-risk pockets around town,” the civic chief said.

The interesting thing about the NMC approach is that it proactively monitors both Covid patients and non-Covid patients. The civic body had done a 23-lakh odd Nagpurians health survey. A campaign has also been initiated by the municipal corporation to meet senior citizens with other medical problems and ask about their health.

Exit mobile version