नागपुरात केली ‘ही’ कारवाई,तुकाराम मुंढेचा मास्टरस्ट्रोक

यामुळे पुढील धोका लक्षात घेता आताच उपाययोजना केल्या नाही तर संसर्गाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच तेथील नागरिकांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी १००, आजच्या तारखेत ४५० नागरिकांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात आली असून उद्यापर्यंत हा आकडा १२०० च्या घरात जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सतरंजीपुरा परिसर नागपूरसाठी कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्यंभूत माहिती विचारत आहेत. परंतु अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून लक्षात आली आहे.

कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या संपर्कातील सुमारे २०० वर नागरिकांनीही अशीच माहिती लपविली होती. त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्याने मोठा संसर्ग टळला. त्यातीलच पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा ८० पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपविली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही.

नागपूर महानगरपालिका क्षेत्र कोरोना मुक्त करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी नागपुरात हॉट स्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरातील नागरिक अद्यापही माहिती लपवित असल्याने तुकाराम मुंडे यांनी इथल्या बहुतांश लोकांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मंगळवारपर्यंत विलगीकरण करण्यात येणाऱ्या नागरिकांचा आकडा अंदाजे १२०० च्या घरात पोहोचेल, अशी माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या चमूला खरी माहिती पुरवा. समाजाचे शत्रू बनू नका. मानवतेचे दूत बना, असे आवाहन पुन्हा एकदा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

नागपुरात साकारणार आता ‘कम्युनिटी मार्केट’

नागपूर:- भाजी बाजारात होणारी गर्दी, स्पष्ट निर्देश असतानाही नागरिकांकडून होणारी सोशल डिस्टंसिंगची पायमल्ली आणि लॉकडाऊनमुळे जादा दराने मिळत असलेला भाजीपाला या सर्व समस्यांवर आता रामबाण उपाय मिळाला आहे. महापौर संदीप जोशी यांनी ‘कम्युनिटी मार्केट’ची अभिनव संकल्पना मांडली असून यामाध्यमातून आता थेट शेतकऱ्यांकडून माफक दरात ताजा आणि उत्तम दर्जाचा भाजीपाला, फळे नागरिकांना त्यांच्या घरासमोरच उपलब्ध होणार आहे.

ही अभिनव संकल्पना दीनदयाल थाली आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. ‘कम्युनिटी मार्केट’ या संकल्पनेतून साकारण्यात येणारा पहिलावहिला भाजीबाजार आठ रस्ता चौकातील पूर्व लक्ष्मीनगरमधील मैदानात गुरुवार ३० एप्रिलपासून नागरिकांच्या सेवेत येणार आहे. सकाळी ६ ते ८.३० या वेळेत नागरिक अगदी माफक दरात ताजी भाजी घेऊ शकेल, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना उत्तम दर्जाची व माफक दरातील भाजी व फळे घेण्यासाठी घरापासून दूर जावे लागते. तेथे गर्दीमुळे सामाजिक अंतर पाळले जात नाही. नियमाची सर्रास पायमल्ली होत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका बळावण्याची शक्यता अधिक असते. दारावर आलेल्या विक्रेत्याकडून महागात भाजी व फळे विकत घ्यावी लागतात.

ह्या सर्व समस्यांवर उपाय म्हणून आता महापौर संदीप जोशी यांनी ‘कम्युनिटी मार्केट’ ही अभिनव संकल्पना मांडली. यासंदर्भात मंगळवारी (ता. २८) मनपा मुख्यालयात बैठक घेण्यात आली. महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषि उपसंचालक नागपूर विभाग अरविंद उपरिकर, उपायुक्त (बाजार) महेश मोरोणे, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य यांच्यासह अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

काय आहे ‘कम्युनिटी मार्केट’
कम्युनिटी मार्केट ही संकल्पना ठराविक परिसरातील नागरिकांसाठी मांडण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तुटावी म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कॉटन मार्केटसारखे मुख्य मार्केट बंद झाल्यामुळे भाज्यांची आवक घटली. ज्या भाज्या नागरिकांना मिळत आहे, त्यांचा दर्जाही उत्तम नाही आणि दरही चढलेले आहेत.

