NMC scans all patients with TB, finds 4 unwell

Nagpur Updates: The Nagpur Municipal Corporation (NMC) examined 2,246 persons suffering from tuberculosis (TB) to contain deaths and spread of Covid-19 cases from one relation as in Satranjipura case. The first and only death of Covid-19 in City so far, the 68-year-old resident of Satranjipura, was a patient with TB. His 56 members of his family and related associates have so far tested positive.

Municipal commissioner Tukaram Mundhe and his team including chief medical officer Dr. Yogendra Savai, additional medical officer Dr. Praveen Gantawar and others have already protected 25 lakh of the city’s 30 lakh population under a door-to-door survey of high-risk patients.

Mundhe told that “our team will track patients with TB on a regular basis. If required, we can easily isolate them, as we have their address and phone numbers. The next step is to reach out to all chronic obstructive pulmonary disease (COPD) sufferers. Patients with TB and COPD are people at high risk for Covid-19. In the case of Satranjipura we have witnessed the effects, “he said.

Dr. Savai said, “In the last nine days our drive has covered 2,246 patients with TB. The remaining 1,245 TB patients are registered with the government and 1,001 are private registered patients. Our teams reached all of them into their homes and directed them to regularly take medicines to protect them from Covid-19. They found four patients suffering from fever and cough.

We advised them to get immediately handled what they are doing. “Dr. Savai added,” NMC will start driving from Friday to reach out to patients with COPD. In our door-to-door survey of high-risk people, we have found people with COPD. “Dr. Savai also said TB and COPD patients are the ones who will need oxygen in case they get infected with coronavirus, so we leave nothing to chance.

नागपुरातील भालदारपुरा परिसर सील मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

नागपूर: शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. आतापर्यंत मनपातर्फे सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसर, गांधीबाग महाल झोन मधील बैरागीपुरा प्रभाग क्रमांक २२, आसीनगर झोन अंतर्गत प्रभाग क्र. ३ आणि सतरंजीपुरा झोन अंतर्गत प्रभाग क्र. ७ मधील बहुतांश परिसर, सतरंजीपुरा झोन अंतर्गत दलालपूरा प्रभाग क्रमांक २१, मंगळवारी झोन अंतर्गत प्रभाग १० आणि धरमपेठ अंतर्गत प्रभाग १२ आदी भाग सील करण्यात आले आहेत. या सर्व भागांमध्ये मनपाद्वारे दैनंदिन अत्याआवश्यक सामुग्रीही पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

 नागपूर महानगरपालिका हद्दीतील गांधीबाग महाल झोन अंतर्गत भालदारपुरा प्रभाग क्रमांक १९ या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.या आदेशानुसार गांधीबाग महाल झोन क्रमांक ६ अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक १९ च्या निश्चित केलेल्या कॅटेनमेंट एरिया दक्षिण-पूर्वेस चिटणीस पार्क (घाटे रेस्टॉरेंट), उत्तर-पूर्वेस अग्रसेन चौक, उत्तर-पश्चिमेस तारेकर भवन पोस्ट ऑफिस, दक्षिण-पश्चिमेस टाटा पारसी स्कूल हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहेत. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मनपाला सहकार्य करा!

