Mumbai-Ahmedabad Tejas Express is due to run from 19 January. Timings, stoppages, more info

The new Tejas Express will run six days a week, except on Thursdays, the Tejas Express will stop at Nadiad, Vadodara, Bharuch, Surat, Vapi and Borivali stations in both directions.

The Indian Railways will introduce a new Tejas Express train between Ahmedabad and Mumbai Central. The new Tejas Express will run six days a week, except on Thursdays. On its inaugural run on 17 January, Train No. 09426 Ahmedabad-Mumbai Central Tejas Express leaves Ahmedabad at 9:30 a.m. and reaches Mumbai Central at 4:00 p.m. Likewise, in the return direction, train No. 09425 Mumbai Central-Ahmedabad will depart from Mumbai Central at 17:15 and Ahmedabad will arrive at 23:30.

Train No. 82902 Ahmedabad-Mumbai Central Tejas Express will depart Ahmedabad at 06:40 hrs on its regular run from 19 January to reach Mumbai Central at 13:10 hrs. Train No. 82901 Mumbai Central-Ahmedabad Tejas Express (Except Thursday) will leave Mumbai Central at 15:40 hrs and Ahmedabad will arrive at 21:55 hrs. The Tejas Express will stop at Nadiad, Vadodara, Bharuch, Surat, Vapi and Borivali stations in both directions.

The train leaves Ahmedabad at 6:40 a.m. and arrives at Nadiad at 7:19 a.m., Vadodara at 8:03 a.m., Bharuch at 8:56 a.m., Surat at 9:35 a.m., Vapi at 10:55 a.m., and Borivali at 12:31 a.m. before its departure at Mumbai Central at 01:30 p.m. On its return journey, the Tejas Express will depart Mumbai at 03.40 pm and stop at Borivali at 04.14pm, Vapi 05.37 pm, Surat at 06.47 pm, Bharuch at 07.29 pm, Vadodara at 08.18 pm, Nadiad at 09.03 pm and Ahmedabad at 09.55 pm. Tejas Express will deliver world-class comfort and amenities to passengers, according to a statement issued by the Western Railways division of the Indian Railways.

The fully air-conditioned Tejas has several modern features, such as sliding doors, personalized reading lights, mobile charging points, attendant call buttons, bio-toilets, automatic entry and exit doors, CCTV cameras, reclining facilities, comfortable seats, etc. This train will have chair car and executive chair car. The Mumbai Central-Ahmedabad Tejas Express — also run by the IRCTC after. Bringing private train operators to provide world-class passenger services was suggestion put forward by the railway in its 100-day program.IRCTC will have the rights to advertising inside and outside buses, including trains. It may also make modifications inside the rake without affecting its structural protection. The IRCTC will be permitted to use the rail ticketing platform for a year and the revenue accounts of these two trains would be kept separate, according to the sources. The Railway Board ordered IRCTC to establish its own ticketing system at the same time. The trains will each have 18 coaches. However, IRCTC will be allowed to operate trains with a minimum of 12 coaches for a period of one year. The freight charges would be calculated per trip on the basis of the number of coaches used on each trip or 12 coaches, whichever is higher.IRCTC will also pay for the repair of trains, including spares.

Sadar Flyover is ready to open, Mayor Joshi pays a visit.

The much-anticipated flyover works in Sadar have been completed in the final phase and the last leg of patchwork has been completed. On Friday, Mayor Sandeep Joshi visited the site and reviewed the project. While the asphalting of the road on the flyover has been completed, the work on the final patchwork is going on at the level of war.The project is currently undergoing the last leg of painting, street marking, street lighting installation, electrical fittings, signboards and few other works.

During his visit to Sadar flyover, Joshi was accompanied by Leader of Opposition in NMC Sandeep Jadhav, Standing Committee Chairman Pradeep Pohane, Deputy Mayor Manisha Kothe, corporator Nagesh Sahare, corporator Sunil Hiranwar, corporator Pragati Patil, corporator Sunil Agrawal, Bihari Shivhare, Babli Meshram, Neeraj Agrawal, Neeraj Jaiswal, Amar Khode and others.Joshi revealed that the Sadar Flyover will soon be open to the public by Union Home Secretary Rajnath Singh on 2 January 2020.The inaugural ceremony will be attended by Union Minister Nitin Gadkari, State Minister Nitin Raut, MLA Vikas Thakre and all MLAs in Nagpur.

 

स्विगी ने जाहीर केली ग्राहकांच्या फेव्हरेट फूड ची यादी; प्रत्येक मिनिटाला 95 चिकन बिर्यानीची ऑर्डर तर गुलाबजाम गुड पदार्थांमध्ये अव्वल

आता जेवण बनावट येत नसलं तरी प्रत्येक जण हमखास स्विगी, झोमॅटो किंवा उबर इट्स या ऍप्सवरून कधीही आणि कुठेही ऑर्डर करू शकतो. परंतु, स्विगी या ऍपने नुकतीच अशी काही माहिती प्रदर्शित केली आहे, जी वाचून तुम्हीही व्हाल थक्क. स्विगीने सांगितल्यानुसार, या ऍपवरून सर्वात जास्त चिकन बिरयानी ऑर्डर केली जाते.