यावर मात करण्यासाठी तीन चार वस्त्या, परिसर वा प्रभाग मिळून एक छोटासा भाजीपाला बाजार तयार करून थेट विक्रेता व ग्राहक यांचा संपर्क करून देण्यात येत आहे. यामुळे नागपूरच्या जनतेला घराच्या अगदी जवळ, माफक दरात उत्तम दर्जाची भाजी व फळे मिळतील, ही यामागील संकल्पना असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

पाळावे लागतील हे नियम
नागपुरातील पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ पूर्व लक्ष्मीनगरमधील मैदानात सुरू होतेय. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरातील अन्य भागातही ते सुरू होईल. मात्र या मार्केटमध्ये लॉकडाऊनसाठी असलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. ‘कम्युनिटी मार्केट’मध्ये येताना चेहऱ्यावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे बंधनकारक राहील. या नियमांचे पालन होते की नाही यासाठी स्वयंसेवकही नेमण्यात आले आहेत. अर्थात हा संपूर्ण उपक्रम लॉकडाऊनच्या काळात नियोजनबद्धरीत्या राबविण्यात येणार आहे.

News Credit To:- NMC

आणखी तिघांनी दिली कोविडला मात

नागपुर:- मुळचे जबलपुरचे असलेले व सद्या नागपुरातील मोमीनपुरा परिसरात राहणारे तिघे मंगळवारी (ता.२८) कोविड-१९ला हरवून पूर्णपणे बरे झाले आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) कोरोना कक्षातून तिघांनाही ‘डिस्चार्ज’ मिळाल्यानंतर सर्व डॉक्टर, नर्स, परिचारीकांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.

दिल्लीवरून परतलेल्या नागरिकांचा शोध घेउन मनपातर्फे त्यांना ‘कॉरंटाईन’ करण्यात आले. यामध्येच ३४ वर्षीय व्यक्ती] २४ वर्षीय आणि १७ वर्षीय तरुणांचा समावेश होता. या तिघांनाही आमदार निवास येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. १३ एप्रिलला या तिघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले.

१४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. २६ व २७ एप्रिलला तिघांचेही ‘स्वॅब’ निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना मंगळवारी (ता.२८) घरी पाठविण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.सागर पांडे यांच्यासह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

रुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना १४ दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ राहणे बंधनकारक आहे. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडून वेळावेळी आवश्यक उपचार करण्यात आले. प्रशासनातर्फे वेळेवर उपचार मिळाल्याने आज आम्ही पूर्णपणे बरे झाले आहोत.

कोरोनाला प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडून दिल्या जाणा-या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. कोणतेही लक्षण आढळल्यास माहिती न लपवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन या तिन्ही रुग्णांमार्फत करण्यात आले आहे.

News Credit To:- NMC

कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यास मनपा तयार : महापौर संदीप जोशी

नागपूर:- कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी नागपूर महानगरपालिकेने कंबर कसली असून कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यास तत्पर आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असून मनपाच्या पाच रुग्णालयांचा कायापालट करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील १० दिवसात सुमारे ३०० ते ४०० खाटांची ऑक्सीजनसह व्यवस्था उभी करण्यात येईल, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

नागपूर शहरातील मनपाद्वारे संचालित पाच रुग्णालयांचा कायपालट करण्याचे कार्य सुरू झाले आहे. यामध्ये पाचपावली सुतिकागृह, पाचपावली हॉस्पिटल, सदर हॉस्पिटल, के. टी. नगर येथील एस.आर.ए. इमारत आणि आयसोलेशन हॉस्पिटलचा समावेश आहे. महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी (ता. २७) आयसोलेशन हॉस्पिटलला भेट देऊन सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. अत्याधुनिक सोयींनी युक्त आणि सुसज्ज हॉस्पिटल पुढील काही दिवसात तयार होणार आहे.

कोरोना विषाणू प्रसारासंदर्भातील नागपूरची स्थिती बघता भविष्यात येणाऱ्या संकटाचा विचार करून ह्या सोयी करणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच नागपूर महानगरपालिकेने हे पाऊल उचलले असून कोव्हिड -१९ च्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सोयी येथे करण्यात येत आहे. महापौर या नात्याने आपण या सर्व व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवून आहोत.

नागपूरकरांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सोयीसंदर्भात मनपा दक्ष असून नागपूरकरांना संपूर्ण उपचार येथेच उपलब्ध होईल, अशी व्यवस्था आम्ही करीत आहोत. यापेक्षा अजून काय चांगले करता येईल, यावरही आम्ही विचार करीत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाची साखळी इथेच तुटावी, असे तुम्हा-आम्हा सर्वांना वाटते. त्यासाठी नागपूरकरांचे संपूर्ण सहकार्य लॉकडाऊनदरम्यान अपेक्षित आणि आवश्यक आहे. बुहान ते सतरंजीपुरा हे अंतर साडेसहा हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. मात्र, सतरंजीपुरा आपल्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांनी आता निर्णय घ्यायला हवा. घरात राहून कोरोनाची साखळी तोडा, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी केले.

News credit To NMC

सतरंजीपुऱ्यातील नागरिकांची विलगीकरण कक्षात रवानगी

नागपुर:- कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात हॉट स्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरातील नागरिक अद्यापही माहिती लपवित असल्याने तेथील बहुतांश लोकांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत विलगीकरण करण्यात येणाऱ्या नागरिकांचा आकडा अंदाजे १२०० च्या घरात पोहचेल, अशी माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, सतरंजीपुरा परिसर नागपूरसाठी कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्यंभूत माहिती विचारीत आहेत. परंतु अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून लक्षात आली. कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या संपर्कातील सुमारे २०० वर नागरिकांनीही अशीच माहिती लपविली होती.

त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्याने मोठा संसर्ग टळला. त्यातीलच पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा ८० पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपविली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. आताच उपाययोजना केल्या नाही तर संसर्गाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच तेथील नागरिकांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी १००, आजच्या तारखेत ४५० नागरिकांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात आली असून उद्यापर्यंत हा आकडा १२०० च्या घरात जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या चमूला खरी माहिती पुरवा. समाजाचे शत्रू बनू नका. मानवतेचे दूत बना, असे आवाहन पुन्हा एकदा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

News credit to:- NMC

सहा रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतले घरी

नागपूर:-कोरोनाच्या महासंकटात नागपूर शहरासाठी एक आनंददायी बातमी आहे. कोरोनाची लागण झालेले आणि उपचार घेत असलेले सहा रुग्ण पूर्णतः बरे झाले असून सोमवारी (ता. २७) त्यांना सुटी देण्यात आली.

पूर्णतः बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये एक रुग्ण कामठी, एक सतरंजीपुरा आणि ४ जबलपूरचे ज्यांचे वास्तव्य सध्या मोमीनपुरा येथे होते, यांचा समावेश आहे.या सर्व सहाही रुग्णांना १२ एप्रिल रोजी आमदार निवासातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाल्यानंतर त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.

उपचारानंतर १४ व्या दिवशी म्हणजे २५ एप्रिल रोजी आणि १५ व्या दिवशी म्हणजे २६ एप्रिल रोजी त्यांचे नमुने घेण्यात आले. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्व सहाही जणांना आज घरी पाठविण्यात येत असल्याचे मेयो रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सांगितले.सर्व रुग्णानी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्याचे आणि प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानले. उपचार करणाऱ्या चमूनेही त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

News credit to:- NMC

गरोदर महिलांच्या तपासणीसाठी मनपाची विशेष चमू

नागपूर:- लॉकडाऊनमध्ये गरोदर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची वेळोवेळी तपासणी होणे तसेच आवश्यक लसीकरण करणे गरजेचे आहे. कोविडमुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे. अशात गरोदर महिलांच्या संदर्भात संभाव्य धोके टाळण्यासाठी मनपाने त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष चमू निर्धारित केली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून यासाठी विशेष रुग्णवाहिका तयार करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेद्वारे स्त्री रोग तज्ज्ञ गरोदर महिलांच्या रहिवासी क्षेत्रात जाऊन त्यांची तपासणी करीत आहेत. रविवारी (ता.२६) शहरातील मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा भागामध्ये चमूद्वारे गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील कोरोना संसर्गाचे ‘हॉटस्पॉट’ प्रतिबंधीत करण्यात आले आहेत. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत या प्रतिबंधीत क्षेत्रातील अती धोकादायक गटातील व्यक्ती शोधण्यात आल्या आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून या ठिकाणच्या गरोदर महिला शोधून त्यांची आरोग्य तपासणी मनपाद्वारे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तपासणीसाठी या महिलांना कोणत्याही रुग्णालयात जायची गरज नाही. त्या राहत असलेल्या ठिकाणी मनपाची चमू येईल व स्त्री रोग तज्ज्ञांमार्फत आवश्यक त्या सर्व तपासण्या केल्या जातील. गरोदर महिलांची रक्त, लघवी तपासणी किंवा लसीकरण आणि आवश्यक औषधोपचार या सर्व सुविधा मनपाद्वारे घरपोच देण्यात येत आहेत. रविवारी (ता.२६) कोरोना संसर्गाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा भागात जाऊन येथील गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जन्माला येणा-या बाळाला कोणत्याही धोका राहू नये, आई आणि बाळाचे आरोग्य चांगले रहावे या उद्देशाने मनपाद्वारे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

