मनपाच्या चमू अविरत करीत आहे गरजूंना अन्नदानाचे कार्य

दिव्यांग नागरिकांना रेशनचा पुरवठा : सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान गरजू व्यक्तींना दोनवेळच्या भोजनाचा पुरवठा तसेच दिव्यांग नागरिकांना रेशनचा पुरवठा व निराधार ज्येष्ठ नागरिकांना भोजन देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिका सेवाभावी संस्था आणि सामाजिका कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अविरत करीत आहेत.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात शहरातील प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत ही सेवा पोहचत आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापित, कामगार, परराज्यातील अडकेलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्न, पाणी, वैद्यकीय देखभाल आणि त्यांना इतर सुविधा देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने नागपूर शहरात असे १७२ निवारागृह उभारण्यात आले आहेत. त्याची क्षमता ६८०६ इतकी आहे. आजघडीला या निवारागृहात ५५९५ नागरिक वास्तव्यास असून दररोज ही संख्या वाढत आहे. ह्या संपूर्ण नागरिकांना दोन वेळचे भोजन पुरविण्यासाठी मनपाने २६केंद्रीय स्वयंपाकघराची व्यवस्था केली आहे. निवारागृहात असलेल्या आणि झोपडपट्यामधील गरजू व्यक्तींनाही या स्वयंपाकघराच्या माध्यमातून अन्न पुरविण्याचे कार्य मनपाच्या चमू दिवसरात्र करीत आहे. ४ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५५६, झोपडपट्ट्यातील ९९०५ असे एकूण १५४६१ नागरिकांना अन्न पुरवठा करण्यात आला. ५ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५७८ आणि झोपडपट्टीतील ११४३६ अशा एकूण १७०१४ नागरिकांना आणि ६ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५९५ आणि झोपडपट्टीतील १५९४७ अशा एकूण २१५४२ नागरिकांना दोन वेळचे भोजन पुरविण्यात आले.

दिव्यांगांना रेशन तर निराधार ज्येष्ठांना भोजन व्यवस्था
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून चार दिवसांपूर्वी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही मदतीसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली. यामाध्यमातून आतापर्यंत ४० दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्तींनी मदत मागितली असून मनपाच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांपर्यंत रेशन कीट पोहचविण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य २२०० कुटुंबांनाही रेशन किट पुरविण्यात आली आहे. रेशन किट मध्ये गव्हाचे पीठ (५ कि.ग्रॅ.), तांदूळ (२.५ कि.ग्रॅ.), डाळ (१.२५ कि.ग्रॅ.), मिरची पावडर (२५० ग्रॅम), हळद पावडर (१२५ ग्रॅम), मसाला (२५० ग्रॅम), मीठ (२५० ग्रॅम), खाद्य तेल (१ कि.ग्रॅ.), कांदे (२ कि.ग्रॅ.), आलू (२ कि.ग्रॅ.) या वस्तूंचा समावेश असून प्रत्येक कुटुंबाला सात दिवस पुरेल इतकी ही व्यवस्था आहे. तसेच निराधार ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन दोन वेळचे स्वादिष्ट भोजन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

सामाजिक संस्थांनी दिले दान
लॉकडाऊनदरम्यान गरजूंना मदत व्हावी यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढे येऊन दान दिले आहे. आतापर्यंत रोटरी क्लब, पॉवर ऑफ वन वेलफेअर फाऊंडेशन, मे. एस. एस. कुळकर्णी ॲण्ड असोशिएटस्‌, मे. कृष्णा ट्रेडिंग कंपनी, लॉयन्स क्लब यांच्या माध्यमातून ११४०० कि.ग्रॅ. गव्हाचे पीठ, ११२०० कि.ग्रॅ. तांदूळ, ५६०० कि.ग्रॅ. डाळ, ३३३० कि.ग्रॅ. तेल, ५५२० कि.ग्रॅ. मीठ, ९००० नग साबण, १०८.३ कि.ग्रॅ. हळद, ११८.३ कि.ग्रॅ. मिरची पावडर, २० कि.ग्रॅ. मसाला, १११०० कि.ग्रॅ. कांदे आणि १११०० कि.ग्रॅ. आलू नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. मॉईलने १० लाख रुपये दिले असून १५०० अन्न पॅकेट दररोज वितरीत करीत आहेत. विजय ढवंगळे आणि अजय ढवंगळे यांनी १० लाख रुपये आणि श्री रमण यांनी १२५०० रुपये दान दिले आहेत. मे. इस्कॉन, अन्न अमृत फाऊंडेशन, प्रियदर्शिनी बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, संस्कार बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, शगून महात्मा औद्योगिक सहकारी संस्था, नागपूर महिला सहकारी सनसञथा, मैत्री परिवार आदींच्या माध्यमातून अन्न तयार केले जात आहे.