कामासाठी शहरात आलेले अनेक लोक लॉकडाउनमुळे शहरात अडकले आहेत. या लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मनपाच्या सहकार्याने अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. दररोज हजारो गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचविण्याचे कार्य स्वयंसेवी संस्था मनपाच्या माध्यमातून करीत आहेत, हे अभिनंदनीय कार्य आहे. आजच्या स्थितीत जास्तीत जास्त गरजूंपर्यंत मदत पोहोचणे आवश्यक आहे. या कार्यासाठी शहरातील नागरिकांनी पुढे येउन मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने शहरात २७ ‘कम्यूनिटी किचन’ सुरू आहेत. बुधवारी (ता.२२) महापौर संदीप जोशी व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी मैत्री परिवार संस्था व लॉयन्स क्लब या दोन संस्थांच्या वतीने सुरू असलेल्या ‘कम्यूनिटी किचन’ला भेट दिली. यावेळी मनपाचे प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम, मैत्री परिवार संस्थेचे प्रा.संजय भेंडे, प्रा.प्रमोद पेंडके, रोहित हिमटे, सीएजी ग्रुपचे विवेक रानडे, लॉयन्स क्लबचे विनोद वर्मा, श्री.कौशिक, श्रवण कुमार उपस्थित होते.
महापौरांनी दोन्ही संस्थांमार्फत सुरू असलेल्या ‘कम्यूनिटी किचन’ची आणि त्यामार्फत केल्या जाणा-या कार्याची माहिती जाणून घेतली. मनपाच्या माध्यमातून होत असलेल्या सेवा कार्याबद्दल मनपाचे प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्या कार्याचे कौतुक करीत महापौर संदीप जोशी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
महापौर म्हणाले, कोरोनाला हरविण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाउनला सहकार्य करीत आहे. आज शहरात विदर्भातील आणि परराज्यातील अनेक विद्यार्थी, नोकरदार, विस्थापित कामगार अडकले आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि रेशन कार्ड नसलेल्या अनेकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. अशा स्थितीत या नागरिकांच्या मदतीकरीता, त्यांना दोन वेळचे जेवण किंवा अत्यावश्यक साहित्यांचा पुरवठा करण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत. दीनदयाल थालीच्या माध्यमातूनही अनेकांना दोन वेळचे जेवण पोहोचविण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आजघडीला रोज ४५ हजार लोकांपर्यंत मदत पोहोचविली जात आहे. यासाठी अहोरात्र काम करणारी प्रत्येक व्यक्ती अभिनंदनास पात्र आहे. मात्र गरजूंना मदत पोहोचविण्यासाठी मनपाचे हात अधिक बळकट करण्याची गरज आहे. या सेवा कार्यासाठी कोणत्याही स्वरूपात मदत करू इच्छिणा-यांनी पुढे यावे, असेही आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
मैत्री परिवार संस्थेच्यावतीने शहरात सुरेंद्रनगर, वझलवार लॉन धरपेठ आणि अत्रे लेआउट या तीन ठिकाणी ‘कम्यूनिटी किचन’ चालविले जात आहेत. सुरेंद्रनगर आणि वझलवार येथील किचनमधून शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, भाड्याने राहणा-या व्यक्ती आदींना दररोज सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एक हजार असे दोन्ही किचनमधून दररोज चार हजार जेवणाचे डबे पोहोचिण्यात येत आहेत. तर अत्रे लेआउट येथील किचनमधून सकाळी ५०० व सायंकाळी ५०० असे दररोज एक हजार लोकांपर्यंत जेवण पोहोविण्यात येत आहे.
लॉयन्स क्लबच्या माध्यमातून मानवसेवा नगर सेमीनरी हिल्स टीव्‍ही टॉवर येथे ‘कम्यूनिटी किचन’ सुरू करण्यात आली आहे. या किचनमधून हजारीपहाड, पांढराबोडी, सुदामनगरी, फुटाळा या वस्त्यांमध्ये दररोज १६०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. रेशन कार्ड नसणा-यांनाही लॉयन्स क्लबद्वारे जीवनावश्यक साहित्यांची किट उपलब्ध करून देण्यात येत आहे.

४४ स्वयंसेवी संस्था, १५ दानदाते, नउ जणांकडून आर्थिक मदत
लॉकडाउनमध्ये गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मनपाला ४४ स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. या स्वयंसेवी संस्था ‘कम्यूनिटी किचन’मधून तयार होणारे जेवण गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. तर ‘कम्यूनिटी किचन’मधून तयार होणा-या अन्नासाठी शहरातील १५ समाजसेवींची मदत प्राप्त झाली आहे. हे दानदाते जेवणाची आवश्यक सर्व साहित्याची मदत करीत आहेत. याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्था स्वत:च्या खर्चातून जेवण तयार करतात किंवा अन्न साहित्याची मदत करतात. या संस्थांना मदतीसाठी नउ सेवाभावी नागरिक सरसावले आहेत. या नागरिकांमार्फत संस्थांना परस्पर आर्थिक मदत करण्यात आली आहे. यासर्व संस्थांच्या कार्यावर नियंत्रण, त्यांचा लेखाजोखा आणि पाठपुरावा मनपातर्फे केला जातो. या सर्व सेवाभावी स्वयंसेवी संस्था, समाजसेवी नागरिकांच्या मदतीने आजघडीला ४५ हजार लोकांना मदत पोहोचविली जात आहे. आजच्या स्थितीत विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संपूर्ण शहरात २७ ‘कम्यूनिटी किचन’ सुरू आहेत.