स्विगी ऍपने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते ऑक्टोबर या महिन्यांदरम्या देशभरात सर्वात जास्त ऑर्डर या चिकन बिरयाणीच्या घेण्यात आल्या होत्या. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक मिनिटाला जवळपास 95 ऑर्डस या बिर्याणीच्याच येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे त्यांच्या यादीत बिर्याणीला पहिले स्थान मिळाले आहे तर सर्वात जास्त ऑर्डसच्या दुसऱ्या स्थानावर आहे मसाला डोसा तर तिसऱ्य़ा स्थानावर आहे पनीर बटर मसाला हे पदार्थ. विशेष म्हणजे याच वर्षी नाही तर सलग मागील तीन वर्षांपासून सर्वात सर्वात आवडती डिश म्हणून चिकन बिर्यानीलाच सर्वात जास्त पसंती मिळालेली पाहायला मिळत आहे. तर स्विगीने जाहीर केलेल्या अहवालानुसार डेझर्ट म्हणजेच गोड पदार्थांमध्ये गुलाबजामला सर्वात जास्त पसंती मिळाली आहे आणि दुसऱ्या स्थानावर आहे फालुदा तर तिसऱ्या स्थानावर मूगडाळीचा हलवायला पसंती मिळाली.

Winter Health Tips: थंडीत नाक चोंदण्यावर करा हे ‘5’ घरगुती उपाय

 

 

 

वातावरणात बदल झाल्याने अनेकदा आपल्याला नाक चोंदण्याच्या (Nose Choked Up) समस्येला सामोरे जावे लागते. नाक चोंदणे म्हणजे नाकाचे छिद्र बंद झाल्याने श्वासोच्छवास करण्यास किंवा बोलण्यास त्रास होतो. अशा वेळी नाकातून विशेष प्रकारचा आवाज येतो. नाक चोंदल्यास ते मोकळे होण्यास बराच वेळ जातो. अशा वेळी आपली खूप चिडचिड होते. अशा वेळी चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी आपण श्वास जोरजोरात शरीरात घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र यामुळे आपल्या छातीवर अनेकदा ताण पडतो. त्यामुळे डोकं जड होणे, छातीत दुखणे यांसारख्या समस्याही उद्भवतात. चोंदलेले नाक मोकळे कसे करावे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. अशा वेळी आपण अनेकदा इन्हेलरचा वापर करतो.

थंडीमुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने अनेकदा रात्री किंवा सकाळी उठल्यावर अनेकांना नाक चोंदण्याचा त्रास जाणवतो. अशा वेळी काही घरगुती उपायांनी तुम्ही तुमचे नाक मोकळे करु शकता जेणे करुन तुम्हाला नीट श्वासोच्छवास करता येईल.

1. लिंबू रस आणि मध

चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून रोज सकाळी प्यावे. यामुळे तुमचे चोंदलेले नाक मोकळे होईल.

2. आले

आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्ल्यानेही नाक मोकळे होण्यास मदत होते किंवा आले घालून चहा पिणेही चांगले.

3. कांदा

कांद्याचे दोन भाग करुन त्याचा वास घेतल्यास नाक मोकळे होते. अथवा कांदा चिरल्याने डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते. तसेच यामुळे नाकही मोकळे होते.

4. पुदिना

गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून त्याची वाफ घेण्यानेही नाक मोकळे होते.

5. गरम पाण्याची आंघोळ

नाक चोंदण्याची समस्या असल्यास तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होते.

नाक चोंदण्यावर सातत्याने इन्हेलर वापरणेही शरीरासाठी चांगले नाही. त्यामुळे या घरगुती उपायांनी तुम्ही नाक चोंदण्याच्या समस्येवर त्वरित इलाज करु शकता.

विमानांचा रंग पांढराच का असतो? जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारणे.

जगभरात जवळपास सर्वच प्रवासी आणि मालवाहक विमाने ही पांढऱ्या रंगाची असतात. खुप कमी अशी विमाने असतात जी रंगीबेरंगी असतात.पण कधी तुमच्या डोक्यात हा विचार आला आहे की ही विमाने नेहेमी पांढऱ्या रंगातच का असतात एअरलाईन्स सर्व गोष्टींवर एवढा खर्च करू शकते तर मग ते आपल्या विमानांना चांगल्या रंगाने पेंट नाही करू शकत?

पण विमान पांढऱ्या रंगाचा असणे ह्यामागे अनेक महत्वाची कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्वाच कारण म्हणजे पांढरा रंग हा सूर्याच्या प्रकाशाला सर्वात चांगल्या प्रकारे परावर्तीत करू शकतो. जे इतर गडद रंग करू शकत नाही. जसे की काळा किंवा इतर कुठला गडद रंग सूर्याच्या प्रकाशाला उब शोषतो.