मुलाच्या मदतीसाठी परदेशातील महिलेचा ई-मेल
लॉकडाऊनमध्ये नागपुरात अडकलेल्या एका परदेशातील विद्यार्थ्याच्या आईचा ई-मेल नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाला. त्या मेलमध्ये मोबाईल क्र. किंवा सविस्तर पत्ता नव्हता. केवळ संबंधित विद्यार्थी हजारी पहाड परिसरात राहतो, असा उल्लेख होता. केवळ या माहितीच्या आधारे मनपाच्या चमूने ग्रो व्हिल फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा पत्ता शोधून काढला आणि त्याला आवश्यक ते सामान पोहचविले. असेच एक उदाहरण वृद्ध महिला व तिच्या नातवांचे आहे. नातवांसोबत राहणाऱ्या या वृद्ध महिलेच्या नातवांनीही मदतीसाठी आर्जव केली. त्यांनाही दिवसरात्र भोजन पुरविण्याचे कार्य मैत्री परिवार संस्थेच्या माध्यमातून मनपा करीत आहे.

गुगल शीटच्या माध्यमातून संनियंत्रण
नागपूर शहरातील एक नागरिक शोबीत चांडक यांनी नागपूर महानगरपालिकेच्या या सेवाभावी कार्यात स्वत:चेही योगदान दिले आहे. मनपाची मदत योग्य ठिकाणी पोहचते की नाही याचे मॉनिटरींग करण्यासाठी त्यांनी एक गुगल शीट मनपा अधिकाऱ्यांना तयार करून दिली. कलर कोडच्या माध्यमातून झोननिहाय त्यात माहिती अपडेट केली जाते. दररोज येणारी मागणी आणि होणारा पुरवठा याबाबत यात अपडेट होत असून जर गरजूला मदत मिळाली नाही तर लगेच ते नोडल अधिकारी तथा उपायुक्त मिलिंद मेश्राम यांना माहिती होते. मग तातडीने संपर्क करुन त्यांना मदत पोहचविली जाते.

दान आणि मदतीसाठी करावा संपर्क
नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येणारे सेवाकार्य समाजसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून सुरू आहे. ज्यांना या सेवाकार्यात दान द्यायचे आहे अथवा ज्या गरजूंना मदत हवी आहे त्यांनी ०७१२-२५३९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२, ९८२३३३०९३४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