शहराबाहेरील १३७५ नागरिक बेघर निवा-यात आश्रयीत
लॉकडाउनमुळे शहरात अडकलेले नागपूर बाहेरील १३७५ नागरिक मनपाच्या शहरी बेघर निवा-यामध्ये आश्रयाला आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या मध्यप्रदेशातील नागरिकांची आहे. मध्यप्रदेशातील ६९३ नागरिक बेघर निवा-यात निवास करीत आहेत. तर नागपूरच्या जवळच्या भागातील भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, तुमसर, बुलडाणा आणि पुणे या सर्व भागातील २९६, छत्तीसगढ येथील ३५, उत्तरप्रदेश १२९, बिहार ८, तेलंगना १६, आंध्रप्रदेश ४, कर्नाटक १, राजस्थान १५९, झारखंड १३, हरियाणा १२, ओडिशा ४ आणि इतर ५ असे एकूण १३७५ नागरिक मनपाच्या शहरी निवारा केंद्रात वास्तव्यास आहेत.
२७ ‘कम्यूनिटी किचन’साठी सरसावलेल्या संस्था व व्यक्ती
अ.क्र. —— जेवण तयार करणा-या संस्था ——– संबंधित व्यक्ती
१ ———-ग्रुप ऑफ नागपूर फ्रेन्ड्स-मॉ———–आकाश काटोले
२———अन्न अमृत फाउंडेशन व इस्कॉन——–राजेंद्र रमन
३———-छत्तरपूर फॉर्मस्, लॉफ्टर क्लब———श्री. अभिषेक
४———-लॉफ्टर क्लब————————–किशोर ठुठेजा
५———-पूर्वा ऑटोमोबाईल मित्र परिवार व जागरण फाउंडेशन —–अशोक बंब (जैन)
६———-जलाराम मंदिर ट्रस्ट—————–दिलीप ठकराल
७———-लॉयन्स क्लब————————विनोद वर्मा
८———–सुसंस्कार बहुद्देशिय शिक्षण संस्था दिव्यानी अभिनव सहकारी संस्था———-चंद्रशेखर भिसीकर
९———–प्रियदर्शनी बहुद्देशिय सहकारी संस्था————–भास्कर पराते
१०———नागपूर महिला मंडळ—————श्री. नारनवरे
११———-शगुन महिला मंडळ—————श्री. राय
१२———मैत्री परिवार संस्था (सुरेंद्र नगर)—–चंदु पेंडके
१३———मैत्री परिवार संस्था (अत्रे लेआउट)—–चंदु पेंडके
१४———स्वामीनारायण मंदिर ट्रस्ट————–प्रवीण पटेल
१५——–राष्ट्रीय सेवा योजना, नागपूर विद्यापीठ——–केशव वाळके १६——–रतन पॅलेस सोसायटी——————-गणेश गांधी १७——-मैत्री परिवार संस्था आणि सीएजी ग्रुप (वझलवार लॉन)——चंदु पेंडके १८———बडी मारवाड माहेश्वरी पंचायत भवन, हिवरी नगर———-दिनेश सारडा १९———एमएसआरटीसी एम्प्लॉई सोसायटी गणेशपेठ————-एमएसआरटीसी एम्प्लॉई सोसायटी गणेशपेठ २०——–लोकमान्य सांस्कृतिक व क्रीडा मंडळ————–रमण सेनाड २१———हॉटेल राजधानी————————-संजय जवाहारानी २२———पॉवर ऑफ वेलफेअर फाउंडेशन——शिल्पी बागडी २३———सरिता कौशिक————————-सरिता कौशिक २४——–श्री सतगुरू साई चॅरिटेबल ट्रस्ट———श्री. महाजन २५——–निरजा पठनिया/नेहा पटेल————निरजा पठनिया/नेहा पटेल २६——-प्रफुल्ल देशमुख—————–प्रफुल्ल देशमुख २७——-शालिनी सक्सेना—————-शालिनी सक्सेना

मेयर संदीप जोशी यांनी नागपूरच्या पत्रकारांची विशेष कोरोना टेस्ट घेण्यासाठी स्तुत्य उपक्रम केले

नागपूर महानगरपालिका, नागपूर(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक                                                         ता. २० एप्रिल २०२०

नागपुरातील पत्रकारांची होणार कोरोना चाचणी

महापौर संदीप जोशी यांचा पुढाकार

नागपूर, ता. २० : मुंबई येथील ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने प्रसार माध्यम क्षेत्रात काम करणा-या प्रतिनिधींना कोविड-१९चा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील पत्रकारांसाठी कोरोनाची विशेष चाचणी घेण्याचा पुढाकार महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे.