जसे आपण उन्हाळ्यात पांढरे कपडे घालणे पसंत करतो कारण तो सूर्याच्या उष्णतेला परावर्तीत करतो, हेच तथ्य येथे वापरले जाते. जर विमानाला कुठल्याही गडद रंग असेल तर तो रंग सूर्याची उष्णता जास्त प्रमाणत शोषून घेईल त्यामुळे  विमानातील मशिनरी खराब होण्याची संभावना असते.

विमानांना पांढरा रंग देण्यामागे केवळ हे एकच कारण नाही आहे. पांढरा रंग यासाठी देखील फायद्याच असते कारण, ह्या रंगामुळे जर विमानावर कुठेही क्रॅक, डेंट आले तर ते सहजपणे दिसते.पांढऱ्या रंगामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान लवकर दिसून येते. कारण विमानातील एखादा छोटासा क्रॅक देखील दुर्घटनेचे कारण ठरू शकतो. म्हणून हे स्पष्टपणे दिसणे अतिशय महत्वाचे असते.तसेच जर कधी कुठले विमान दुर्घटनाग्रस्त झाले तर त्याच्या पांढऱ्या रंगामुळे त्याला समुद्र, जंगल, जमिनीवर स्पष्टपणे बघितल्या जाऊ शकते. रात्रीच्या काळोखात देखील पांढऱ्या विमानाला बघणे सहज सोपे आहे.

तसेच जर विमानाच्या कुठल्या भागातून तेल वगैरे सांडत असले तर ते देखील ह्याच्या पांढऱ्या रंगामुळे सहज नजरेस पडते.

ही तर झाले वैज्ञानिक कारणे, पण त्यासोबतच विमानाचा रंग पांढरा असण्यामागे काही व्यावहारिक कारणे देखील आहेत. ज्यामुळे विमानांचा रंग पांढरा असणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरते.विमान हा खूप विशाल असतो, त्यामुळे त्याला पेंट करणे म्हणजे काही खायचे काम नाही. कुठल्याही जम्बोजेट प्लेनला पेंट करण्यासाठी विमान कंपनीला खूप खर्च करावा लागतो. तसेच ह्यासाठी खूप वेळ देखील लागतो.रंगबिरंगी रंगत रंगलेला आणि विविधी कलाकृती असलेला विमान जर विकायला काढला तर त्याची किंमत पांढऱ्या विमानाच्या तुलनेत कमी असते. म्हणून विमान कंपनी विमानाचा रंग पांढराच ठेवतात.विमानाला सतत ऊन, वारा, पाऊस ह्यांचा मारा सहन करावा लागतो. ह्यात जर विमानाला इतर कुठला रंग दिला गेला तर तो खूप लवकर फिक्कट पडायला लागतो.कारण कुठलाच रंग उन, वारा आणि पाऊस ह्यांचा मारा सहन करून जास्त काळ टिकू शकत नाही. मग अश्यात त्याला वारंवार पेंट करण्याची गरज पडते. ह्याउलट पांढरा रंग हा बराच काळ टिकून राहतो.आता जेव्हा केव्हा तुम्ही विमानात बसाल तेव्हा त्या विमानाच्या पांढऱ्या रंगामागे इतकी सगळी कारणे असतात हे तुमच्या नक्की लक्षात येईल.

 

वय? १६ वर्षे. कर्तृत्व? एका रोबोटिक्स कंपनीचा CEO. पुढचा प्लॅन? भारतीय सैन्यासाठी ड्रोन तयार करणे!

भारतीयांनी आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपली बुध्दीमत्ता सिध्द केली आहे. त्यामुळे भारतीयांना जगभरातील विविध देशांमध्ये नेहमीच मानाचे स्थान मिळत असते. परिणामी, देशाची गौरवशाली वाटचाल दिमाखात सुरू आहे.याच वाटचालीचा दाखला देणारे एक संशोधन एका १६ वर्षीय भारतीय मुलाने केले असून केवळ देशच नव्हे तर जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे राहणाऱ्या हर्षवर्धन झाला असे या अल्पवयीन मुलाचे नाव असून त्याने भूसुरूंगाचा शोध घेऊन ते नष्ट करणारे ड्रोन विकसित केले आहे.कसे आहे नेमके हे ड्रोन ते या लेखातून जाणून घेऊया.