जीवनावश्यक वस्तुंचा नागरिकांना सुरळीत पुरवठा व्हावा

‘कोराना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान नागरिकांची फरफट होता कामा नये. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी व्यापारी संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा. काळाबाजार होता कामा नये. तसे लक्षात आल्यास व्यापारी संघटनांनीच अशा व्यापाऱ्यांवर स्वत:हून कारवाई करावी, असे आवाहन करीत प्रशासनातर्फेही अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, त्यात कुठलाही खंड पडू नये, घरपोच सेवेला प्राधान्य मिळावे, यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विविध व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, कोरोनाचे संकट देशावर आले आहे. नागपुरातही त्याची व्याप्ती आहे. त्यामुळे पुढील कालावधी विचारात घेऊन नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांवर आहे. या काळात नागरिकांची पिळवणूक होता कामा नये. यावर आता व्यापाऱ्यांनीच अंकुश आणायला हवा व सामाजिक बांधिलकी जपावी.
व्यापाऱ्यांना जर वितरण , उत्पादन आणि वाहतूकसंदर्भात काही अडचणी असेल तर त्या प्रशासनाला नक्की सांगाव्या. ऑनलाईन लिंक देऊन घरपोच सेवा देता येईल का, याचा व्यापाऱ्यांनी अवश्य विचार करावा. नागरिकांना भाजीबाजारात जायची गरज पडू नये, अशी व्यवस्था मनपाने केली. घरपोच किंवा घरासमोर भाजीपाला नागरिकांना मिळतो आहे, त्यादृष्टीने अन्य व्यापाऱ्यांनीही विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
व्यापारी प्रतिनिधींनीही आपली भूमिका यावेळी मांडली. सध्या मागणी कमी आहे. परंतु पुढील काही महिने पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. फक्त सध्या बाजारात कमी प्रतीचा गहू उपलब्ध आहे. चांगल्या प्रतीचा गहू मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये आहे. वाहतूक नियमित झाल्यास तेथून तो गहू उपलब्ध होऊ शकेल. व्यापारी त्यांच्या सेवा देत आहेत. माल आला तरी ते उतरविण्यासाठी मजूर मिळत नाही, अशा अडचणी त्यांनी मांडल्या.
यावर बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला प्रतिबंध नाही. चांगला गहू जेथून मागवायचा आहे तेथून मागवा. काही अडचण आली तर तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यावर मार्ग काढण्यात येईल. व्यापाऱ्यांनी व्यापार करताना स्वत:चेही आरोग्य जपावे व इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी वाहतूक परवानगीसंदर्भात माहिती दिली. प्रादेशिक परिवहन कायारलयात २४ बाय ७ नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. ०७१२-२५६१६९८ असा तेथील क्रमांक आहे. यासोबतच ८१०८६८३९१९ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. वाहनाची पास ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करता येईल. त्यासाठी mh31@mahatranscom.in यावर अथवा https://transport.maharashtra.gov.in या वेबलिंकवर जाऊन अर्ज करता येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी दिली.
बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चं.भा. पवार, प्रभारी सह आयुक्त (औषधे) प्र. ना. शेंडे, प्रभारी सहायक आयुक्त अभय देशपांडे, सहायक कामगार आयुक्त एन.पी. मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव प्रशांत नेरकर, होलसेल ग्रेन ॲण्ड सीडस्‌ मर्चंट असोशिएशनचे अध्यक्ष संतोषकुमार अग्रवाल, सचिव प्रताप मोटवानी, नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे राजेंद्र कावडकर,वीरभान केवलरामानी, महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे श्रीकांत दुबे, नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे ज्ञानेश्वर रक्षक, नागपूर कन्फेक्शनरी बेकरी व नमकीन असोशिएनशचे प्रदीप धमकानी, बेकरी असोशिएशनचे विजय ग्वालानी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मनपा आयुक्तांनी वाढविले आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची घेतली भेट : काळजी घेण्याचा दिला प्रेमळ सल्ला

नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (ता. ६) घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविले. ३० लाख नागपूरकरांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:चीही काळजी घ्या, असा प्रेमळ सल्ला देत सर्व कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची ही भेट आकस्मिक होती. कोरोनाविरुद्धचा लढा लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्या हेतूने त्यांनी सर्व्हेक्षणाला निघण्याच्या वेळेवर आयसोलेशन हॉस्पीटलमध्ये पोहोचून त्यांच्याशी संवाद साधला. समोर अचानक आयुक्त तुकाराम मुंढे यांना बघून तेथे उपस्थित आणि सर्वेक्षणाला निघण्याच्या हेतूने बसमध्ये बसलेले सारेच कर्मचारी अवाक् झाले. विशेष म्हणजे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: बसमध्ये चढून सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या कामाचे कौतुक करीत सर्वांशी हितगूज साधले. आपल्याला आपला जीव धोक्यात घालून कार्य करावे लागत आहे. त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायला हवी, असे म्हणत एका सीटवर एकाच महिलेने बसण्यास सांगत निर्देशाचे पालन करण्यास सांगितले. सगळयांना कोविड-१९ च्या गाइडलाइन्स प्रमाणे सर्वेक्षण मध्ये माहिती गोळा करण्याचा सल्ला देत आयुक्त म्हणाले कि नागपूरकरांची आशा तुमच्यावर आहे. आपल्या सगळयांना मिळून कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचे आहे.

यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इतर भागाचाही दौरा केला. यात त्यांना जेथे-जेथे लोकं एकत्र गर्दी करून दिसलीत तेथे गाडीतून उतरून त्यांना ‘सोशल डिस्टंसिंग’चे धडे दिले. ‘कोरोना’ला हरविण्यासाठी, साखळी तोडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगत लॉकडाऊनदरम्यान घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन केले.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकाळीच शहर पालथे घातले. मानेवाडा परिसरात एका रेशन दुकानासमोर धान्य घेण्यासाठी गर्दी असल्याचे दिसले. तेथे सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे लक्षात येताच ते स्वत: तेथे पोहोचले. सर्वांना तीन-तीन फुटाच्या अंतरावर उभे करून सामाजिक अंतराचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन केले. राशन दुकानदाराला तातडीने दुकानासमोर तीन-तीन फुटावर खुणा करण्यास सांगितले.

अनेकांना आश्चर्याचा धक्का

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनपा आयुक्त मुंढे स्वत: शहरात फिरत असल्याचे बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले. गर्दी असलेल्या ठिकाणी गाडी थांबल्याचे बघताच आणि त्यातून येणारा व्यक्ती दुकानाकडे येत असल्याचे बघून अनेकांना सुरुवातीला काही कळलेच नाही. मात्र, दुकानात पोहोचल्यावर ते मनपा आयुक्त तुकाराम मुंढे असल्याचे लक्षात येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका !

जीवनावश्यक वस्तू तसेच अन्य अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरूनच जावे. मास्क लावल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

यासंबंधी एक व्हीडिओ संदेश आयुक्तांनी जारी केला आहे. यामध्ये मनपा आयुक्तांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना १०० टक्के लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे. केवळ लॉकडाऊनचे पालन केल्यानेच आपण या संक्रमणापासून स्वत:चा बचाव करू शकतो.
जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये म्हणून प्रशासनाने या वस्तू घरपोच मिळण्याचा प्रयत्न केला आहे. तथापी नागरिकांना या वस्तुंसाठी किंवा अन्य अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास त्यांनी मास्क लावूनच बाहेर निघावे. वापरण्यात येणारा मास्क हा विकतच घेतला पाहिजे असे नाही. तर हा मास्क आपल्याला घरच्या घरी देखील सुती कापडापासून तयार करता येईल. घरच्या घरी मास्क तयार करण्याची कृती ‘मास्क इंडिया डॉट कॉम’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

मनपातर्फे दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण केले जात आहे. सोमवारी (ता.६) डिप्टी सिग्नल बाजार चौक परिसरातील दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात मनपातर्फे शहरातील बेघर, निराधार व्यक्तींची भोजन व्यवस्था केली जात आहे.

मनपाच्या कार्यामध्ये ४४ स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य प्रदान केले आहे. या सेवाकार्यांतर्गत दिव्यांग बांधवांना तांदुळ, डाळ, खाद्य तेल, भाजीपाला यासह अन्य जीवनावश्यक वस्तुंचा समावेश असलेल्या किटचे वितरण करण्यात येत आहे. या किटच्या वितरणासाठी शैलेंद्र भोसले, रमेश उमाठे, विमल मारोटीया, अशोक बंब (जैन) या समाजसेवींनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी (ता.६) उपायुक्त मिलींद मेश्राम, सहायक अधीक्षक संजय दहीकर यांच्या उपस्थितीत या किटचे वितरण करण्यात आले.
लॉकडाउनच्या परिस्थितीत नागरिकांच्या सहकार्यासाठी आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात मनपाची संपूर्ण टिम कार्यरत आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीत दिव्यांगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी त्यांची होणारी धडपड लक्षात घेता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या मदतीकरिता संबंधित अधिका-यांना निर्देशित केले. त्यानुसार शहरातील विविध भागातील दिव्यांगांना घरपोच जीवनावश्यक वस्तू वितरीत करण्यात येत आहेत. या कार्यासाठी अनेक सेवाभावी नागरिकही सढळ हाताने मदत करीत आहेत.