महापौरांच्या पुढाकारातून शहरातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींची कोरोना चाचणी २१ आणि २२ एप्रिलला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घेण्यात येणार आहे. मंगळवारी २१ एप्रिलला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींची सकाळी ९.३० वाजता तर बुधवारी २२ एप्रिलला प्रिंट मीडियाच्या फिल्डवर काम करणा-या प्रतिनिधींची चाचणीही सकाळी ९.३० वाजतापासून करण्यात येणार आहे.

नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील पत्रकार दिवस रात्र कार्य करीत आहेत. सर्वत्र कोरोनाचा धोका असतानाही हे प्रतिनिधी जीवाची पर्वा न करता अनेक ठिकाणी जाउन जनतेपर्यंत अचूक माहिती पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेत.

अशा स्थितीत त्यांनाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. पत्रकारांच्या परिवाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची चाचणी होणे आवश्यक आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या फिल्डवर काम करणा-या प्रतिनिधींनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो हॉस्पीटल) जाउन ही चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

महासंकटाच्या काळात ‘मैत्री’चा आधार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना बाहेरगावचे असलेले आणि नागपुरात अडकलेले विद्यार्थी, निराधार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि नागपुरात अडकलेल्या बाहेरगावच्या व्यक्तींच्या मदतीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला साद देत अनेक सामाजिक संस्था धावून आल्या. मनपाच्या नेतृत्वात या सामाजिक संस्थांनी अशा व्यक्तींना आधार दिला. यातीलच एक संस्था म्हणजे मैत्री परिवार. अन्नदानाचे महत्‌कार्य करीत ‘मैत्री’ने गरजूंना दिलेला आधार लाख मोलाचा ठरत आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अशा व्यक्तींच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांना हाक दिली. शहरातील २७ ठिकाणी कम्युनिटी किचन उघडून ज्या व्यक्तींना भोजनाची आवश्यकता आहे अशा व्यक्तींना दोन वेळचे भोजन पुरविण्याचे कार्य नागपूर महानगरपालिकेने सुरू केले. यामध्ये शहरातील अग्रणी सेवाभावी संस्था ‘मैत्री परिवारा’चे कार्य प्रशंसनीय ठरले आहे.
मैत्री परिवाराने २५ मार्चपासून लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावचे होस्टलवर किंवा रुमवर राहणारे विद्यार्थी ज्यांच्याकडे जेवणाची काही सोय नाही अशांना भोजन पुरविण्याची व्यवस्था उभारली. प्रारंभी ४१६ व्यक्तींना कोतवाली पोलिस ठाण्याच्या माध्यमातून भोजन पुरविण्याची सुरुवात झाली. हळूहळू हा आकडा वाढत गेला. २९ मार्चपासून मैत्री परिवाराने संस्थेच्या नेटवर्कच्या माध्यमातून सेवा देण्यास प्रारंभ केला. आज सुमारे २५०० विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींना फूड पॅकेट पोहचविण्यात येतात.
मैत्री परिवाराच्या किचनमधून तयार झालेल्या फूड पॅकेटस्‌पैकी ८७३ व्यक्तींना मैत्री परिवार स्वयंसेवकांच्या माध्यमातून, १७५ फूड पॅकेटस्‌ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून, १०० फूड पॅकेटस्‌ कोतवाली पोलिस ठाण्याच्या माध्यमातून तर ३०० फूड पॅकेटस्‌ नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पोहचविण्यात येतात. हा आकडा दररोज बदलत असतो.