भारतात ड्रोनचा वापर होणे ही आता तशी विशेष बाब राहिलेली नाही. त्यामुळे सीमा सुरक्षेपासून अगदी लग्नांमध्ये फोटोग्राफी, व्हिडीओग्राफीपर्यंत ड्रोनचा वापर होतांना दिसतो.परिणामी, केंद्र सरकार ड्रोनच्या वापरासंदर्भात लवकरच काटेकोर नियमावली अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्नशिल आहे.पण गुजरातमधल्या हर्षवर्धन सिन्हा या १६ वर्षाच्या मुलाने स्वतःच्या कंपनीतच हे ड्रोन विकसित केले आहे जे सीमेवर हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांचा जीव वाचविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. ही अनोखी व महत्त्वपूर्ण उपयोगिता असल्यामुळेच या ड्रोनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हर्षवर्धनसिन्हाने तयार केलेल्या या ड्रोनला “इगल ए सेव्हन” असे नाव दिले आहे.

या ड्रोनच्या तंत्रज्ञानाबदृल बोलतांना तो म्हणाला की, या ड्रोनमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आतापर्यंत कुठेही उपलब्ध नसून ते वापरात आलेले नाही.रिमोटच्या सहाय्याने वापरल्या जाणाऱ्या या ड्रोनमुळे भूसुरूंग शोधून काढून ते निकामी करणे शक्य होणार आहे.भारतीय लष्कर आपल्या छावणीतून या ड्रोनचा वापर करू शकणार असून ड्रोनला भूसुरूंग सापडला की तो छावणीतील अधिकाऱ्याना माहिती पाठवेल. शिवाय ड्रोनवर असलेल्या कॅमेऱ्यामुळे अधिकाऱ्यांना तो भूसुरूंग पाहता येईल व ड्रोनच्याच सहाय्याने तो लागलीच निकामी देखील करता येईल.हे ड्रोन कुठल्याही प्रकारच्या जमिनीखालील सुरूंग शोधून काढू शकते. त्यामुळे भूसुरूंगांचे स्फोट घडवून आणल्यामुळे होणारी सैन्याची जिवीनहानी रोखणे शक्य होईल.विशेष म्हणजे हर्षवर्धन सिन्हाने केलेल्या या संशोधनाला दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स, दुबई व थायलंड या देशांकडून देखील मागणी असून या देशांमधील कंपन्यांनी त्याला भागिदारी करण्याची आॅफर दिल्याचेही तो म्हणाला.

एवढेच नव्हे तर आमच्या देशात येऊन कंपनी सुरू करा, आम्ही आर्थिक पाठबळ देऊ असेही काही परदेशी कंपन्यांनी सांगितल्याचे त्याने स्पष्ट केले.

पण आपल्या देशात भूसुरूंगाचा स्फोट झाल्याने अनेक जवान शहीद होतात. त्यामुळे मला भारतीय लष्कर आणि सीआरपीएफसारख्या सुरक्षा दलांसाठी ते तंत्रज्ञान आणखी विकसित करायचे आहे. म्हणून परदेशी कंपन्यांच्या सर्व आॅफर्स नाकारल्याचे हर्षवर्धन म्हणाला.हर्षवर्धनसिन्हा हा वयाच्या दहाव्या वर्षापासूनच अशा नवनवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी प्रयत्नशिल असतो. त्याला रोबोटिक्सची देखील आवड असल्याने त्याने “अॅरोबाॅटिक्स सेव्हन” या कंपनीची स्थापना केली आहे.या कंपनीच्या माध्यमातून सर्वांचे जीवन सोपे करण्यासाठी आवश्यक त्या तंत्रज्ञानाचा शोध घेतला जाईल, असे तो म्हणतो.

भूसुरूंगाचा धोका

देशाच्या शत्रू राष्ट्रांकडून सैनिकांवर हल्ले होण्याच्या घटना तशा नवीन नाही. पण अनेकदा अशा घटनांमध्ये भूसुरूंगांचा वापर केला जातो. त्यामुळे कुठलीही पूर्वकल्पना येण्यापूर्वीच स्फोट घडवून आणत मोठी जिवीतहानी करणे शक्य होते.

भूसुरूंगाचा वापर नक्षलवादी देखील करू लागल्याचे गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांमध्ये दिसून आले आहे.

नक्षलवाद्यांनी झारखंड, छत्तीसगढ, ओरिसा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यांमध्ये असलेल्या वनक्षेत्रात ठिकठिकाणी भूसुरूंग व आयईडी पेरून सुरक्षा यंत्रणांची वाहने स्फोटांमध्ये उडवून देत मोठया प्रमाणात जिवीतहानी घडवून आणली आहे.निमलष्करी दले व स्थानिक पोलीसांना पेरलेले भूसुरूंग शोधून ते निकामी करण्याचा अनुभव नसल्याने हा धोका अधिकच वाढत चालला होता.परिणामी, केंद्र सरकारने नक्षलवादी प्रभावित क्षेत्रात सुरक्षा दलांसाठी घातक ठरणारे भूसुरूंग शोधून ते निकामी करण्यासाठी लष्करी तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. यावरून भूसुरूंगांचा धोका अधोरेखित होतो.

भूसुरूंग हे केवळ सुरक्षा यंत्रणांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर देखील बेतले आहेत.