दररोज सुमारे ३५ हजार नागरिकांची भोजन व्यवस्था
लॉकडाउनमध्ये अडकलेले बेघर, निराधार व ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा नागरिकांसाठीही मदतकार्य सुरू आहे. या सेवाकार्याद्वारे आतापर्यंत दररोज सुमारे ३५ हजार लाभार्थ्यांची भोजन व्यवस्था केली जात आहे. यासाठी शहरातील ४४ स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. मनपाद्वारे दहाही झोनमध्ये सकाळ व सायंकाळी भोजनाची व्यवस्था केली जाते. यासाठी प्रत्येक झोन क्षेत्रामध्ये दोन याप्रमाणे २० टिम तयार करण्यात आल्या आहेत. या टिम सकाळी व सायंकाळी नागरिकांना जेवण किंवा आवश्यक भोजन साहित्य पुरवितात. निराधार, बेघर व ज्यांच्याकडे जेवणाची सुविधा नाही अशा व्यक्तींकरीता मनपाद्वारे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ०७१२-२५६९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२, ९८२३३३०९३४ या संपर्क क्रमांकांवर अशा व्यक्तींची माहिती मिळताच त्या व्यक्तीबाबत संबंधित झोन क्षेत्राची जबाबदारी देण्यात आलेल्या टिमला त्या व्यक्तीची माहिती व त्याचा संपर्क क्रमांक कळविण्यात येते. त्यानुसार संबंधित टिम गरजू व्यक्तीपर्यंत जेवण किंवा साहित्य पोहोचविते.

ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदारांना मैत्री परिवाराची साथ
याशिवाय ज्येष्ठ नागरिक, शहरात अडकलेले विद्यार्थी, नोकरदार आदींकडून संपर्क होताच त्यांना जेवणाचा डबा पोहोचविण्यात येत आहे. याकरिता मैत्री परिवार संस्था कार्य करीत आहे. घरी एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांच्या जेवणाची अडचण होते. शिक्षणासाठी शहरात येणा-या विद्यार्थ्यांना मेसच्या जेवणावर अवलंबून राहावे लागते. मात्र लॉकडाउनमुळे सर्व मेस बंद आहेत. त्यामुळे शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अशीच अवस्था शहरात एकटे राहणा-या नोकरदारांचीही आहे. या सर्वांकरिता मैत्री परिवार संस्था पुढे आली आहे. स्वयंपाकाची व्यवस्था नसलेल्या ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, एकटे राहणा-या नोकरदारांना मैत्री परिवार संस्थेतर्फे दररोज सकाळी व सायंकाळी जेवणाचा डबा पुरविण्यात येत आहे. शहरात अडकलेल्या अशा गरजूंनी ९८९०४३२४५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
बेघर, निराधार, रस्त्यावर जीवन व्यतित करणा-यांसाठी मनपातर्फे बेघर निवारा केंद्रांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींची माहिती मिळताच मनपाशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

NMC says there are no onions and potatoes on temporary vegetable markets

Nagpur: Believe it or not, the Nagpur Municipal Corporation (NMC), which has developed temporary 24 open-air vegetable markets throughout the city to support people during the lockdown, has prohibited the selling of potatoes and onions in those markets.

Citizens visiting the markets were surprised not to find potatoes or onions. The two are the most important vegetables primarily because of their flexibility and long shelf life. One can not believe that cooking without onions and potatoes was the general reaction of the buyers. Archana Raut, a resident of Reshimbagh, said that NMC had done a great job of setting up a vegetable market in Reshimbagh. “But I am not persuaded that their decision not to allow the selling of potatoes and onions is the right one,” she said. The decision would negate the lockout, as people will have to make another trip or visit another place to buy potatoes and onions, said Dinesh Palange, another local resident.

Kishan Balpande, a wholesaler of onions and potatoes, said he had been in the queue since 10 am to enter the Reshimbagh property. “The NMC officials told me that I would not be allowed there in the evening,” Balpande said.