दोन किचन आणि शेकडो स्वयंसेवक
मैत्री परिवार दोन किचनच्या माध्यमातून सामाजिक अंतराचे भान राखत शेकडो स्वयंसेवकांच्या मदतीने अन्नदानाचे कार्य करीत आहे. मैत्री परिवारातर्फे संचालित सुरेंद्र नगर येथील वसतिगृहात एक स्वयंपाकघर तयार करण्यात आले आहे तर दुसरे स्वयंपाकघर धरमपेठ येथील वझलवार लॉन येथे सिटीझन ॲक्शन ग्रुपच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे. येथे निर्जंतुकीकरण नियमित करण्यात येते. या दोन्ही स्वयंपाकघरात सकाळी ५ वाजतापासून स्वयंपाकाला सुरुवात होते. दुपारी १२ वाजताच्या आत गरजूंना फूड पॅकेट पोहचविले जातात. विशेष म्हणजे हे अन्न जीवनसत्व युक्त असून त्यात वैविध्य असते. या काळात नागरिकांना श्रीखंड, बुंदीचे लाडू, या मिष्ठान्नासोबतच फळेसुद्धा दिली जातात. अन्न वितरणाच्या दृष्टीने मैत्री परिवाराने संपूर्ण शहराची विभागणी १४ झोनमध्ये केली आहे. वितरणासाठी १४ वाहने असून वाडी, हिंगणा, पारडी, उमरेड रोड, हुडकेश्वर, काटोल रोड आदी दूरवरच्या भागातही अन्न पुरविले जात आहे. विशेष म्हणजे या फूड पॅकेट्सव्यतिरिक्त १५०० अतिरिक्त चपात्याही गरजूंना पुरविल्या जातात. मागणी आल्यानंतर संबंधित व्यक्तींकडून आधार कार्ड, महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा कर्मचारी असेल तर कार्यालयाचे ओळखपत्र घेतले जाते. संबंधित व्यक्ती खरंच गरजू आहे अथवा नाही याची शहानिशा केल्यानंतरच त्याला सेवा पुरविली जाते.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली भेट
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (ता. १८) सुरेंद्रनगर आणि धरमपेठ येथील दोन्ही स्वयंपाकघराला भेट देऊन मैत्री परिवार आणि कॅगच्या सेवाकार्याची प्रशंसा केली. मैत्री परिवाराचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे प्रा. प्रमोद पेंडके, कॅगचे विवेक रानडे, श्रीपाद इंदोलीकर यांच्याशी चर्चा केली. मैत्री परिवार या महासंकटसमयी करीत असलेल्या कार्याला तोड नाही. भविष्यात जर गरज पडली तर नागपूर महानगरपालिका पुन्हा काही संसाधने उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी तेथील स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढविला. यावेळी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिलिंद मेश्राम उपस्थित होते. बंडू भगत, अमन रघुवंशी, रोहित हिमते, माधुरी यावलकर, मनीषा गाडगे, मृणालिनी पाठक, दिलीप ठाकरे, किरण संगावार, सुचित सिंघानिया, नितीन पटवर्धन आदी मैत्री परिवाराच्या माध्यमातून या सेवेसाठी अथक परिश्रम घेत आहेत.

ज्येष्ठ निराधारांसाठी विशेष सेवा
मैत्री परिवार अन्नदानासोबतच शहरातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सेवा पुरवित आहे. भोजनाची मागणी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ९११९५६७६७२ आणि निराधार ज्येष्ठांच्या मदतीसाठी ८६००५९०६२० हे दोन क्रमांक संस्थेने जाहीर केले आहे. निराधार वृद्धांना कुठलीही मदत हवी असल्यास त्यांनी संबंधित क्रमांकावर फोन केल्यास मैत्री परिवार त्यांना मदत पोहचवेल. दरम्यान मैत्री परिवाराने त्यांना आलेल्या कॉलच्या आधारावर बुटीबोरीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला औषधी पोहचविली होती.

खबरदारी तुमची, जबाबदारी आमची…! मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे भावनिक आवाहन

नागपूर शहरामध्ये कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढतेच आहे. किमान आतातरी लॉकडाऊनदरम्यान घराच्या बाहेर पडू नका. नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन जनतेची काळजी घेते आहे. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, या शब्दात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भावनिक आवाहन करीत लोकांना सहकार्य करण्यासाठी साद दिली.
रविवारी (ता.१२) शहरात १४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून नागरिकांना गांभीर्य सांगितले आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले.
रविवारी आढळलल्या १४ रुग्णांमध्ये चार जबलपूरचे, एक कामठी येथील आणि उर्वरित ९ नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने आपणा सर्वांना आता आणखी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
यासंबंधी माहिती देताना मनपा आयुक्तांनी सांगितले की, सर्व १४ ही रुग्णांना यापूर्वीच ‘क्वारंटाईन’ करण्यात आले होते. त्यांची चाचणी घेतल्यानंतर रविवारी ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी पूर्वीच क्वारंटाईन केल्यामुळे त्यांच्यापासून इतरत्र कोरोना पसरण्याची भीती नाही. दिल्ली येथून प्राप्त माहितीच्या आधारे २५१ व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात आलले ३० अशा एकूण २८१ व्यक्तींना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले होते. दिल्ली येथून आलेल्यांमध्ये ८ जण मूळचे जबलपूरचे आहेत. या आठ जणांपैकी चौघे कोरोनाग्रस्त असल्याने निष्पन्न झाले आहे.
कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला परिसर खबरदारीच्या दृष्टीने सील करण्यात येतो. त्यानुसार सदर रुग्ण राहत असलेला सतरंजीपुरा, मोमीनपुरा परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे. तर काही रुग्ण काटोल रोड व कामठी रोड भागातील असून तो परिसरही सील करण्यात येत आहे. संसर्ग पसरू नये यासाठी मनपातर्फे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी मनपाने टीम निर्धारित केल्या असून १४ दिवस मनपाची चमू निर्धारित परिसर, तेथील घरे आणि लोकसंख्या या सर्वांची माहिती घेऊन सर्वेक्षण करणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी सर्वेक्षण करणा-या चमूला व मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