नक्षलवाद्यांनी २०१० मध्ये भूसुरूंग पेरून रेल्वेरूळ उडवून दिल्याने हावडा-मुंबई या एक्सप्रेसला भीषण अपघात झाला होता. या अपघातात सुमारे १५० नागरिकांनी प्राण गमावले होते.त्यानंतरही भूसुरूंगांचा वापर करून जिवीतहानीच्या अनेक घटना घडल्या आहेत. एका अहवालानुसार जगातील ७८ देशांमध्ये भूसुरूंग स्फोटांचा धोका सर्वाधिक असून या देशांमध्ये वर्षाला १५ ते २० हजार लोक मरण पावत असून त्यात ८० टक्के सर्वसामान्य जनता असते.त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून भूसुरूंग शोधून ते नष्ट करण्याचे तंत्रज्ञान निश्चितपणे देशाच्या सुरक्षेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ठरू शकते.

गेल्या चार वर्षात सरकारकडून सुरक्षा यंत्रणांची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. शिवाय अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर देखील भर दिला गेला आहे.

त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात योगदान देण्याची प्रेरणा तरूणाईला मिळत असून पर्यायाने संशोधनालाही प्रोत्साहन मिळत आहे व त्यातून हर्शवर्धनसारखी मुले तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.तंत्रज्ञानाचे संशोधन काही दिवसांपूर्वी नाशिक येथील एका १९ वर्षीय युवक अजिंक्य जाधव याने सियाचिनसारख्या जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वाधिक गारठा असलेल्या युध्दभूमीवर तैनात राहणाऱ्या भारतीय जवानांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनात खास पोशाख तयार केल्याचे समोर आले होते.हा पोशाख जवानांना थंडीसह शत्रूपासूनही संरक्षित करणारा असून त्याला संरक्षण मंत्रालयाने देखील अनुकूलता दर्शविली.

तर पुण्यातील हाकिझ काझी या १२ वर्शीय मुलाने “ईआरव्हीआयएस” हे अनोखे जहाज तयार केले असून ते समुद्रातील प्रदूषण कमी करण्याबरोबरच समुद्री जीवांचा बचाव करणार आहे.

समुद्रातील जीव प्लास्टिक कचरा खात असून त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे एकाचवेळी समुद्री जीव, पाणी व कचरा वेगळा करणारे हे जहाज या मुलाने तयार केले आहे.एकूणच हर्षवर्धन झाला, अजिंक्य जाधव व हाकिझ काझी या तिन्ही लहान मुलांनी गेल्या काही दिवसांत केलेली संशोधने ही भारतीय बुध्दीमत्तेची उदाहरणे जगासमोर मांडणारी आहेत.अशाप्रकारच्या तंत्रज्ञानांच्या शोधाचा फायदा भविष्यात केवळ भारतालाच नव्हे तर जगभरातील विविध देशांना होणार आहे.

 

नदीत फेकलेले निर्माल्य गोळा करून ते दोघे कमवत आहेत वर्षाला तब्बल दोन कोटी!

व्यवसाय करणे कधी सहज शक्य होत नाही, त्यासाठी खूप मेहनत आणि त्याचबरोबर पैशांचे पाठबळ असणे गरजेचे असते. व्यवसाय करण्याच्या नवनवीन कल्पना नेहमीच अनेक लोकांच्या डोक्यामध्ये येतात, काही त्यामध्ये यशस्वी होतात तर काही अयशस्वी होतात.

तुम्ही एखादा व्यवसाय करायचे ठरवले, तर तुम्हाला त्याच्यासाठी लागणारा खर्च आणि भविष्यात होणार फायदा व तोटा यांचा अंदाज लावणे गरजेचे आहे.

कधी – कधी लोक जास्त भांडवल लागणारा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत नाहीत. कारण जास्त भांडवल  लागणाऱ्या व्यवसायामध्ये फायदा जरी जास्त असला, तरी त्याचे नुकसान देखील तेवढेच भारी पडू शकते.त्यामुळे लोक कमी भांडवल लागणारा व्यवसाय सुरु करतात. पण व्यवसायाची कल्पना चांगली नसली, तर ते चालणे खूपच अवघड असते.

पण जर तुमच्या व्यवसायाची संकल्पना चांगली असेल, तर तुम्ही कमी भांडवलामध्ये खूप नफा मिळवू शकता. याचेच एक उत्तम उदाहरण कानपूरमधील दोन युवकांनी दिले आहे.

त्याच्या या भन्नाट कल्पनेमुळे खूप कमी भांडवलामध्ये त्यांनी  एक व्यवसाय सुरु केला आणि ते आज कोटींमध्ये नफा मिळवत आहेत.