While Municipal Commissioner Tukaram Mundhe was not available for comment, a senior NMC official explained the decision of the Civic Chief to help farmers sell new, perishable goods. He said that potatoes and onions were available in other markets such as Budhwari Bazaar, Itwari, Gokulpeth, Mangalwari etc. Chetan Bhagwan Kewte, a farmer from Dighori, expressed dismay at NMC’s decision to limit the entry of vegetable growers to Reshimbagh soil to only 60. Kewte said that, since most of the farmers supplying vegetables to the city come from the southern part of the district, they prefer the Reshimbagh soil.

The NMC official said that entry was limited to all 24 vegetable markets. NMC allocates tokens to farmers to do business in designated markets throughout the city, he said, adding that a decision had been taken to streamline the operation of all 24 markets in the area.

NMC-OCW unsung water warriors stay at work to provide safe water at your taps

City Lockdown:  Unsung Water Warriors

Nagpur, Apr 01, 2020: –  Despite coronavirus scare across the city, there are many unsung warriors who are ensuring we stay indoors without any problem. They are the everyday unsung water warriors from Nagpur Municipal Corporation (NMC) and Orange City Water (OCW) who are working hard for 24xhours to ensure scheduled water supply to Nagpurians as well as entering in field resolving any complaints on priority.

Recently, a major leakage on 600 mm dia main distribution line near Shani Mandir, Loha Pool was plugged and water supply restored in many localities of Central Nagpur by such warriors before the scheduled time of emergency shutdown.

Further despite Corona threat, NMC OCW zonal teams are resolving on an average 100 complaints (pending and fresh) on a daily basis using all safety materials.

One of the valve man from Laxmi Nagar zone, who operates a valve from 4am to 12 noon at various places, said, “I ensure that I stay fit and fine so that I continue to play the vital role of supplying water to all Nagpurians. We took it as our moral responsibility to serve the society”

“Our responsibilities have increased as compared to normal working days. Even our seniors also encourage field teams especially supervisors and valve men by visiting at supply hours especially in the early morning or late night.

Amid coronavirus scare, we started feeling proud that we are real field soldiers who are supplying drinking water at Nagpur’s every tap,” he said when TOI spotted him operating a valve by wearing safety gear like a mask. He also carried a pass which mentioned that he is part of discharging essential services.

“Valve men play a vital role in the water supply system. Their day starts at 4 am and continues till midnight as they operate around 182 valves across the city for smooth water supply to every household,” said an OCW spokesperson.

Providing water supply to emergency establishments like Government Hospitals and other hospitals without any problem has been on NMC-OCW’s top priority list and NMC-OCW zonal teams are co-ordinating with all such hospitals etc.

Likewise, Rambhaau , a tanker driver from Wanjari Nagar ESR, said, “We feel proud as we supply water to slums wherein there are no taps. We have been provided masks and other safety gears. We visit people’s home during lockdown to supply water so that they stay indoors,” he said as NMC-OCW provides water in many non-network areas through tankers.

The NMC-OCW pressed 293 tankers and all the drivers into service and a similar number of helpers to have been provided with masks to stay safe while providing water through tankers.

Similar precautions are also being taken by 150-odd plant operators deployed at five water treatment plants – Gorewada (Pench-I, II, III), Kanhan WTP and Godhni WTP with safety masks etc.

Even NMC-OCW zonal teams deployed for maintenance and leakage repairing works are working or remaining alert in resolving no-water or polluted water complaints of consumers.

Under the leadership of NMC Municipal Commissioner Mr Tukaram Mundhe, NMC’s SE Shweta Bannarji & OCW CEO Sanjoy Roy appealed that, “We stayed at work to provide clean and safe drinking water at your taps right at your home. You stay at your home with family to keep the city and the nation safe.”

Other heroes include those who monitor the smooth functioning of the main pipeline.  They plug major leakages on pipeline and to clear technical snag at ESRs etc that develop during system operations, said the spokesperson.

Even the NMC-OCW surveillance staff team who takes care of bulk water supply from field too remains on toes. The 100-odd security guards too are playing a vital role to keep all the premises safe and secure.

In a bid to support social distancing as well as lockdown, NMC-OCW has already intensified online payment method. It has appealed to consumers to prefer online payment of water bills.