आरोग्य तपासणीसह घेणार ‘स्वॅब’
गरोदर महिलांचे संभाव्य धोके टाळण्यासाठी त्यांच्या आरोग्य तपासणीसह त्यांचा कोरोना चाचणीसाठी ‘स्वॅब’ही घेण्यात येणार आहे. यासाठी महिलांना विलगीकरण कक्षात राहण्याची गरज नाही. ‘स्वॅब’चा अहवाल निगेटिव्ह राहिल्यास त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. मात्र ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार केले जातील. अत्यंत सुरक्षितरित्या हे ‘स्वॅब’ घेण्यात येते. रुग्णवाहिकेमध्ये कोरोना ‘स्वॅब’ घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ‘स्वॅब’ घेणारे डॉक्टरचे फक्त दोन्ही हात बाहेर येतात व चाचणी केली जाते. संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत सुरक्षितरित्या ही चाचणी केली जात आहे. आई आणि होणा-या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही चाचणी होणे आवश्यक आहे. स्वतःला आणि येणा-या बाळाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी शहरातील सर्व ठिकाणच्या महिलांनी तपासणीसाठी पुढे यावे व मनपाच्या आरोग्य चमूला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

News Credit To:- NMC

NMC Strict on People Posting False Messages on Social Media

Nagpur:- In the case of false messages circulating on social media about the spread of the virus, the civic body in the town seems to be very strict. As mentioned, in the name of NMC chief Mr. Tukaram Mundhe, false news about Nag river being clean in the city was circulated over social media. According to sources, the fake message first appeared on 23 April with the NMC chief’s name informing the same.

The message came in the form of memes generated on NMC claiming that the low rate of contamination has made the city’s sewage water potable to everyone. It further said the NMC’s supply water will, therefore, be supplied from the city’s Nag River. On the other hand, when this message reached the NMC and its president, everyone found it to be fake news because none of those decisions were taken in the city to supply water from the Nag river as it is still polluted.

And NMC was swift to file a complaint against the man who posted this message to the Police on social media. According to sources, the complaint has been recorded at Sadar Police Stations against this fake news message with different parts of the IPC. The Police have earlier warned people not to spread the fake news on social media. They had said they would seriously punish anyone who indulges in the same. Stay tuned only with us to learn more about them, and others.

कुटुंबांची माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे/कोरोना संसर्गात संबंधित व्यक्ति:- तुकाराम मुंढे यांचे आवाहन

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची आरोग्य विभागाची चमू अहोरात्र प्रयत्न करत आहे. सतरंजीपुराच्या त्या एक रुग्णामुळे २३५ च्या वर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने आपल्या वतीने तेथील ३० घरांमध्ये राहणा-या १५० नागरिकांना ‍विलगीकरण कक्षात पाठविले आहे.

तथापि लोक याबददल माहिती देत नाही किंवा प्रशासनाची दिशाभूल करीत असल्यामुळे या कामात अडचण निर्माण होत आहे. नागपूरच्या आरोग्यासाठी लोकांनी खरी माहिती द्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

मनपाला सहकार्य करा : आयुक्त
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अशाप्रकारे माहिती लपविणे हे दुर्देवी आणि क्लेशदायक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी भावनिक आवाहन करताना सांगितले की, नागरिकांनी पलायन करण्याऐवजी मनपाच्या चमूला सहकार्य करावे आणि आपला उपचार करुन घ्यावा. ज्या नागरिकांची कोरोना टेस्ट केली जाईल जर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी पाठविण्यात येईल. जर कोणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्याचा उपचार केला जाईल. त्यांनी आवाहन केले की नागरिकांनी समोर येऊन मनपाच्या चमूला सहकार्य करावे. जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागेल. नागरिकांनी नागपूरला कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आयुक्त म्हणाले.