नदीमध्ये फेकली जाणारी फुले पाहून दोन मित्रांना एक अशी कल्पना सुचली, ज्याच्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलले. कचऱ्यामध्ये फेकले जाणाऱ्या या फुलांच्या मदतीने त्यांनी एक कंपनी उभी केली. ज्या कंपनीची सध्याची उलाढाल वर्षाला  जवळपास दोन कोटींची आहे.

त्यांनी ‘हेल्प अस ग्रीन’ नावाची कंपनी सुरु केली आहे. ‘हेल्प अस ग्रीन’ कंपनीबद्दल कंपनीचा फाउंडर अंकित अग्रवालने सांगितले कि, कानपुरपासून २५ किमी दूर असलेल्या भौंती गावामध्ये त्यांचे ऑफिस आहे.

पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत शहरातील २९ मंदिरांमधून दररोज जवळपास ८०० किलो टाकून दिलेली फुले एकत्र केली जातात आणि त्यांना अगरबत्ती आणि जैविक वर्मी कंपोस्टमध्ये बदलले जाते.यामुळे नदी-नाल्यांमध्ये घाण पसरत नाही. यातूनच या कंपनीचा व्यवसाय सुरु झाला.

अंकितने याबद्दल सांगितले की,“मी माझ्या मित्राबरोबर २०१४ मध्ये बिठूर (कानपुर ) मध्ये मकर संक्रातीच्या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर बनलेल्या मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी एकत्र निघालो होतो.

“गंगेच्या किनाऱ्यावर सडलेल्या फुलांना आणि त्याच्यामुळे अशुद्ध झालेल्या नदीचे पाणी पिताना लोंकाना पाहिलेले होते.ही गोष्ट फक्त नदीमध्ये सडणाऱ्या फुलांचीच नाही, तर त्यावर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांची देखील आहे. जे पाण्यातील जीवनावर वाईट परिणाम करू करतात”

यापुढे सांगताना अंकित म्हणाला की,

“माझा मित्र गंगेकडे पाहताना मला म्हणाला, तुम्ही लोक यासाठी काही करत का नाहीत. तेव्हाच मनामध्ये एक कल्पना आली की,

काहीतरी असे करूया ज्याच्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होणे आणि लोकांना हे खराब पाणी पिण्यापासून वाचवणे ही  दोन्ही कामे होतील.

यानंतर आपल्या गंगेच्या तटावर शपथ घेतली की, आम्ही गंगेमध्ये टाकाऊ फुले पडू देणार नाही. यामुळे पंतप्रधान मोदींचे स्वच्छता अभियान देखील यशस्वी करता येईल.”

लोक वेडे म्हणत हसले होते.

अंकितने अकरावीमध्ये त्याच्याबरोबर शिकलेल्या करण रस्तोगी या २९ वर्षीय मित्राबरोबर याबद्दल चर्चा केली. त्यावेळी करण फॉरेनमधून शिक्षण घेऊन भारतामध्ये परत आला होता. त्या दोघांनी गंगेमध्ये फेकल्या जाणाऱ्या फुलांबद्दल चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ठरवले की, नद्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रदूषणमुक्त करण्यासाठी काहीतरी वेगळे करावे लागेल.जेव्हा त्यांनी लोकांना सांगितले की, ते नद्यांना फुलांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठी काही वेगळे करू इच्छित आहेत. तेव्हा लोकांनी त्यांना वेडे म्हणून त्यांची मस्करी केली. पण त्यांनी कोणाचीही पर्वा केली नाही.

७२ हजारांमध्ये सुरु केली कंपनी

अंकितने सांगितले की,“२०१४  पर्यंत मी पुण्यामधील एका सॉफ्टवेयर कंपनीमध्ये ऑटोमेशन साइंटिस्टच्या स्वरूपात काम करत होतो.  तर करण हा मास्टर्सच्या शिक्षणानंतर भारतामध्ये येऊन आपले स्वतःचे काम करत होता.”

अंकित आणि करण यांनी आपली जुनी कामे सोडून २०१५ मध्ये ७२ हजार रुपयाच्या भांडवलामध्ये ‘हेल्प अस ग्रीन’ कंपनी लॉंच केली. या दरम्यान त्यांना ओळखणारे लोक त्यांना वेडे म्हणत होते. दोन महिन्यानंतर ते आपले पहिले वर्मी कंपोस्ट उत्पादन घेऊन आले. ज्याला त्यांनी ‘माती’ असे नाव दिले. या कंपोस्टमध्ये १७ नैसर्गिक वस्तू आहेत. ज्यामध्ये कॉफीच्या स्थानिक दुकानांमध्ये फेकण्यात आलेल्या कॉफीचा गाळ देखील आहे. काही काळानंतर आयआयटी कानपुर देखील आर्थिक सहाय्यासह यांच्याबरोबर जोडली गेली.

काही काळानंतर त्यांची ही कंपनी कानपूरच्या सरसौल गावामध्ये पर्यावरणाला अनुकूल असणाऱ्या उदबत्त्या बनवायला लागली.