“Next cycle bills will be delivered on an average basis (no meter reading) and we have also stopped disconnection drive of defaulters,” the official added.

NMC-OCW has thanked and appealed all Nagpurians We stayed at work to provide clean and safe drinking water at your taps right at your home, to resolve your complaints etc. You stay at your home with family to keep the city and the nation safe. For any other information or complaints regarding water supply, you can anytime contact NMC-OCW Toll-Free Number: 1800-266-9899”

NMC-OCW disinfecting ESR’s , WTPs, Office premises by it’s HPSE For a Safe Water

Nagpur, April 5: n a bid to sanitise all of its working premises, Zonal offices, Overhead Water Tanks (ESRs) Water Treatment Plants  Overhead Orange City Water (OCW ) indigenously developed a “High Pressure Sanitizing Equipment” (HPSE). Presently has started to disinfect surface, walls, surroundings, enclosed premises and Vehicles.

When chemical through  HPSE is sprayed on to any surface it disinfects the complete area. The chemical used is diluted  Sodium Hypochlorite(NaOCl) solution which, when is sprayed  as mist in the surrounding is extremely effective against bacteria, viruses and fungi.

A high-pressure pump of 25 Bar pressure fitted with a nozzle jet is used to spray the NaOCl solution.

The compact HPSE system has a Tank containing NaOCl, High-Pressure Jet Pump, a DG set to power the HPSE unit and associated cables and hoses. The compact system is mounted on a mobile vehicle and can be utilized for disinfecting the area as per the requirement.

Presently the essential services working spaces under the scope of Orange City Water Pvt Limited is being sanitized

पिली नदी होईल स्वच्छ व सुंदर

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात युद्धपातळीवर नदीस्वच्छता
‘कोरोना’मुळे शहरात असलेल्या ‘लॉकडाऊन’चा फायदा घेत नदी स्वच्छता अभियानाच्या इतिहासात पहिल्यांदाच मार्च महिन्यात अभियानाला सुरुवात झाली आहे. नदी स्वच्छता अभियानांतर्गत पिली नदीच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर असून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला आहे. लॉकडाऊननंतर घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पिली नदीचा विनाअडथळ्याचा आणि गाळ, कचरामुक्त स्वच्छ व सुंदर प्रवाह अनुभवता येणार आहे.
नदी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाळ काढून नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरणही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांतर्फे कचरा टाकण्यात येतो. मात्र दरवर्षी हा कचरा आणि गाळ काढून संरक्षक भिंतीला लागून ठेवला जायचा. यावर्षी तसे न करता संपूर्ण गाळ आणि कचरा नदीच्या बाहेर काढला जात आहे.
दरवर्षी काढलेला गाळ आणि कचरा नदीच्या संरक्षक भिंतीजवळ ठेवला जात असल्याने तो पावसाळ्यात पुन्हा वाहून नदीतच जायचा. पुन्हा जमा झालेला गाळ आणि कचऱ्यामुळे पाणी वाहून न जाता लगतच्या वस्त्यांमध्ये शिरायचे. मात्र, यावर्षी काढलेला गाळ इतरत्र नेला जात असल्यामुळे पावसाळ्यात हा धोका राहणार नाही, असा विश्वास मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.
यावर्षी नदीतून काढलेला गाळ हा ज्या सखल भागात पाणी साचते तेथे टाकण्यात येत आहे. यासोबतच नागरिकांना त्यांच्या उद्यानात बागकामासाठी आवश्यकता असेल तर हा गाळ उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर नद्यांची स्वच्छता केली जात आहे.