दक्ष राहा, लक्षणे आढळल्यास त्वरित मनपाला माहिती द्या
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची वाढती संख्या ही नागपूरकरांसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला अधिक जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या ३० लाख लोकांचे आरोग्य आपल्याच हातात आहे. त्यामुळे या ३० लाख लोकांनाच आता ठरवायचे आहे की कोरोनाशी लढा कसा द्यायचा. संक्रमण वाढत आहे, दक्ष राहा. अशा स्थितीत घराबाहेर न पडणे जास्त संयुक्तिक आहे. जीवनावश्यक वस्तू शक्यतो फोनवरूनच घरी मागवा. बाहेर जाण्याची गरज पडल्यास मास्क वापरा, सोशल डिस्टंनसिंगचे पालन करा. कुणाच्या संपर्कात आल्यास, ताप, सर्दी, कोरडा खोकला येत असेल तर त्वरित मनपाच्या नियंत्रण कक्षाला माहिती द्या. वेळेत उपचार झाल्यास कोरोनापासून लवकर बरे होता येईल. त्यामुळे सजग राहा, निमयांचे पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा, असेही आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

नदी स्वच्छतेसोबतच नाला स्वच्छतेलाही सुरुवात

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पुढाकार : २२७ नाल्यांचा समावेश शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदीचे स्वच्छता अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. या नद्यांच्या स्वच्छतेसोबतच शहरातील दहा झोन अंतर्गत येणाऱ्या सुमारे २२७ नाल्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रारंभ होत आहे. त्यापैकी पाच झोनमधील १३३ नाल्यांच्या स्वच्छतेला प्रथम एप्रिल महिन्यात सुरुवात झाली आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून ३१ मेपर्यंत शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

नागपूर शहरातील दहाही झोनअंतर्गत २२७ नाले आहेत. यातील बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे. यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आणि त्यानुसार निर्देश देत स्वच्छतेच्या कामालाही सुरुवात झाली आहे.
नाला सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे होत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन सुरू असून नागरिक घरातच आहेत. लॉकडाऊननंतर जेव्हा नागरिक घराबाहेर पडतील तेव्हा नाला स्वच्छतेचे सुंदर चित्र त्यांना बघायला मिळेल, असा आशावाद आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.
सध्या धरमपेठ, हनुमाननगर, नेहरू नगर, गांधीबाग आणि आशीनगर या पाच झोनअंतर्गत असलेल्या १३३ नाल्यांमध्ये पाच पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोन टन क्षमतेची एक, चार टन क्षमतेची एक, आठ टन क्षमतेच्या दोन आणि ११ टन क्षमतेची एक मशीन कार्यरत आहे. यापूर्वी मे महिन्यात सुरू होणारी नाला सफाई यावर्षी एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आली असून ३१ मे रोजी शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि स्वच्छता विभागाच्या समन्वयातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात येत आहे.
नाला स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी झोनचे मुख्य स्वच्छता अधिकारी, वॉर्डचे स्वच्छता निरिक्षक, वॉर्डचे कनिष्ठ अभियंता आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाकडे सोपविण्यात आली आहे. नाला स्वच्छतेदरम्यान निघणारा गाळ हा परिसरातील सखल भागात टाकण्यात येणार आहे.

१० झोनमध्ये २२७ नाले
नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील १० झोनमध्ये २२७ नाले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये २२. धरमपेठ झोनमध्ये ३५, हनुमाननगर झोनमध्ये १४, धंतोली झोनमध्ये १४, नेहरु नगर झोनमध्ये १५, गांधीबाग झोनमध्ये ५१, सतरंजीपुरा झोनमध्ये २२, लकडगंज झोनमध्ये सात, आशीनगर झोनमध्ये १८ आणि मंगळवारी झोनमध्ये २९ नाले आहेत. यापैकी ७१ नाल्यांची पोकलेनद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे. अन्य नाले जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरीत नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येईल.