उदबत्तीच्या डब्ब्यांवर देवांचे फोटो असल्याने त्यांना कचरपेटीमध्ये फेकण्यास श्रद्धाळूंना अडचण येत असे. त्यामुळे हेल्प अस ग्रीनने उदरबत्ती या तुळशीच्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या पेपरमधून  विकण्यास सुरुवात केली.

आज आहे २ कोटींपेक्षा जास्त उलाढाल

अंकित अग्रवालने सांगितले की, “त्यांची कंपनी २०,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. त्यांच्या कंपनीमध्ये ७० पेक्षा जास्त स्त्रिया काम करतात आणि त्यांना दररोज कमीत कमी २०० रुपये मजूरी  मिळते.

या त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल सध्या जवळपास सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त आहे. कानपूर, कन्नौज, उन्नाव यांच्या व्यतिरिक्त इतर काही ठिकाणी देखील त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे.

२९ मंदिरांमधून दररोज जवळपास ८०० किलो टाकाऊ फुले एकत्रित केली जातात आणि त्यानंतर त्यांना अगरबत्ती व जैविक वर्मी कंपोस्टमध्ये रुपांतरीत येते.

पहिल्यांदा त्यांच्या टीममध्ये दोन लोक होते. आज नऊ लोक आहेत. आज त्यांच्या ‘हेल्प अस ग्रीन’ या कंपनीला आयआयटीकडून चार कोटींपेक्षा जास्त रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

 

साखर उत्पादकांच्या लाभासाठी साखरेच्या उप उत्पादनांच्या विक्री वरील बंधने शिथिल करण्याची गरज

पॉलिसी थिंक टँक असलेल्या पहले इंडिया फाऊन्डेशन ने नुकत्याच जारी केलेल्या रिपोर्ट नुसार देशातील साखर क्षेत्र हे खूप दबावाखाली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.  फाऊन्डेशन ने दिलेल्या रिपोर्ट मध्ये असे सूचवण्यात आले आहे की साखर उत्पादन करतांना निर्माण होणार्‍या उप उत्पादनांना म्हणजेच मळी आणि ईथेनॉल सारख्या उत्पादनां च्या विक्रीचे नियम शिथिल केल्याने  कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळू शकेल.

“ ॲन इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन ॲप्रोच टू ईझ ऑफ डुईंग बिझनेस: अ केस स्टडी ऑफ शुगर, अल्को-बेव्ह ॲन्ड टुरिझम” नामक जारी करण्यात आलेल्या रिपोर्ट मध्ये महाराष्ट्र सरकारला आपल्या योजनांमध्ये बदल करण्यासाठी काही शिफारशी करण्यात आल्या असून २७ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका  गोलमेज सभेत सरकारच्या उच्च समिती कडे या शिफारशी  करण्यात आल्या.

उपयोग कशा प्रकारे केला जातो त्यानुसार मळीच्या वाहतुकीचे नियंत्रण हे केंद्र आणि राज्य सरकार दोघांकडून केले जाते.  रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे की “ मळी आणि ईथेलॉल सारख्या साखरेच्या उप उत्पादनांना नियंत्रण मुक्त केल्यास त्या साखर क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होऊ शकेल.”  

महाराष्ट्रात सर्वाधिक  प्रमाणात मळीचे उत्पादन केले होते- हे उत्पादन साखर उत्पादन क्षेत्रातील सर्वांत आर्थिक दृष्ट्या लाभदायक उत्पादन आहे.  २०१७-१८ मध्ये संपूर्ण भारतातील मळीचे उत्पादन हे १२ दशलक्ष टन इतके होते,  त्यापैकी महाराष्ट्राचे यांतील योगदान हे ३,६६३,००० टन इतके आहे.

क्षेत्राला भेडसावणारी आणखी एक समस्या म्हणजे ऊसाचे दर ही आहे. सध्या ऊसाच्या दरासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलने करत आहेत.  

सध्या केंद्रा तर्फे वसूलीच्या दरानुसार ऊसाची फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस (एफआरपी)  निश्चित केली जाते. तरीही राज्य सरकार कडून स्टेट ॲडव्हाईस्ड प्राईस (एसएपी) म्हणून  त्यांची स्वत:ची अशी किंमत ठरवते जी एफआरपी पेक्षा अधिक असते, यामुळे बाजारपेठेत द्विधा मनस्थिती निर्माण होते.

पीआयएफ रिपोर्ट ने दिलेल्या शिफारशींनुसार “  एसएपी च्या ऐवजी राज्यातील एफआरपी नुसार ऊसाचे दर ठरवल्यास आणि कारखान्यांना या एफआरपी च्या वर आपल्या क्षमतेनुसार पैसे देण्याची मुभा देण्याची गरज आहे.  त्याचबरोबर  असेही  नमूद करण्यात आले आहे की शेतकर्‍यांना सर्व रक्कम एकरकमी द्यावी व एफआरपी वर आधारीत ही रक्कम ६० दिवसात अदा केली जावी.”   

वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशन चे कार्यकारी संचालक श्री अजित चौगुले यांनी सांगितले “ एफआरपी अंतर्गत (फेअर ॲन्ड रेम्युनरेटिव्ह प्राईस) आणि सध्याच्या पैसे देण्याच्या पध्दतीनुसार १४ दिवसात शेतकर्‍यांचा देणी द्यावी लागतात,  हे खूपच कठीण काम आहे कारण साखरेचे उत्पादन करून तिची विक्री होण्यासाठी कित्येक महिन्यांचा कालावधी जातो.”  

पीआयएफ रिपोर्ट मधील महत्वपूर्ण शिफारशीं मध्ये साखरेच्या वेगवेगळ्या म्हणजेच व्यावसायिक आणि रिटेल वापरासाठी वेगवेगळे दर ठेवणे, साखरेसाठी सर्व समावेशक  विक्री योजना  आणि त्याच बरोबर ऊसाची खरेदी विक्री प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी शेतकर्‍यांची साखर कारखान्यां बरोबर नोंदणी करणे इत्यादींचा समावेश आहे.

महाराष्ट्र सरकारच्या नागरी उड्डयन, एक्साईज जी ए डी चे प्रमुख सचिव वत्सला नायर सिंग-आयएएस “या रिपोर्ट मधील अधिकतर शिफारसींची नोंद घेतली गली असून सरकार द्वारे गठीत करण्यात आलेल्या कृती समितीने सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन हे बदल केल्यास ईओडीबी मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक सुधारण्यास मदत होईल.”   

चटकदार मॅगी सॅन्डविच तुमच्या लाडक्यांसाठी

जाणून घ्या कृती

मॅगीची एक खासियत अशी कि ती सगळ्या वयोगटातील लोकांना आवडते, तर याच आपल्या लाडक्या मॅगीचे सॅन्डविच करून पाहिलंय का कधी? नसेल तर नक्की करून पहा:

साहित्य :

मॅगी
मस्टर्ड सॉस
केचप
चिली सॉस
मेयोनिज
ब्रेड स्लाइस
सॅलडची पाने
कांदा
टोमॅटो
चीज

कृती

▪ तुमच्या नेहमीच्या पद्धतीने मॅगी करून घ्या. फक्त ती कोरडी करा. आता मेयोनिजमध्ये मस्टर्ड सॉस, केचप आणि चिली सॉस घालून मस्त मिश्रण बनवा. मॅगी मसालेदार करत असाल तर नुसतेच मेयोनिज वापरा.

▪ सॉसचा वापर टाळा. आता ब्रेड स्लाइसला मेयोनिजचे मिश्रण लावून घ्या. त्यावर सॅलडची पाने, कांदा, टोमॅटोच्या चकत्या ठेवा. त्यानंतर त्यावर मॅगी घाला. वर चीज किसून घाला किंवा चीजच्या चकत्या ठेवा.

▪ मग परत वर कांद्याची चकती लावा आणि ब्रेड स्लाइस लावून हे सँडविच बंद करा. आता ग्रील करा. झटपट आणि चविष्ट सँडविच तयार.

सर्वात लहान गिर्यारोहक सेला शनेटजर सुमारे ५ दिवसात ३००० फूट उंचीवर चढली

१० वर्षाची मुलगी ३००० फूट उंच डोंगरावर चढली, सर्वात लहान गिर्यारोहक सेला शनेटजर सुमारे ५ दिवसात ३००० फूट उंचीवर चढली, आतापर्यंत कॅलिफोर्नियामध्ये ईएल कॅपिटलन या पर्वतावर चढून एकूण ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे .

कॅलिफोर्नियामधील योसेमाइट पार्कमध्ये स्थित ईएल कॅपिटलन पर्वत सुमारे ३००० फूट उंच आहेत.

कोलोरॅडो नावाच्या या डोंगरावर प्रवास करणे खूप धोकादायक मानले जाते. येथे राहणारी १० वर्षीय सेला शनेटजर या मार्गाने डोंगरावर चढली.

याची खास गोष्ट अशी कि आता पर्यंत ज्या डोंगरावर ३१ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.सेलाने कोणताही त्रासाचा विचार न करता गिर्यारोहण करण्यास सुरुवात केली. डोंगर चढणे हा तिचा अतिशय आवडता प्रकार होता. असे सेला सांगते. यश मिळवल्यानंतर सेला म्हणाली की मी हा डोंगर मनोरंजनासाठी चढला आहे. मी यावर विश्वास ठेवू शकत नाही कि मी ते पूर्ण केले ”

सेलाचा वडीलही माईक आणि मित्र मार्क यांच्यासह ते डोंगरावर चढले. तिच्या सोबत ते दोघे पण गिर्यारोहणासाठी होते. सेलाचे वडील स्वतः हुशार गिर्यारोहक आहेत.

Exit mobile version