पिली नदीचे तीन स्ट्रेचमध्ये काम प्रगतीपथावर
नदी स्वच्छता अभियानांतर्गत पिली नदी स्वच्छता अभियानाचे कार्य प्रगतीपथावर आहे. पिली नदी चार स्ट्रेचमध्ये विभागण्यात आली आहे. ४.३ कि.मीचा गोरेवाडा ते मानकापूर एसटीपी पहिला स्ट्रेच आहे. मानकापूर एसटीपी ते कामठी रोड हा ५.३ कि.मी.चा दुसरा स्ट्रेच, कामठी रोड ते जुना कामठी रोड नाका हा ३.५ कि.मी.चा तिसरा स्ट्रेच तर जुना कामठी रोड नाका ते पुढे ३.६ कि.मी.चा चौथा स्ट्रेच आहे. पिली नदीची स्वच्छता करण्यात येणारी एकूण लांबी १६.७० कि.मी. इतकी आहे. सध्या पिली नदीच्या तीन स्ट्रेचमध्ये काम प्रगतीपथावर असून मोठ्या प्रमाणात तेथून गाळ उपसण्यात आला आहे. पिली नदी स्वच्छतेसाठी ५ पोकलेन, ३ जेसीबी आणि ६ टिप्पर कार्यरत आहेत. नदी स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. २७ मार्च रोजी कामाचा प्रारंभ झाला. २० दिवसांत नदी स्वच्छता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊन असल्यामुळे शहरातील सर्वच नागरिक घरात आहेत. लॉकडाऊनपूर्वी नागरिकांनी बघितलेली नदी गाळ आणि कचरा असलेली होती. नदीला प्रवाह नव्हता. लॉकडाऊननंतर लोकं जेव्हा घराबाहेर पडतील तेव्हा लोकांना नदीचा विना अडथळ्याचा प्रवाह दिसेल, असा विश्वास मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.

महामेट्रोसह विविध विभागाचे सहकार्य
नदी स्वच्छता अभियान लोकसहभागातून होत असते. यासोबतच शासनाच्या विविध विभागाचेही यात सहकार्य मिळते. यावर्षी सुरू असलेल्या नदी स्वच्छता अभियानात महामेट्रोसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे सहकार्य मिळत आहे. यासोबतच मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, स्वच्छ भारत मिशन, यांत्रिकी अभियांत्रिकी, उद्यान विभाग या सर्वांचा समन्वय असून प्रत्येक विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

NMC finds quarantine at VNIT hostels as Ravi Bhavan, Vanamati fills up in one day

Nagpur: Rooms at Vanamati and Ravi Bhavan with a capacity of 125 people filled up in a single day after officials quarantined a large number of people traced from the near contact list of Delhi positive patients issued by the state government.

The sudden rise prompted the health department of Nagpur Municipal Corporation, which was tasked with identifying the perpetrators, to begin making new plans as the numbers are likely to grow higher in the next few days.

MLA hostels, where the first Quarantine facility in the city was built on March 13, took about 21 days to fill up its 210 room in Wing II and III. On Wednesday, Nagpur NMC health department started planning for quarantine facilities for the old VNIT hostels at Bajaj Nagar.

VNIT officials said the authorities had been shown 200 to 300 old hostel rooms but they had yet to obtain any official acquisition document. The campus too had been shut down 10 days before the declaration of the national lockdown. Students at VNIT were told to leave by 16 March. Several institutions have vacant hostels, like the University of Nagpur, too. VNIT has the capacity to accommodate over 4000 people including the new hostels.

SDO Shekhar Ghadge said Vanamati facility began on Wednesday but on Thursday it was complete. “Thursday, 35 people were brought to Ravi Bhavan. Vanamati can seat up to 84 people. Two are sharing a room at both places, “he said.

Ghadge said the administration was looking into options and was thus inspecting the VNIT campus. “We don’t need to buy any real estate. Before we turn a place into a quarantine centre we weigh many factors. The divisional commissioner and the district collector must eventually determine, “he said.

As the number of suspected cases unexpectedly increased, he said NMC had been tasked with finding and taking them here. On Thursday the MLA hostels, where about 30 rooms were vacant a day earlier, were packed.

Ghadge said many people will soon complete their 14-day quarantine at the MLA hostel so vacant rooms would be available.

Divisional Commissioner Sanjeev Kumar claimed the spike in a number of suspects was mainly due to the repercussions from the Delhi list and the congregation Nizamuddin Tablighi.

There were also questions at Vanamati and Ravi Bhavan concerning the housekeeping and catering services. Sources said the workers were afraid to attend to the alleged COVID-19 incidents.

Initially, the operator of MLA hostels too had faced the same problem but somehow managed to maintain 80 staff who are now deployed there in two shifts.

Exit mobile version