१० ‘फिवर क्लिनिक’ सुरू मनपा आयुक्तांचा पुढाकार,नि:शुल्क तपासणी

नागपूर: वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकल्याने अनेक जण त्रस्त आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी लक्षणे दिसल्याने आधीच धडकी भरते. अशा किरकोळ स्वरूपाच्या आजारांच्या तपासणीकरीता व त्यावरील उपचाराकरीता मनपातर्फे प्रत्येक झोनमध्ये एक याप्रमाणे संपूर्ण शहरात १० ‘फिवर क्लिनिक’ सुरू केले आहेत. संबंधित झोनमधील मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे ‘फिवर क्लिनिक’ सुरू झाले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धरमपेठ झोनमधील के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमान नगर झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धंतोली झोनमधील नरसाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नेहरूनगर झोनमधील नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीबाग झोनमधील मोमीनपूरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सतरंजीपुरा झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, लकडगंज झोनमधील पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आसीनगर झोनमधील कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगळवारी झोनमधील इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘फिवर क्लिनिक’ नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहेत.

वातावरणातील बदल आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यामुळे अनेकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. या गोष्टीची दखल घेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे दहाही झोनमध्ये १० ‘फिवर क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. या ‘फिवर क्लिनिक’ मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे नि:शुल्क तपासणी व उपचार केले जाणार आहे.

याव्यतिरिक्त ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयामध्ये तपासणी करायची असेल त्यांना मनपाद्वारे नोंदणीकृत खासगी रुग्णालय व हॉस्पिटलमध्ये जाउन तपासणी करता येईल. यासंबंधी मनपाद्वारे सर्व खासगी रुग्णालय तथा हॉस्पिटलना सेवा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.

‘फिवर क्लिनिक’ सुरू करण्यात आलेले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र

अ.क्र. झोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
लक्ष्मीनगर जयताळा
धरमपेठ के.टी. नगर
हनुमाननगर नरसाळा
धंतोली बाबुलखेडा
नेहरूनगर नंदनवन
गांधीबाग मोमीनपूरा
सतरंजीपुरा जागनाथ बुधवारी
लकडगंज पारडी
आसीनगर कपील नगर
१० मंगळवारी इंदोरा

या ‘फिवर क्लिनिक’मध्ये एक एमबीबीएस डॉक्टर, एक परिचारिका, फॉर्मसिस्ट, पॅथॉलॉजिस्ट सेवा देतील. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेमध्ये नागरिकांना नि:शुल्क सेवा देण्यात येईल. ‘फिवर क्लिनिक’मध्ये रुग्णावर आवश्यक उपचार केले जाईल. आवश्यकता असल्यास त्याच्या रक्ताचे नमूने घेतले जातील, आवश्यक औषधेही देण्यात येतील. याशिवाय तिव्र स्वरूपाचे ताप व अन्य लक्षणे दिसून आल्यास तातडीने त्याला पुढील तपासणीकरीता पाठविण्यात येईल.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन : मास्क वापरणे आता बंधनकारक

नागपूर: कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वत:चे योद्धा बना. स्वत:ला त्रास करवून घेऊ नका. इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क वापरा. सामाजिक अंतर पाळा. घरात प्रवेश करताना हात स्वच्छ धुवा. प्रत्येकाने कोरोनाविरुद्धची लढाई स्वत: योद्धा बनून लढायची आहे, असे भावनिक आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

मास्क वापरणे आता बंधनकारक

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी (ता. ८) एक आदेश काढून घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आता बंधनकारक केले आहे. या आदेशानुसार शहरातील रस्ते, रुग्णालये, कार्यालये, बाजार इत्यादी सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही हेतूने वावरणाऱ्या व्यक्तीने, खासगी किंवा कार्यालयीन वाहनाने कुठेही वावरताना तसेच कार्यालय अथवा कामांच्या ठिकाणावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. कोणत्याही व्यक्ती, अधिकाऱ्यांनी मास्क परिधान केल्याशिवाय सभा, बैठकीला उपस्थित राहू नये. प्रमाणित मास्क औषधींच्या दुकानात उपलब्ध असून ते वापरता येतील किंवा घरी बनविलेले मास्कसुद्धा वापरता येतील. व्यवस्थित धुवून आणि निर्जंतुकीकरण केलेले मास्कदेखिल वापरता येतील, असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाचे पालन न झाल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये नागरिक कारवाईस पात्र ठरतील, असेही आदेशात म्हटले आहे. मास्क घरच्या घरी देखील सुती कापडापासून तयार करता येईल. घरच्या घरी मास्क तयार करण्याची कृती ‘मास्क इंडिया डॉट कॉम’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

नागपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रसार रोखणे, हे केवळ नागरिकांच्या हाती आहे, असे सांगताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना शासनाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. समाजाने एकत्रित येऊन ही लढाई लढणे गरजेचे आहे. प्रत्येकाने योद्धा बनणे गरजेचे आहे. योद्धा बनणे म्हणजे लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करणे होय. अत्यंत आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे. घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक आहे. आवश्यक कामाने घराबाहेर पडलाच तर लवकरात लवकर घरात यावे. घरात प्रवेश करताना साबणाने हात स्वच्छ धुवावे. हे करणे म्हणजेच योद्धा होय. हे केलं नाही म्हणजे समाजाचे शत्रू बनणे होय. त्यामुळे समाजाचा शत्रू न बनता स्वत:चा आणि समाजाचा योद्धा बना, असे आवाहन त्यांनी समस्त नागपूरकरांना केले आहे.

घरीच राहा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन नागपुरातील परिस्थितीला गांभीर्याने घ्या;

नागपूर: नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून एकाचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी शासनाने दिलेले निर्देश पाळावे. घरात राहावे, सुरक्षित राहावे असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागपूर महानगरपालिका आवश्यक ती सर्व काळजी घेत आहे. कोव्हिड-१९ चे पॉझिटिव्ह असलेले रुग्ण ज्या परिसरात राहतात, त्या परिसरात राहणाऱ्या कुण्या व्यक्तीला जर बाधा झाली असेल तर ते तातडीने समोर यावे, त्यांच्यामुळे इतरांमध्ये हा विषाणू पसरु नये, यासाठी ही काळजी घेत जात असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. याअंतर्गत लक्ष्मीनगर झोनमध्ये १८५ चमू, धंतोली झोनमध्ये दोन चमू, गांधीबाग झोनमध्ये ३५ चमू आणि मंगळवारी झोनमध्ये २३ चमूंच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरु आहे. लक्ष्मीनगर झोनमधील २७४६३ घरांतील १०६७१९ नागरिक, धंतोली झोनमधील ५९ घरातील २७८ नागरिक, गांधीबाग झोनमधील १४९७ घरातील ७७३८ नागरिक आणि मंगळवारी झोनमधील २१४९ घरांतील ९३१४ नागरिकांची या चमूंच्या माध्यमातून दररोज माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे नागपुरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला हे धक्कादायक आहे. त्यामुळे समूह संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. जीवनावश्यक सर्व वस्तू मुबलक आहे. भाजीपाला, किराणा, दुध यासारख्या सेवा घरपोच मिळतील याबाबत व्यवस्था मनपाने काही व्यवसायीक व शेतकरी बचतगटाच्या माध्यमातुन केली आहे. किमान पुढील काही दिवस स्वत:वर बंधन घालणे आवश्यक आहे. यासोबतच वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर हात स्वच्छ करण्यासाठी करावा, बाहेर निघताना मास्क लावावे, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

शहरात १७ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण

याव्यतिरिक्त दहाही झोनमध्ये ३३३ चमूंच्या माध्यमातून संपूर्ण नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे. एकूण लोकसंख्येपैकी आतापर्यंत १७६१२८५ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एकूण ४३७१९१ घरांचे सर्व्हेक्षण झाले असून दररोज सुमारे २८३९३ घरांचे सर्वेक्षण होत आहे. याव्यतिरिक्त प्रभागनिहाय ‘रॅपिड रिस्पान्स टीम’ तयार करण्यात आली असून आलेल्या माहितीच्या आधारे तातडीने संबंधित ठिकाणी पोहचून नागरिकांची तपासणी केली जाते. संपूर्ण शहरात दहाही झोन मिळून असे ३८ पथक आहे. आतापर्यंत १५३८ घरांना रॅपिड रिस्पान्स टीमने भेट दिली आहे.

८६८ पैकी ७७८ निगेटिव्ह

नागपुरात कोरोनाचे संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. आतापर्यत १२०२ नागरिकांत कोरोनाची लक्षणे आढळली. त्यापैकी १११६ व्यक्ती देखरेखीखाली आहेत. यापैकी ५९५ जणांचा १४ दिवसांचा देखरेखीचा कालावधी पूर्ण झाला आहे. ८६८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी १८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी (ता.७) पॉझिटिव्ह आढळलेला १ रुग्ण चंद्रपुरातील होता. त्यामुळे नागपुरात सद्यस्थितीत १८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे. ७७८ नमुने निगेटिव्ह आली असून ७१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. ७८१ व्यक्तींना घरी पाठविण्यात आले असून ८५ व्यक्तींवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Exit mobile version