असेच एक प्रकरण शुक्रवारी रात्री (ता. २४) झाले. कळमना क्षेत्राच्या एका गोदामामध्ये लपून बसलेल्या १२ नागरिकांना मनपाच्या चमूने पोलिस विभागाच्या मदतीने पकडून त्यांना आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले.

विजयनगर, कळमना येथील ज्या गोदामामध्ये त्या परिवाराने आसरा घेतला होता. त्याचा दिवा रात्रीच्या वेळेस सुरु झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली. त्यांनी पोलिसांना याबददलची सूचना दिली.

शुक्रवारी रात्रीला उशिरा आरोग्य विभाग मनपाची चमू आणि पोलिस विभागानी संयुक्तरित्या तेथे धाड टाकली आणि तिथे लपून बसलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात पाठविले. ही कारवाई मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात लकडगंज झोनचे झोनल अधिकारी डॉ.उमेश मोकाडे यांच्या उपस्थितीत झाली. कळमना पोलिस स्टेशनचे अधिकारी सुध्दा यावेळी उपस्थित होते.

सतरंजीपुराच्या एका नागरिकाला दोन दिवसापूर्वी त्याच क्षेत्रात आरोग्य विभागाच्या चमूने विलगीकरण कक्षात पाठविले. त्याला त्याच्या परिवाराबददल माहिती विचारली तर त्याने आरोग्य विभागाची दिशाभूल केली की त्याचा परिवार बिहारमध्ये आहे. आरोग्य विभागाच्या चमूने जेव्हा अधिकची माहिती घेतली तर माहिती मिळाली की त्याचा परिवार नागपूर मध्ये कुठेतरी दडून बसलेला आहे.

सतरंजीपुराच्या ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील दोघे उपचारानंतर घरी परतले

शहरात कोविड-१९ रुग्ण संख्येने शतक गाठल्याने एकीकडे चिंता वाढली असतानाच कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या ‘त्या’ रुग्णाच्या संसर्गाने बाधित दोघे पूर्णपणे बरे झाल्याने कोरोना विरोधात लढा देणा-या प्रत्येकाचे मनोबलही उंचावले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडीकल) प्रशासनाने टाळ्या वाजवून या दोन्ही रुग्णांना निरोप दिला.
शहरातील ५६ जण कोविड-१९ पॉझिटिव्ह ठरण्याचे कारण बनलेल्या आणि २३५ जणांच्या संसर्गासाठी धोका ठरलेल्या सतरंजीपुरा येथील ‘त्या’ मृत कोरोनाग्रस्ताचे मुलगा आणि मुलगी आज (ता.२४) कोरोनामुक्त होउन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडीकल) घरी परतले.
५ एप्रिलला मृत्यू झालेल्या सतरंजीपुरा बडी मस्जीद परिसरातील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. या रुग्णामुळे शहरातील २३५ जणांना कोविड-१९च्या संसर्गाचा धोका निर्माण झाला तर ५६ कोरोनाबाधित ठरले. ‘त्या’ रुग्णाच्या परिवारातील सर्व सदस्यांना मनपाच्या ‘कोविड कंट्रोल सेंटर’मध्ये नेण्यात आले. ७ एप्रिलला ‘त्या’ रुग्णाची ३५ वर्षीय मुलगी व ३० वर्षीय मुलाचे ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह आले. तेव्‍हापासून दोघांवरही मेडीकलमध्ये उपचार सुरू झाले.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांच्यासह डॉ.कांचन वानखेडे, डॉ. फैजल, डॉ. स्नेहल, डॉ. मुरारी सिंग, डॉ.श्याम राठोड, डॉ. चेतन वंजारी, डॉ.विपुल मोदीख डॉ. पटनाईक, मालती डोंगरे, फार्मासिस्ट श्री.चक्रबर्ती यासर्वांसह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू झाले. १४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. चौदाव्‍या दिवशी २१ एप्रिलला आणि पंधराव्या दिवशी २२ एप्रिलला देण्यात आलेले दोघांचेही दोन्ही ‘स्वॅब’ निगेटिव्ह आले. 
त्यानंतर इतर आवश्यक सर्व तपासण्या करून शुक्रवारी (ता.२४) दोघांनाही सुट्टी देण्यात आली व सुखरूप घरी पाठविण्यात आले. रुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना १४ दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ राहणे बंधनकारक आहे.

News credit:- NMC

 

Exit mobile version